शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

नाटक स्वरूपात चित्रपट मांडू नये, सुबोध भावे यांचा निर्मात्यांना कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:02 IST

साहित्यासोबतच मराठी नाटकांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली; परंतु नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना, नाटकाच्या कथेचे चित्रपटात रूपांतर करणे अपेक्षित असते. नाटकात जे दाखवले गेले तेच चित्रपटात पाहायला मिळेल, अशा समजुतीमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहायला येत असतील तर मराठी प्रेक्षकांमध्ये ही चुकीची संकल्पना रुजली आहे. निर्मात्यांनी देखील नाटकच चित्रपट स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कानमंत्र अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी निर्मात्यांना दिला.

पुणे - साहित्यासोबतच मराठी नाटकांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली; परंतु नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना, नाटकाच्या कथेचे चित्रपटात रूपांतर करणे अपेक्षित असते. नाटकात जे दाखवले गेले तेच चित्रपटात पाहायला मिळेल, अशा समजुतीमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहायला येत असतील तर मराठी प्रेक्षकांमध्ये ही चुकीची संकल्पना रुजली आहे. निर्मात्यांनी देखील नाटकच चित्रपट स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कानमंत्र अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी निर्मात्यांना दिला.संवाद पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘संवाद मराठी चित्रपटांचा’ या मराठी चित्रपट संमेलनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित दोन दिवसीय ‘ऋणानुबंध’ या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम; तसेच संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, राजू कावरे, वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. भावे म्हणाले की, नाटक हे माध्यम वेगळे आहे आणि चित्रपट हे वेगळे माध्यम आहे. नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना त्या चित्रपट दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला त्या नाटकाच्या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून नक्की कोणता दुसरा आयाम दिसतो आणि तो आयाम तो कसा मांडतो हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले, तर निकिता मोघे यांनी आभार मानले.मराठी चित्रपट महोत्सवांनीमहाराष्ट्राच्या सीमा ओलांडाव्यातमहाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यात आणि शहरांतदेखील मराठी लोकांची संख्या खूप आहे. एवढेच नव्हे, तर भारताबाहेर देखील विविध देशांमध्ये मराठी भाषिकांचा टक्का वाढत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट महोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून छोट्या-मोठ्या स्वरूपात चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जावे, अशी अपेक्षा सुबोध भावे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :marathiमराठीcinemaसिनेमाSubodh Bhaveसुबोध भावे