शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? ३०७ कलम लावणे चुकीचे- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 20:59 IST

महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चुकीची विधाने केली जात आहेत.

पिंपरी: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याची घटना घडली. या प्रकाराचे समर्थन करणार नाही. पण असं का कशामुळे घडले, याचाही विचार करायला हवा. महाराष्ट्रात सध्या सातत्याने छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सातत्याने चुकीची विधाने केली जात आहेत. फुले, शाहू आंबेडकर यांच्यावर जो चिखलफेक, बदनामी करेन. त्यागोष्टीचा जो विरोध करेन तो आपला आहे. शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? आंदोलनकांवर खुनी हल्ला ३०७ कलम लावणे चुकीचे आहे, अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्टवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या विचार वेध प्रशिक्षणात भुजबळ बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे आदी उपस्थित होते.  भूजबळ म्हणाले,  ‘‘राज्यात राज्यपाल, लोढा, सुधाशु त्रिवेदी, चंद्रकांत पाटील अशा विविध नेत्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विरोधात काहीही बोलले जात आहे. हे लोक कशासाठी बोलताहेत. शिवरायांनी माफीपत्र दिले होते. तुम्हाला काय माहित. शिवरायांचा जन्म कुठे झाला. त्यांची कर्मभूमी कोणती हे ज्यांना माहित नाहीत. ते हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत. राष्टÑपुरूषांची बदनामी सुरू आहे. आंदोलन केले म्हणून खुन्नी हल्यांचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे.’’हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी  छगन भूजबळ यांनी हिंदु आणि हिंदुत्ववादी कोण कसे हे सांगताना, ‘‘शिवराय हे हिंदुच त्यांच्या राज्याभिषेकास विरोध करणारे हिंदुत्ववादी. तुकोबा हे हिंदुच, त्यांची गाथा बुडविणरे हिंदुत्ववादी.  संत ज्ञानेश्वर महाराज हे हिंदू, त्यांना वाळीत टाकणारे हिंदुत्ववादी, छत्रपती शाहू महाराज हिंदू. त्यांच्या मृत्यूनंतर जल्लोष करणारे हिंदुत्ववादी. महात्मा गांधी हे सनातनी हिंदू, त्यांना मारणारे हिंदुत्ववादी. असा नवीन हिंदुत्ववाद निर्माण होत आहे. ज्योतिबा फुले यांनी भीक मागितली, असे विधान न शोभणारे आहे.  ते समाजसुधारक आणि उद्योगपती होते. त्यांनी कधीही भिक मागितली नाही. महागाई, दरवाढ, बेरोजगारी विरोधात बोलले की इडी, सीबीआय लावली जाते.  ही दादागिरी सुरू आहे.  कारखाने खासगी उद्योग गुजरातला गेले. गावं कर्नाटकाला आणि मंत्री गुवाहटीला. हे खोके सरकार आहे,’’ अशी टीका केली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळchandrakant patilचंद्रकांत पाटील