शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

मुलींनो, नका भुलू ‘वरलिया रंगा!’

By admin | Updated: January 24, 2016 02:06 IST

लग्नाचे आमिष दाखवणे..., प्रेमाच्या जाळ्यात ओढणे... सहानुभूती दाखवून मन जिंकणे... मला तुझी अतिकाळजी आहे, असे भासवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवणे..., प्रेमाच्या जाळ्यात ओढणे... सहानुभूती दाखवून मन जिंकणे... मला तुझी अतिकाळजी आहे, असे भासवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे, अशा घटनांमध्ये शहरात वाढ झाली आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून या मुली घटनेच्या शिकार बनणार नाहीत. शहरात दोन महिन्यांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये जास्त प्रकरणे ही लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची आहेत. त्या हेतूने तिच्यावर वारंवार एकटेपणाच्या संधीचा फायदा साधत, तसेच सामूहिकरीत्या बलात्कार केला जात आहे. चिंचवडमध्ये शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. शाळेत शिकत असताना मुलींना अनेक गोष्टींचे आकर्षण निर्माण होते. मुली-मुलींमध्येच ईर्ष्या उत्पन्न होते. त्या माध्यमातून स्पर्धा वाढते. सहावी ते सातवीपासूनच मुलींचा कुटुंबाशी संवाद हरवलेला असतो. कधी कधी घरातील भांडणे, कलह यांमुळे घरात विसंवाद निर्माण होतो. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बाहेरील आकर्षणाला बळी पडण्याचे मुलींचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबाच्या अशा वाईट परिस्थितीत आपल्याला समजून घेणारे, आपली काळजी (?) घेणारे कोणीतरी भेटले, की मुलीचे भान हरपून जाते. मुलाकडे असलेल्या दुचाकी, चारचाकी किंंवा हॉटेल, चित्रपट अशा मनोरंजनात्मक पैसे उडविण्याच्या फॅशनला ‘ती’ बळी पडते.निगडी, चिखली, भोसरी, चिंचवड, लोणावळा आदी परिसरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले आहेत. काही मुलींना फूस लावली गेली आहे. तर काही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात आपण काय करतोय याचे भानच त्यांना राहत नाही. अशा वेळी कुटुंबात संवाद कमी असणे हे मुख्य कारण आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर आपला पाल्य नेमका काय करतो, शाळा-महाविद्यालयाच्या वेळेतही विद्यार्थी बाहेर फिरत असतात. याबद्दल पालक अनभिज्ञ असतात. (प्रतिनिधी)आपला पाल्य वेळेत घरी येत नसेल अथवा पैसे चोरी करण्याची सवय लागली असेल, तर अशा वेळी पालकांनी मुलांना जास्त सूट देता कामा नये. वेळीच अशा गोष्टींना आवर घालणे गरजेचे आहे. घरात खोटे बोलणे, विसंवाद असणे; जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर बोलणे. सतत व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर असणे या गोष्टींना आळा घालणे गरजेचेच आहे.पालकांनी मुलांना समजून घ्यावेमुलींना स्पर्शातील चांगला-वाईटपणा कळणे गरजेचे आहे. याकरिता शाळास्तरांवरच मुलींना अशा गोष्टींचे आकलन होणे आवश्यक आहे. मुलींच्या, तसेच मुलांच्या वर्तणुकीतील बदल समजायला हवेत. शिक्षक, तसेच पालकांना विद्यार्थ्यांच्या वर्तनाची उकल असणे आवश्यक आहे. मात्र, मुलांच्या विकृतीत वाढ होत आहे, ही बाब गंभीर आहे. - डॉ. धनंजय आष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञअल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. यासाठी नक्की कोणता वयोगट कारणीभूत आहे, हे पाहणे गरजेचे आहे. मात्र, पाशवी मनोवृत्तीत वाढ होत आहे, हे तितकेच खरे आहे. पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. अशा घटना घडल्यास त्या विषयी मोकळेपणाने बोलू शकण्यासाठी कुटुंबात सुसंवाद असणे आवश्यक आहे. -डॉ. किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय महिला अत्याचार कमी होत आहेत. शाळा व महाविद्यालयांत जनजागृतीचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी टवाळखोरांचा टवाळपणा सुरू आहे, अशा ठिकाणी कारवाई सुरू आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटना आता प्रत्यक्षपणे समजतात. सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याचे काम शाळांमध्ये केले आहे. मुलींनी सतर्क राहणे आवश्यक आहे. - योगिता कुदळे, महिला पोलीस समुपदेशक, पुणे शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी अ‍ॅँटिरॅगिंग समिती स्थापन केली आहे. विद्यालयात सीसीटीव्ही कॅ मेरे बसविलेले आहेत. टवाळखोर मुलांना पोलिसांनी चांगले धडे शिकवायला हवेत. पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विद्यालय सुटताना व भरताना अशा टवाळांवर कारवाई गरजेची आहे. - अशोक पाटील, प्राचार्य, राजमाता जिजाऊ विद्यालयशाळा-महाविद्यालय स्तरावर वारंवार पालक व शिक्षकांची बैठक होणे गरजेचे आहे. मुली खासगी बसने प्रवास करीत असतील, तर त्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच, पालकांनी सजग राहायला हवे. पालकांनी पाल्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. पाल्याशी नाते स्नेहाचे ठेवावे. स्वसंरक्षणाचे धडे पाल्याला देणे गरजेचे आहे. - श्रद्धा जैन, उपप्राचार्य, ताराबाई शंकरलाल मुथा विद्यालय मुलींना स्वसंरक्षण आवश्यक आहे. इतरांवर अवलंबून न राहता तिला संकटाशी सामना करता यायला हवा. असे प्रकार घडल्यास न घाबरता पोलिसांत संपर्क करणे आवश्यक आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या कार्यशाळा व चर्चासत्र या विषयांवर होणे आवश्यक आहे. - संगीता प्रधान, महिला दक्षता समिती, सदस्य