शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये, सर्वांनीच थाेडे सबुरीने घ्यावे ; रामदास अाठवलेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 19:05 IST

राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल.त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबूरीने घ्यावे. असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पुणे : राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल.त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबुरीने घ्यावे.तसेच मंदीर बांधण्यासाठी केंद्र शासनावर आॅर्डिन्स काढण्याबाबत दबाव आणू नये,भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करावा,असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.

    आरपीआयच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.यावेळी आरपीआयचे शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे,पुण्याचे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे आदी उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आयोध्या दौराबाबत बोलताना आठवले म्हणाले,भारतीय जनता पक्षाची मुस्लिम आघाडी असून अनेक मुस्लिम बांधव शिवसेनेच्या पाठीशी आहे.त्यामुळे दोंंन्ही पक्षांनी राम मंदीर बांधण्याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी. मुस्लिम समाजावर दबाव आणून राम मंदीर बांधू नये. तसेच आयोध्येत राम मंदीर,मशीद आणि बौध्द विहारासाठी सुध्दा जागा उपलब्ध करून द्यावी.सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून मी स्वत: आयोध्येला जाणार आहे.तसेच आयोध्येमधील हिंदू व मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधून यावर सामोपचाराने मार्ग काढण्याबाबत चर्चा करणार आहे.मशीदीच्या जागेवर एखादी शैक्षणिक संस्था सुरू करता येईल का? याबाबत संवाद साधणार आहे.आयोध्येतील वादग्रस्त जागा सोडून बौध्द विहारासाठी सुध्दा इतर ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी,या बाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे,असेही आठवले म्हणाले.         आरपीआयतर्फे आयोजित केल्या जाणा-या विदर्भ मेळाव्याबाबत बोलताना आठवले म्हणाले,येत्या 20 जानेवारी रोजी नागपूर येथे विदर्भ मेळावा आयोजित केला आहे.त्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जाणार असून भूमिहिनांना जंगलाच्या जमिनीचे वाटप करावे,अशी मागणी करणार आहे.तसेच येत्या 10 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आरपीआयकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय