शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘वडाच्या फांद्यांची पूजा नको’

By admin | Updated: June 9, 2014 05:22 IST

वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा न करता झाडाची पूजा करावी. अगदीच अशक्य असेल, तर प्रतीकात्मक स्वरूपात वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करावी,

पिंपरी : वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा न करता झाडाची पूजा करावी. अगदीच अशक्य असेल, तर प्रतीकात्मक स्वरूपात वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करावी, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने केले आहे.भारतीय स्त्रीच्या जीवनात वटवृक्षाला विशेष महत्त्व आहे. चिरंतन सौभाग्यासाठी भारतीय स्त्रिया वडाची पूजा करतात. पुराणकाळात सावित्री वटवृक्षाचे माहात्म्य जाणत होती. म्हणूनच तिने मूर्च्छा आलेल्या सत्यवानाला वटवृक्षाखाली झोपवले. कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळजवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. मृतवत पतीला प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती, हे तिला माहिती होते. आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो.भारतीय जीवनशैलीत सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा जितका समतोल राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कोठेही सांभाळला गेला नसेल. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा उदात्त वारसा असलेल्या देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. वटपौर्णिमा हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे.हा सण भारतीय स्त्रियासाठी जरी जिव्हाळ्याचा असला, तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरणप्रेमींना पौर्णिमेनंतर रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहावे लागते, असे सचिव भास्कर रिकामे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)