शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

अवयवदान करून नवरदेव बोहल्यावर! समाजात घालून दिला नवा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 17:48 IST

लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे.

तेजस टवलारकर- 

पिंपरी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. लग्नानंतर अमूक करू, तमूक करू असे मनोदय संकल्प करणारी जोडपी आपण पाहिली असतील. मात्र, लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे. अवयवदान केल्याने कुणाला तरी दृष्टी मिळू शकते, कुणाला जीवनदान मिळू शकते, याचे भान ठेवून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी एका नवरदेवाने अवयदान करून नवा आदर्श घालून दिला आहे. 

जन्म-मृत्यू हेच माणसाच्या आयुष्यातील अंतिम सत्य असले, तरी एखाद्याला जीवनदान देणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच डॉक्टरांना देव मानले जाते.  माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगाचे ठरते. कोणाचेतरी प्राण वाचविण्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे मरावे परी, अवयवदानरुपी उरावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मोनीष कांबळे या तरुणाने लग्नाचे औचित्य साधून अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. 

लग्नसोहळा म्हटलं की, जेवणावळी, बँडबाजा यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु, हा खर्च टाळून सामाजिक संदेश देत मोनीष नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अवयव उपलब्ध न झाल्याने देशात अनेकांना जीव गमवावा लागतो. अनेकांना अवयव मिळण्याची प्रतीक्षा असते. पंरतु अवयव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अवयवदान दिन साजरा करताना प्रत्यक्षात दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे, त्यातूनच हा निर्णय घेतला. 

अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे अवयवदानासाठी समोर येणाऱ्यांची संख्या कमी आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही आपण जग बघू शकतो. अवयवदान केल्यास ते अवयव दुसऱ्यांसाठी उपयोगी येतात. अवयवदानामुळे मरणानंतरही आपण दुसऱ्यांच्या वनात आनंद भरू शकतो. यामुळे अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. अवयवदानासाठी जनजागृती करत राहणार आहे.- मोनीष कांबळे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOrgan donationअवयव दानmarriageलग्न