शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Pune: जलपर्णीला मारू नका, तिचा उपयोग करून घ्या! खराडीत जलपर्णीने झाकली ‘मुठा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:07 IST

खराडीत सध्या मुठा नदीवर संपूर्ण जलपर्णी पसरलेली आहे. केवळ नदीच नव्हे तर कात्रज तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलाव देखील जलपर्णीने भरून गेला आहे....

पुणे : जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. आता केमिकल टाकून तिला मारले जातेय; पण तिला मारल्याने परिस्थिती सुधारणार नाही. आपण पुणेकर डिटर्जंट प्रचंड वापरतो. त्या सांडपाण्याला संपूर्णपणे ‘ट्रीट’ केले जात नाही. ‘ट्रीट’ केले तरी आपण साफ काय करतो, तर फक्त ऑरगॉनिक. अमोनिया, नायट्रेट हे पाण्यात जातेच. त्यामुळे पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे जलपर्णी पाण्यात येते. मी स्वत: जलपर्णी वाढविण्याचा प्रयत्न केला हाेता. ती देखील स्वच्छ पाण्यात! पण पाण्याला प्रदूषित केले तरच ती वाढते, असे पर्यावरणीय शास्त्रज्ञ डॉ. अजित गोखले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

खराडीत सध्या मुठा नदीवर संपूर्ण जलपर्णी पसरलेली आहे. केवळ नदीच नव्हे तर कात्रज तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलाव देखील जलपर्णीने भरून गेला आहे. खरं तर डास जलपर्णीने वाढत नाहीत, तर घाण पाण्यामुळे वाढतात. प्रदूषण सुरू झाले की डास येतात. जिथे जिथे जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. तिथे डास वाढले. डास वाढणं हे प्रदूषणाचे लक्षण आहे. या प्रदूषणाला आपणच जबाबदार आहोत.

शिवसधन संस्थेने १९८०-९०च्या दशकात सांगलीला एक प्रोजेक्ट केला होता. त्यात त्यांनी जलपर्णी वाढवली होती. त्या जलपर्णीपासून बायोगॅस बनवला होता. तो बायोगॅस वीस कुटुंबांना इंधन म्हणून दिला होता. बायोगॅस वापरून वीज निर्मिती केली होती. तो प्रकल्प बंद पाडला गेला. असे प्रकल्प कमी खर्चाचे असतात, ते फारसे आवडत नाहीत लोकांना.

बेंगलोरला एक कंपनी आहे. तीसुध्दा जलपर्णीपासून बायोगॅस बनवते. या जलपर्णीचे काय करायचे, त्याचे उचलून मलचिंग करायचे, बायोगॅस बनवायचा. वेस्टेजपासून एनर्जी बनवणे हा शहाणपणा आहे, असे गोखले यांनी नमूद केले.

केमिकल टाकणे अयोग्य !

‘ग्लायफोसेट’ हे तणनाशक आहे. याचा अर्थ काही प्रकारच्या वनस्पतींना हे तणनाशक मारते. जलपर्णी या तणनाशकामुळे मेल्यानंतर खाली बुडते. बुडलेली जलपर्णी कुजून त्याच्यावर आणखी डास वाढतात. आणखी प्रदूषण होते. त्यामुळे ग्लायफोसेट टाकू नये. पावसाळ्यात जलपर्णी नसते. तेव्हा पाणी डायलूट झालेले असते. जलपर्णी वाढू शकत नाही. पण पावसाळ्यानंतर प्रदूषण वाढते आणि जलपर्णी देखील वाढायला सुरुवात होते. एक तर प्रदूषण कमी करायला हवे आणि दुसरे पावसाळ्यानंतर नदीत जलपर्णी संपूर्ण काढावी. त्यामुळे ती वाढणार नाही, असे डॉ. गोखले म्हणाले.

‘एसटीपी’ बसविल्याने नायट्रेट आणि फॉस्फेट कमी होणार नाही. बीओडी, सीओडी कमी होते. एसटीपी ही अर्धी ट्रीटमेंट आहे. सांडपाणी शुध्द करून शेतावर, डोंगरावर पसरवले पाहिजे. त्यातील अन्न घेऊन वनस्पती वाढतील. वनस्पती आणखीन नवीन अन्न तयार करतील. अशा पध्दतीने सांडपाणी शुध्दीकरणाचे प्रयोग आम्ही इतर ठिकाणी केले आहेत.

- डॉ. अजित गोखले, पर्यावरणीय शास्त्रज्ञ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड