शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

जिल्हा हगणदरीमुक्तीवर होणार शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:07 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता.

पुणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता. या सर्वेक्षणातून सुटलेल्या नागरिकांचे पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना स्वच्छतागृहे बांधून देऊन त्यांचा समावेश पायाभूत सर्वेक्षणात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या नुसार जिल्ह्यात जवळपास ११ हजार ८८७ कुटुंबांची नोंद करण्यात आली असून, या पैकी ८ हजार २३८ कुटुंबांना स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत उर्वरित कुटुंबाचेही स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, जिल्हा खऱ्या अर्थाने हगणदरीमुक्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील शौचालय बांधकामात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे.राज्य शासनाकडून पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील कुटुंबांचे शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची मुदत २८ फेब्रुवारी देण्यात आली होती. राज्य शासनाकडून यामध्ये १५ दिवसांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित ३ हजार ६४९ कुटुंबांचे स्वच्छतागृह बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वाढविण्यात आले. ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत येत्या १५ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी उर्वरित तीन हजार ६४९ स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहे. २०१७ मध्ये जिल्हा हगणदरीमुक्त जाहीर करण्यात आला होता. मात्र, पायाभूत सर्वेक्षणात काही कुटुंबे राहिली होती. त्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे. स्वच्छतागृह बांधून त्याचे छायाचित्र अपलोड केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहन स्वरूपात १२ हजार रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच वितरित केले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या राहिलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामानंतर तो दर्जा निश्चित होण्यास मदत मिळणार आहे.या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वापर याबाबत गावपातळीवर ग्रामसेवकाबरोबर नव्याने नेमणूक केलेल्या स्वच्छतागृहांची मदत या कामासाठी होत आहे. या साठी जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून या द्वारे या कामाचे नियंत्रण केले जात आहे.स्वच्छतागृहे नसणाऱ्या नागरिकांना ते बांधण्यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हा संपर्क अधिकारी हे गाव भेटीदरम्यान प्रोत्साहित करत होते. यामुळे या कामाला गती मिळत आहे. विस्तार अधिकारी पंचायत यांच्यामार्फत गटनिहाय कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामकाज केले जात आहे. या सर्व यंत्रणांनी येत्या १५ दिवसांत उर्वरित स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.पायाभूत सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्याची संधी राज्य शासनाकडून मिळाल्याने जिल्ह्यातील ११ हजार ८८७ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यातील राहिलेल्या ३ हजार ६४९ कुटुंबांच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.- सूरज मांढरे,मुख्य कार्यकारी अधिकारी ं