शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात राजकारण येता कामा नये- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:53 IST

शिक्षण क्षेत्रात चुकीच्या गोष्टी घडल्यास त्याविरोधात आवाज उठवण्याची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

पुणे : ‘शिक्षण क्षेत्रात चुकीच्या गोष्टी घडल्यास त्याविरोधात आवाज उठवण्याची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षणाचे धोरण, शिक्षण अधिकार, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी काम करण्याची गरज आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शिक्षणात राजकारण येता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कार सोहळ्यात सुळे बोलत होत्या. पुणे जिल्ह्यांतील ५२ गुणवंत शिक्षकांना आणि १३ उपक्रमशील शाळांना त्यांच्या हस्ते गौरवले. खासदार मधुकर कुकडे, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचेजिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा राष्ट्रवादी महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, अ‍ॅड. अशोक खळदकर, शिवाजी खांडेकर, सुरेश कांचन, शिवाजी किलबिले, दिलीप वाल्हेकर, राजेश गायकवाड या वेळी उपस्थित होते.अरुण थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जितेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण काकडे यांनी आभार मानले.>सुळे म्हणाल्या, ‘आधुनिक काळात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले, तरी शिक्षकच हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकाला बाजूला ठेवून केवळ तंत्रज्ञानामुळे शिक्षणव्यवस्था सुधारणार नाही. शिक्षकांनी शिक्षणासंदर्भात धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे. शिक्षणाच्या बाबतीत आज इतिहाससारख्या विषयाच्या संदर्भात घटना घडत आहेत.’काळे म्हणाले, ‘समाजाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते. शिक्षक चुकला तर अख्ख्या पिढीचे नुकसान होेते. सातत्यातून नवीन काहीतरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. गेली ६ वर्षे शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरतीदेखील बंद आहे. आगामी अधिवेशनात शिक्षकांच्या प्रश्नांबाबत अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल व शिक्षकांसाठी सातवा आयोग हा विनात्रुटी मिळण्यासाठी प्रयत्न करू.’

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे