शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

विद्रुपीकरण नको; सामाजिक बांधिलकी जपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 05:57 IST

लोकांना त्रास व्हायला नको, याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचे विद्रुपीकरण झाल्याने उत्सवात आनंद राहत नाही.

जुगल राठी

लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. उत्सवातून समाजप्रबोधन व्हावे, हा त्यांचा मूळ हेतू होता. गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी जपून साजरा करावा. पुण्यातील गणेशोत्सवाची जागतिक पातळीवर नोंद केली जाते. भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सुरुवात केली. सध्याच्या परिस्थितीत पुण्यात गणेशोत्सवाला मर्यादा राहिली नाही. उत्सव म्हणजे आनंद असायला पाहिजे.

लोकांना त्रास व्हायला नको, याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचे विद्रुपीकरण झाल्याने उत्सवात आनंद राहत नाही. ढोल-ताशा हे पारंपरिक वाद्य आहे असे म्हणतात, पण मंडळांनी त्याची मर्यादा ओलांडली आहे, तसेच पुण्यात अनेक पथकांची संख्या वाढली आहे. मंडळासमोर ढोल पथक लावले की, मिरवणूक थाटात होते, पण एका मंडळाने एक पथक लावले आणि नियमांचे उल्लंघन केले नाही, तर आवाजाचा त्रास होणार नाही. गणेशोत्सवात समाजप्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकबंदी, प्रदूषण, नदी सुरक्षा, पर्यावरण वाचवा, स्त्री सुरक्षा या असे विषय हाताळणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात सहभागी होणारी मंडळे, संस्था, सामान्य माणूस संवेदनशीलता विसरत चालला आहे. या वर्षी कोल्हापूर सांगली भागात पूर आला. याची जाणीव ठेवून आपण उत्सव साजरा केला पाहिजे. लोकांचे संसार वाहून गेले. त्यांना मदत करण्याबरोबरच दु:खात सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे. उत्सवात गर्दी, वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. गर्दीचा लोकांना त्रासही होतो. चोरी करण्याचे प्रमाणही वाढते. रस्त्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी मंडळांनी जबादारी घेणे गरजेचे आहे. पोलीस सर्व ठिकाणी लक्ष देत असतात. कार्यकर्त्यांनी उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करावे. वाहतूककोंडी कमी होण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत. कोणाचा मांडव मोठा यामध्ये स्पर्धा चालू झाली आहे. अरुंद रस्ते त्यात या मांडव, कमानी यांची भर पडते. याचा सामान्य नागरिकाला त्रास होत आहे. नियम पाळूनच सर्व गोष्टी केल्या, तर लोकांना उत्सवातून आनंद घेता येईल. मांडवाच्या खाली होणारे गैरप्रकार, उत्सवातील चुकीच्या गोष्टी, यामुळे तो उत्सव राहत नाही. चांगल्या गोष्टींना कधीही विरोध होणार नाही.

लेखक सामाजिक कार्यकर्ते, पुणे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019