शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

२७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? पुण्यासमोर संकट उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:32 IST

गणित जुळून येईना : प्रकल्पात १५६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा what to do water for 27 days?

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, पुणे महानगरपालिकेकडून उचलले जाणारे पाणी आणि येत्या १५ जुलैपर्यंत होणारा पाण्याचा वापर याचे गणित जुळून येत नाही. पुणे व परिसरातील नागरिकांसाठी पुढील १८३ दिवसांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करायचे आहे. मात्र, धरण प्रकल्पात १५६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांच्या २७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फेब्रुवारी महिन्यात धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट पाणीकपातीचा निर्णय घेणार असल्याचे बोलते जात आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यापर्यंत पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. परिणामी पुणे महापालिकेला मार्चपर्यंत दररोज १३५० एमएलडी (०.०४८ टीएमसी) मिळणार आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही जलसंपदा विभागाकडून येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यातील सध्या शिल्लक राहिलेले १८ दिवस, फेब्रुवारीचे २८ दिवस, मार्च महिन्याचे ३१, एप्रिलचे ३०, मे महिन्याचे ३१, जूनचे ३० आणि जुलै महिन्याचे १५ असे एकूण १८३ दिवस पाणी कसे पुरेल, याचा विचार जलसंपदा व पालिका प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे.

सध्या तरी पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला येत्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजेच पुढील ७७ दिवस १३५० एमएलडी पाणी वापरण्यास मिळू शकते. या ७७ दिवसांत पालिकेकडून ३.६९ टीएमसी पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर एप्रिल, मे, जून आणि १५ जुलैपर्यंतचे एकूण १०६ दिवस याच पद्धतीने पाण्याचा वापर सुरू राहिला तर धरणातील ५.०८ टीएमसी पाण्याचा वापर होईल. परिणामी १४ जानेवारी ते १५ जुलैपर्यंत पालिकेकडून ८.७७ टीएमसीएवढे पाणी वापरले जाईल.

खडकवासला धरण प्रकल्पात रविवारी (दि. १३) केवळ १७.०० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु, उन्हाळ्यात धरणातील सुमारे २ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पुढील काळात धरणातील केवळ १५ टीएमसी पाणीच वापरण्यास मिळणार आहे. परंतु, पुढील १८३ दिवसांसाठी पालिकेला ८.७७ टीएमसी पाणी आणि शेतीसाठी रब्बीला ३.५ आणि उन्हाळी आवर्तनासाठी ४ असे एकूण ७.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे.

त्यामुळे प्राप्त परिस्थितीचा विचार करता सध्या एकूण १६.२८ टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र, धरणात केवळ १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही आपत्कालीन परिस्थितीसाठी धरणात १ ते १.५ दीड टीएमसी पाणी शिल्लक ठेवावे लागते. त्यामुळे हे पाणी कुठून येणार, असाही प्रश्न निर्माण होत आहे.कोणते २७ दिवस?पुणेकरांचे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवले जाईल, असे गृहितक मानले तर १८३ दिवस ८.७७ टीएमसी पाणी लागेल. मात्र, शेतीसाठी ७.५० टीएमसी पाणी दिल्यानंतर पुणेकरांना १५६ दिवस पुरेल एवढेच ७.४८ टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहते. त्यामुळे १८३ दिवसांतून १५६ दिवस वजा केले, तर २७ दिवस राहतात. त्यामुळे या २७ दिवसांसाठी पाणी कुठून आणायचे?महत्त्वाचे मुद्दे :च्धरण प्रकल्पातील रविवारचा (दि. १३) पाणीसाठा १७.०० टीएमसीच्रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी लागणारे पाणी ७.५० टीएमसीच्उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन सुमारे २ टीएमसीच्१५ जुलैपर्यंतच्या १८३ दिवसांसाठी लागणारे पाणी ८.७७ टीएमसीच्मागील वर्षाचा १३ जानेवारी रोजीचा पाणीसाठा २१.१३ टीएमसीच्गेल्या वर्षापेक्षा यंदाधरणात ४.१३ टीएमसी पाणीसाठा कमी

पाण्याचे नियोजन गरजेचेजलसंपदा विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणे बांधली आहेत. त्यानुसार दरवर्षी शेतीसाठी आणि पिण्यासाठी किती पाणी दिले जावे, याचे नियोजन विभागातर्फे केले जाते. त्यामुळे शेतीच्या हिश्श्याचे पाणी पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी देता येणार नाही. पालिकेने उपलब्ध पाण्याचा विचार करूनच टाऊन प्लॅनिंग करणे अपेक्षित आहे. सध्या खडकवासला धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे तत्काळ योग्य नियोजन केले पाहिजे. जानेवारीत दोन वेळ पाणी आणि एप्रिल, मे महिन्यात पाणीच नाही, याला नियोजन म्हणता येत नाही.- सुरेश शिर्के, माजी सचिव, जलसंपदा विभाग, तथा अध्यक्ष, भारतीय जलसंपत्ती संस्था, पुणे केंद्र.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी