शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

अवयवदान करून नवरदेव बोहल्यावर! समाजात घालून दिला नवा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 17:48 IST

लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे.

तेजस टवलारकर- 

पिंपरी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. लग्नानंतर अमूक करू, तमूक करू असे मनोदय संकल्प करणारी जोडपी आपण पाहिली असतील. मात्र, लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे. अवयवदान केल्याने कुणाला तरी दृष्टी मिळू शकते, कुणाला जीवनदान मिळू शकते, याचे भान ठेवून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी एका नवरदेवाने अवयदान करून नवा आदर्श घालून दिला आहे. 

जन्म-मृत्यू हेच माणसाच्या आयुष्यातील अंतिम सत्य असले, तरी एखाद्याला जीवनदान देणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच डॉक्टरांना देव मानले जाते.  माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगाचे ठरते. कोणाचेतरी प्राण वाचविण्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे मरावे परी, अवयवदानरुपी उरावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मोनीष कांबळे या तरुणाने लग्नाचे औचित्य साधून अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. 

लग्नसोहळा म्हटलं की, जेवणावळी, बँडबाजा यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु, हा खर्च टाळून सामाजिक संदेश देत मोनीष नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अवयव उपलब्ध न झाल्याने देशात अनेकांना जीव गमवावा लागतो. अनेकांना अवयव मिळण्याची प्रतीक्षा असते. पंरतु अवयव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अवयवदान दिन साजरा करताना प्रत्यक्षात दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे, त्यातूनच हा निर्णय घेतला. 

अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे अवयवदानासाठी समोर येणाऱ्यांची संख्या कमी आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही आपण जग बघू शकतो. अवयवदान केल्यास ते अवयव दुसऱ्यांसाठी उपयोगी येतात. अवयवदानामुळे मरणानंतरही आपण दुसऱ्यांच्या वनात आनंद भरू शकतो. यामुळे अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. अवयवदानासाठी जनजागृती करत राहणार आहे.- मोनीष कांबळे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOrgan donationअवयव दानmarriageलग्न