शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मानधन नको, सन्मान हवा, शमा भाटेंचे महापालिकेला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:46 IST

कलाकार कलेच्या प्रेमाखातर आणि स्वत:च्या आनंदासाठी साधना करीत असतात. कलाकारांना महापालिकेकडून सन्मानाची, त्यांच्या कामाची बूज राखली जावी, एवढीच अपेक्षा असते. दिग्गजांच्या नावाचा सन्मान मिळणे, ही कलाकारांसाठी जगण्याची पुंजी असते.

पुणे - कलाकार कलेच्या प्रेमाखातर आणि स्वत:च्या आनंदासाठी साधना करीत असतात. कलाकारांना महापालिकेकडून सन्मानाची, त्यांच्या कामाची बूज राखली जावी, एवढीच अपेक्षा असते. दिग्गजांच्या नावाचा सन्मान मिळणे, ही कलाकारांसाठी जगण्याची पुंजी असते. त्यांची नजर कधीच पुरस्कार किंवा मानधनाकडे नसते. त्यामुळे महापालिकेने आर्थिक गणितांमुळे सन्मानाशी तडजोड करू नये, अशी विनंती ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांनी पत्राद्वारे केली आहे. हे पत्र लवकरच महापालिकेला देण्यात येईल.सांस्कृतिक महोत्सवांवर होणारी उधळपट्टी रोखण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढल्यानंतर पुणे महापालिकेचे पुरस्कार रखडले आहेत. या पुरस्कारांसाठी किमान मानपत्र देण्याची तरतूद करण्यात यावी, नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन महापौरांकडे जमा करुन पुरस्कारांची रक्कम उभी करावी, असा प्रस्ताव नगरसेवक आबा बागुल यांनी महापालिकेला दिल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर, नादरूप संस्थेच्या शमा भाटे यांनी या पत्रातून कलाकारांच्या भावना महापालिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.‘सांस्कृतिक महोत्सवाबाबत होणारी उधळपट्टी रोखण्याचा राज्य शासनाने दिलेला आदेश आणि त्यामुळे रखडलेले पुरस्कार, ही बाब कोणत्याही कलाकारासाठी वेदनादायी आहे. ज्यांचा जगाने गौरव करावा, अशा भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गुरु रोहिणी भाटे, पठ्ठे बापूराव अशा भविष्यात काम करीत राहण्यासाठी मिळणारी प्रेरणा असते. महापालिकेच्या पुरस्कारातून ‘भारतरत्न’ मिळाल्याच आनंद आणि समाधान देतो. पुरस्काराइतकेच मानपत्रालाही महत्त्व आहे. त्यामुळे आबा बागुल तसेच पुणे महापालिकेबाबत कलाकार कायमच कृतज्ञराहतील. मात्र, कलाकारांसाठी मानधनापेक्षा सन्मान जास्त महत्त्वाचा असतो. पुणे शहराला तसेच पुण्यातील कलाकारांना मिळणाऱ्या सन्मानाची आर्थिक गणितामुळे तडजोड केली जाऊ नये,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.महापालिकेने गांभीर्याने विचार करावायाबाबत ‘लोकमत’शी बोलताना शमा भाटे म्हणाल्या, ‘पं. गुरू रोहिणीताई भाटे यांच्या नावाने पुरस्कार सुरू व्हावा, यासाठी आबा बागुल यांच्याशी चर्चा करताना कलाकारांनी मानधनाची कधी विचारणाही केली नाही, आग्रह धरला नाही. परंतु, आपले वास्तव्य असणाºया शहरातून, आपल्याच महापालिकेकडून नामवंत कलाकारांच्या नावाने आपल्या कार्याचा सन्मान व्हावा, ही गोष्ट कोणत्याही कलाकाराला निश्चितपणे हवीहवीशी वाटते. त्यामुळे महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा.’’

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या