शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
3
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
4
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
5
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
6
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
7
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
8
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
9
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
10
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
11
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
12
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
13
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
14
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
15
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
16
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
17
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
18
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
19
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
20
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

नदीपात्रातील एक दगडही उचलू देणार नाही

By admin | Updated: January 21, 2015 00:25 IST

दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने विठ्ठलवाडी ते वारजे या नदीपात्रातील रस्त्याचे काम १५ दिवसांच्या आत उखडून टाकण्याचे आदेश नुकतेच महापालिकेला दिले

पुणे : दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने विठ्ठलवाडी ते वारजे या नदीपात्रातील रस्त्याचे काम १५ दिवसांच्या आत उखडून टाकण्याचे आदेश नुकतेच महापालिकेला दिले असले, तरी या ठिकाणचा एक दगडही पालिकेला हलवू न देण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी दिला. तसेच, या ठिकाणी पालिकेचा जेसीबी फिरकल्यास आधी तो आमच्या अंगावरून फिरवावा लागेल, अशा शब्दांत आपला संतापही या नागरिकांनी व्यक्त केला. लवादाच्या निर्णयानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह मंगळवारी या रस्त्याची पाहणी करून या परिसरातील नागरिकांशी चर्चा केली. दरम्यान, या प्रकरणी महापालिका स्थानिक नागरिकांच्या समवेत असून, कोणतेही बांधकाम काढण्यात येणार नाही. तसेच, या रस्त्याची सद्य:स्थिती सर्वोच्च न्यायालयात मांडून हा निकाल महापालिकेच्या बाजूने लागावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन धनकवडे यांनी रहिवाशांना दिले. लवादाच्या निर्णयानुसार, या रस्त्यासाठीचा बांध काढल्यास पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. हा बांध नसताना पाणी शिरल्याने एका नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला असून, नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. पथ विभागाचे प्रमुख विवेक खरवडकर, नगरसेवक श्रीकांत जगताप, नगरसेविका मंजूषा नागपुरे, माजी नगरसेवक बाळासाहेब कापरे, शैलेश चरवड, काका चव्हाण, हेमंत जगताप, कुमार गोसावी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नदीपात्रातील पाणी सोसायट्यांत घुसत असल्याने पालिकेने या ठिकाणी बांध घातला होता. त्यानंतर त्या ठिकाणी रस्ता प्रस्तावित करण्यात आला. मात्र, ही बाब पालिकेकडून लवादासामोर योग्य पद्धतीने न मांडली गेल्याने ही वेळ ओढावली असून, सर्वोच्च न्यायालयात तरी प्रत्यक्ष स्थिती योग्य पद्धतीने मांडली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यासाठी पालिकेला आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याची तयारी या वेळी नागरिकांनी दर्शविली, तसेच या परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असून, ते न्यायालयात सादर करण्याची मागणी करण्यात आली.हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. तसेच, तो काढला गेल्यास पावसाळ्यात समस्या निर्माण होईल. त्यामुळे महापालिका लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांची मदतही घेण्यात येईल. - कुणाल कुमार, आयुक्तनदीपात्रात विठ्ठल मंदिर ते वारजे (बाह्यवळण महामार्ग) हा रस्ता सिंहगड रस्त्याला पर्यायी म्हणून समजला जातो. रस्ता मार्गी लागल्यास धायरीपासून सिंहगडपर्यंत जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता मिळणार आहे. सध्या सिंहगड रस्त्यावरून दांडेकरपूल ते धायरीपर्यंत रोज सरासरी साडेतीन लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच आहे. ही वाहतूक विठ्ठल मंदिरापासून वारजे बाह्यवळण मार्गाकडे वळविण्यासाठी हा रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्यामुळे धायरीच्या पुढे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध होणार असून, सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच, सिंहगड रस्ता ते वारजे हे अंतरही अडीच ते तीन किलोमीटरवर येणार आहे. या रस्त्यासाठी महापालिका स्थानिक नागरिकांच्या समवेत आहे. हा रस्ता काढला जाणार नाही. लवादाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल. त्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूकही करण्यात येणार आहे. - दत्तात्रय धनकवडे, महापौर