शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

अनुदानाचा टेकू नको, घामाला दाम द्या; कांदा उत्पादकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 23:57 IST

प्रतवारीनुसार सरासरी ३ रुपयांपर्यंत दर : उत्पादनखर्चही निघेना

बारामती : राज्य शासनाने कांद्याला जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदानाबाबत कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आम्हाला अनुदानाचा टेकू नको, तर घामाला दाम द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दिवसेंदिवस घसरत चालेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. आधीच दुष्काळाशी दोन हात करून वाढवलेले पीक मातीमोल किमतीत व्यापाऱ्याच्या हवाली करण्याची वेळ शेतकºयावर आली. त्यामुळे हवालदिल होत शेतकºयांनी कांदा फुकट वाटला.

राज्यभर कांदा उत्पादकांची थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. कांदा फुकट वाटलेल्या शेतकºयांनी दानपेटीत जमा झालेली रक्कम पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीमध्ये पाठवून एकप्रकारे शेतकºयांप्रति असलेल्या असंवेदनशीलतेला चपराक लगावली होती. यावर राज्य शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदानाची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कांद्यासाठी होणारा उत्पादन खर्च, निघणारे उत्पन्न, मिळणारा बाजारभाव आणि शेवटी शेतकºयाच्या हातात येणारा नफा यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या हळवी कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. या कांद्याला प्रतवारीनुसार सरासरी ३ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. एकरी कांद्याचे उत्पादन ७ ते ८ टनापर्यंत निघते. जमिनीच्या प्रतवारीनुसार यामध्ये थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो. रोपे तयार करण्यापासून ते कांदा वाळवून बाजारात विकण्यापर्यंत चार महिन्यांचा कालावधी पार पडतो. या कालावधीत शेतकºयाचे कांदा उत्पादनावर एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च होतो. सध्याच्या बाजारभावानुसार २१ ते २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळते. त्यात शासनाचे २०० रुपयाचे अनुदान जमा केल्यास १४ हजाराची वाढ होऊ शकते. तरीही उत्पादन खर्चाचा आकडा पार होत नाही, असे वास्तव आहे. त्यामुळे ‘आम्हाला नको सुट-सबसिडी, हवा घामाला दाम’ अशी मागणी कांदा उत्पादक शेतकºयांमधून होऊ लागलीआहे.कांदा उत्पादक शेतकºयाला अनुदान देऊन शासन फक्त शेतकºयांचे अश्रू पुसण्याचे नाटक करीत आहे. जाहिरातबाजीसाठी असे निर्णय घेतले जातात. मात्र आम्हाला अनुदान नको, तर आमच्या कांद्याला सरसकट १५ रुपये हमीभाव हवा आहे. व्यापारी जर कांदा या भावाने घेत नसतील तर राज्य शासनाने १५ रु. हमीभावाने कांदा खरेदी करावा तरच कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय मिळेल.- दिनेश काळे, कांदा उत्पादक शेतकरी, जैनकवाडीराज्य शासन व केंद्र सरकार शेतकºयांची थट्टा करीत आहे. बाहेरच्या देशातून कांदा आयात करून येथील शेतकºयांच्या कांद्याचे भाव पाडले जात आहेत. कांद्याचे भाव पडले की येथील प्रक्रिया उद्योग मातीमोल किमतीत हाच कांदा खरेदी करतात. मुळात कांद्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये केलेला समावेशच व्यवहार्य नाही. कांदा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट केल्यानेच बाहेरून येणाºया कांद्यावर कोणत्याही प्रकारचे आयात शुल्क आकारले जात नाही. अनुदान दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी ठोस निर्णयांची गरज आहे. बाहेरील देशातून भारतात निर्यात होणाºया कांद्यावर जर कर आकारणी केली तरच येथील कांदा उत्पादकाला चांगला दर मिळेल. मात्र शासन केवळ उद्योगधार्जिणे निर्णय घेत आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना येथील शेतमाल स्वस्तात मिळत आहे.- पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती