शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अभिजातता मागून घ्यायची गोष्ट नाही; रवी परांजपे; दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:04 IST

अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभकलात्मक उद्यमशील अभिजातता उदयास आली असती तर वाचक वाढले असते : परांजपे

पुणे : सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग आपण स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे. अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या वेळी ‘रत्नाकर पारितोषिक’ मौज दिवाळी अंकासाठी मोनिका गजेंद्रगडकर, रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘ललित’ या दिवाळी अंकासाठी अशोक कोठावळे, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘समदा’ या दिवाळी अंकासाठी संपादिका मनस्विनी प्रभुणे, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘साहित्य शिवार’ या दिवाळी अंकासाठी जयराम देसाई यांना देण्यात आले. त्याचबरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाइन दिवाळी अंकाचे पारितोषिक राम जगताप यांना, ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक’ वर्षा तोडमल  आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘अक्षर’मधील  ‘आवर्त’ या कथेकरिता विजय खाडिलकर यांना प्रदान करण्यात आले, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘शब्दशिवार’ या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘येडापिसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला’ या लेखाला देण्यात आले. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, तसेच ज्योतिषतज्ज्ञ चंद्रकांत शेवाळे व स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते. परांजपे म्हणाले, ‘‘कलात्मक उद्यमशील अभिजातता उदयास आली असती तर वाचक वाढले असते, पण ही कलात्मक अभिजातता वाढली आहे का नाही हे आपण पाहिलेच नाही.’’  

वि. दा. पिंगळे यांनी  प्रास्ताविक केले.  श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन  केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. 

वाचनसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण गरजेचे प्रा. मिलिंद जोशी यांनी संंमेलनसमाप्तीनंतर ग्रंथप्रदर्शनात २ कोटींची उलाढाल झाली अशा बातम्या येतात, मग वाचकसंख्या कमी का दिसते? याकडे लक्ष वेधून वाचनसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण होण्याची गरज असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना जी लोक दिवाळी अंकांकडे केवळ पैसा कमावण्याच्या हेतूने न पाहता वाचकांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी दिवाळी अंकांची निर्मिती करण्याची धडपड करीत असतात, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षा मनस्विनी प्रभुणे यांनी व्यक्त केली. 

‘साहित्य शिवार’चा गौरवमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिवाळी स्पर्धेत यंदा चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत श. वा. किर्लोस्कर यांच्या नावाचे उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘साहित्य शिवार’ या दिवाळी अंकाला सन्मानपूर्वक प्रदान केले. रवी परांजपे यांच्या हस्ते ‘साहित्य शिवार’चे संपादक जयराम देसाई यांनी पुरस्कार स्वीकारला.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदmarathiमराठीPuneपुणे