शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

Maharashtra election 2019 : उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेऊ नका ; बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 21:20 IST

ओबीसी समाजाकरिता मोठे काम केंद्र सरकारने केल्याचे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत, परंतू कोणते काम केले याचा ते उल्लेख करीत नाहीत़.  पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले. परंतू एकही प्रकल्प त्यांनी गेल्या पाच वर्षात पूर्ण केलेला नाही़, अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत़ राज्य सरकारचे हे अपयश घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले़.  

पुणे : माझ्या मतदारसंघात आले म्हणजे त्यांना काहीतरी बोलणं भाग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जास्त सिरियसली घेऊ नका असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात व्यक्त केले. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते़. बुधवारी थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी 'थोरात यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. ते थोरात तर आम्ही जोरात' असेही ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना थोरात म्हणाले की, 'मतदारसंघात आल्यावर त्यांना काहीतरी बोलणे भाग आहे. तुम्ही काय त्यांना  सिरीयस घेऊ नका'. 

 ते म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून, विधानसभा निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष आघाडी म्हणून सामोरे जात आहोत़. निवडणुक प्रचाराला आत्ताच कुठे सुरूवात झाली आहे़ आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवर सर्व नेते येणार असून, या निवडणुकीत आम्ही १६० पेक्षा अधिक जागा मिळवून विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़.       राज्य सरकारने पुर परिस्थितीच्या काळात अतिशय निराशाजनक काम केले असून, केंद्र सरकारकडून ६ हजार ८०० कोटी रूपयांची मदत मिळाली असे सांगितले आहे़, मात्र यापैकी एक पैसाही राज्याला केंद्राने दिलेला नाही़. निवडणुकीच्या धामधुमीत व भाजपातील महाभरतीत सरकार पुरग्रस्तांना विसरले आहे़.

 ओबीसी समाजाकरिता मोठे काम केंद्र सरकारने केल्याचे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत, परंतू कोणते काम केले याचा ते उल्लेख करीत नाहीत़.  पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले. परंतू एकही प्रकल्प त्यांनी गेल्या पाच वर्षात पूर्ण केलेला नाही़, अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत़ राज्य सरकारचे हे अपयश घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले़.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातPoliticsराजकारण