शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्रुपीकरण नको; सामाजिक बांधिलकी जपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 05:57 IST

लोकांना त्रास व्हायला नको, याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचे विद्रुपीकरण झाल्याने उत्सवात आनंद राहत नाही.

जुगल राठी

लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. उत्सवातून समाजप्रबोधन व्हावे, हा त्यांचा मूळ हेतू होता. गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी जपून साजरा करावा. पुण्यातील गणेशोत्सवाची जागतिक पातळीवर नोंद केली जाते. भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सुरुवात केली. सध्याच्या परिस्थितीत पुण्यात गणेशोत्सवाला मर्यादा राहिली नाही. उत्सव म्हणजे आनंद असायला पाहिजे.

लोकांना त्रास व्हायला नको, याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचे विद्रुपीकरण झाल्याने उत्सवात आनंद राहत नाही. ढोल-ताशा हे पारंपरिक वाद्य आहे असे म्हणतात, पण मंडळांनी त्याची मर्यादा ओलांडली आहे, तसेच पुण्यात अनेक पथकांची संख्या वाढली आहे. मंडळासमोर ढोल पथक लावले की, मिरवणूक थाटात होते, पण एका मंडळाने एक पथक लावले आणि नियमांचे उल्लंघन केले नाही, तर आवाजाचा त्रास होणार नाही. गणेशोत्सवात समाजप्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकबंदी, प्रदूषण, नदी सुरक्षा, पर्यावरण वाचवा, स्त्री सुरक्षा या असे विषय हाताळणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात सहभागी होणारी मंडळे, संस्था, सामान्य माणूस संवेदनशीलता विसरत चालला आहे. या वर्षी कोल्हापूर सांगली भागात पूर आला. याची जाणीव ठेवून आपण उत्सव साजरा केला पाहिजे. लोकांचे संसार वाहून गेले. त्यांना मदत करण्याबरोबरच दु:खात सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे. उत्सवात गर्दी, वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. गर्दीचा लोकांना त्रासही होतो. चोरी करण्याचे प्रमाणही वाढते. रस्त्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी मंडळांनी जबादारी घेणे गरजेचे आहे. पोलीस सर्व ठिकाणी लक्ष देत असतात. कार्यकर्त्यांनी उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करावे. वाहतूककोंडी कमी होण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत. कोणाचा मांडव मोठा यामध्ये स्पर्धा चालू झाली आहे. अरुंद रस्ते त्यात या मांडव, कमानी यांची भर पडते. याचा सामान्य नागरिकाला त्रास होत आहे. नियम पाळूनच सर्व गोष्टी केल्या, तर लोकांना उत्सवातून आनंद घेता येईल. मांडवाच्या खाली होणारे गैरप्रकार, उत्सवातील चुकीच्या गोष्टी, यामुळे तो उत्सव राहत नाही. चांगल्या गोष्टींना कधीही विरोध होणार नाही.

लेखक सामाजिक कार्यकर्ते, पुणे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019