शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

ऑनलाइन नको, शाळेतच शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST

या वर्षीर वेळी दहावी पास होऊन कॉलेजमध्ये जाण्यासाठी अनेक उत्सुक असलेले ११ वीचे विद्यार्थी तर अक्षरशः ...

या वर्षीर वेळी दहावी पास होऊन कॉलेजमध्ये जाण्यासाठी अनेक उत्सुक असलेले ११ वीचे विद्यार्थी तर अक्षरशः कॉलेज कधी सुरू होणार म्हणून थेट प्राध्यापकांना वारंवार फोन करीत होते. २३ नोव्हेंबरपासून ९ वी, १०, ११ वी आणि १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत केवळ ऑनलाइन शिक्षणाचाच आधार असलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शिक्षकांपुढे बसून शिकताना १०० टक्के आकलन होत आहे. याबाबत स्वतः या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. उलट शाळा सकाळी ११ ते ५ अशी पूर्णवेळ भरावी. हवेतर आम्ही सकाळी नऊ वाजता शाळेत येऊन अभ्यासक्रम पूर्ण करू, अशी तयारीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

शाळा यंदा धोरणामुळे भरल्या नाही. त्यामुळे कधी नव्हे ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले गेले अजूनही दिले जात आहे. मात्र आता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर पाचवी ते आठवीचे वर्ग भरण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे अध्ययन अनुभव मिळताहेत. या बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणालाच पसंती दर्शविली.

चौकट

ऑनलाइन शिक्षणात विविध अडथळ्यांचा डोंगर

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई या गावापासून खोल डोंगरभागात असलेली गारकोलवाडी वसलेली आहे. अनेक गावांमध्ये अद्याप नेटची सुविधा पोहोचली नाही. सोबतच गरीब पालकांकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात विविध अडथळ्यांचा डोंगर उभा होत असून येथील विद्यार्थ्यांना डोंगरावर येऊन हा डोंगर पास करून चिमुकले शिक्षण घेत आहे. मात्र ऑनलाइनपेक्षा विद्यार्थी व पालकांचा कल प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाकडे असल्याचे दिसून आले.

शाळा बंद असल्याने अनेक दिवस ऑनलाईन शिवाय पर्यायच नव्हता पण त्यात रेंजचा मोठा अडथळा येत होता. ग्रामीण भागात तर कधी लाईट ही नसायची गरिबीमुळे मला दिवसभर शेतीवरही जावे लागत होते. त्यामुळे मी अनेक तासिका गैरहजर होतो. आता शाळा सुरू झाल्याने मी रोज शाळेत येतो.

- प्रतीक शिंदे

--------

बारावी शास्त्र गारकोलवाडी

मला ऑनलाईन पद्धतीने मिळणारे शिक्षण अजिबात आवडले नाही. आता आमची शाळा सुरू झाली आहे. वर्गात सर्वांसोबत बसून शिकताना शिक्षण घेत असल्यासारखे वाटते अभ्यासक्रमही चांगला समजतो.

- प्रसाद शिंदे, गारकोलवाडी

यावर्षी लॉकडाउनच्या काळात मी मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेतले आता शाळेत जाऊन वर्गात बसून शिकत आहे. या दोन्ही पद्धतींपैकी मला प्रत्यक्ष शाळेतील विद्यार्थ्यांना जास्त चांगले वाटत आहे. यामुळे पूर्णवेळ शाळा भरली पाहिजे तेव्हाच अभ्यासक्रम पूर्ण होईल आम्ही तर सरांना रोज सांगत असतो की आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे त्यासाठी आम्ही सकाळी नऊ वाजता ही शाळेत यायला तयार आहोत -सार्थक मोहन थोपटे, चिंचोली मोराची