शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Pune: जलपर्णीला मारू नका, तिचा उपयोग करून घ्या! खराडीत जलपर्णीने झाकली ‘मुठा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:07 IST

खराडीत सध्या मुठा नदीवर संपूर्ण जलपर्णी पसरलेली आहे. केवळ नदीच नव्हे तर कात्रज तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलाव देखील जलपर्णीने भरून गेला आहे....

पुणे : जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. आता केमिकल टाकून तिला मारले जातेय; पण तिला मारल्याने परिस्थिती सुधारणार नाही. आपण पुणेकर डिटर्जंट प्रचंड वापरतो. त्या सांडपाण्याला संपूर्णपणे ‘ट्रीट’ केले जात नाही. ‘ट्रीट’ केले तरी आपण साफ काय करतो, तर फक्त ऑरगॉनिक. अमोनिया, नायट्रेट हे पाण्यात जातेच. त्यामुळे पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे जलपर्णी पाण्यात येते. मी स्वत: जलपर्णी वाढविण्याचा प्रयत्न केला हाेता. ती देखील स्वच्छ पाण्यात! पण पाण्याला प्रदूषित केले तरच ती वाढते, असे पर्यावरणीय शास्त्रज्ञ डॉ. अजित गोखले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

खराडीत सध्या मुठा नदीवर संपूर्ण जलपर्णी पसरलेली आहे. केवळ नदीच नव्हे तर कात्रज तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलाव देखील जलपर्णीने भरून गेला आहे. खरं तर डास जलपर्णीने वाढत नाहीत, तर घाण पाण्यामुळे वाढतात. प्रदूषण सुरू झाले की डास येतात. जिथे जिथे जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. तिथे डास वाढले. डास वाढणं हे प्रदूषणाचे लक्षण आहे. या प्रदूषणाला आपणच जबाबदार आहोत.

शिवसधन संस्थेने १९८०-९०च्या दशकात सांगलीला एक प्रोजेक्ट केला होता. त्यात त्यांनी जलपर्णी वाढवली होती. त्या जलपर्णीपासून बायोगॅस बनवला होता. तो बायोगॅस वीस कुटुंबांना इंधन म्हणून दिला होता. बायोगॅस वापरून वीज निर्मिती केली होती. तो प्रकल्प बंद पाडला गेला. असे प्रकल्प कमी खर्चाचे असतात, ते फारसे आवडत नाहीत लोकांना.

बेंगलोरला एक कंपनी आहे. तीसुध्दा जलपर्णीपासून बायोगॅस बनवते. या जलपर्णीचे काय करायचे, त्याचे उचलून मलचिंग करायचे, बायोगॅस बनवायचा. वेस्टेजपासून एनर्जी बनवणे हा शहाणपणा आहे, असे गोखले यांनी नमूद केले.

केमिकल टाकणे अयोग्य !

‘ग्लायफोसेट’ हे तणनाशक आहे. याचा अर्थ काही प्रकारच्या वनस्पतींना हे तणनाशक मारते. जलपर्णी या तणनाशकामुळे मेल्यानंतर खाली बुडते. बुडलेली जलपर्णी कुजून त्याच्यावर आणखी डास वाढतात. आणखी प्रदूषण होते. त्यामुळे ग्लायफोसेट टाकू नये. पावसाळ्यात जलपर्णी नसते. तेव्हा पाणी डायलूट झालेले असते. जलपर्णी वाढू शकत नाही. पण पावसाळ्यानंतर प्रदूषण वाढते आणि जलपर्णी देखील वाढायला सुरुवात होते. एक तर प्रदूषण कमी करायला हवे आणि दुसरे पावसाळ्यानंतर नदीत जलपर्णी संपूर्ण काढावी. त्यामुळे ती वाढणार नाही, असे डॉ. गोखले म्हणाले.

‘एसटीपी’ बसविल्याने नायट्रेट आणि फॉस्फेट कमी होणार नाही. बीओडी, सीओडी कमी होते. एसटीपी ही अर्धी ट्रीटमेंट आहे. सांडपाणी शुध्द करून शेतावर, डोंगरावर पसरवले पाहिजे. त्यातील अन्न घेऊन वनस्पती वाढतील. वनस्पती आणखीन नवीन अन्न तयार करतील. अशा पध्दतीने सांडपाणी शुध्दीकरणाचे प्रयोग आम्ही इतर ठिकाणी केले आहेत.

- डॉ. अजित गोखले, पर्यावरणीय शास्त्रज्ञ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड