शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

जिल्हा हगणदरीमुक्तीवर होणार शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:07 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता.

पुणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता. या सर्वेक्षणातून सुटलेल्या नागरिकांचे पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना स्वच्छतागृहे बांधून देऊन त्यांचा समावेश पायाभूत सर्वेक्षणात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या नुसार जिल्ह्यात जवळपास ११ हजार ८८७ कुटुंबांची नोंद करण्यात आली असून, या पैकी ८ हजार २३८ कुटुंबांना स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत उर्वरित कुटुंबाचेही स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, जिल्हा खऱ्या अर्थाने हगणदरीमुक्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील शौचालय बांधकामात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे.राज्य शासनाकडून पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील कुटुंबांचे शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची मुदत २८ फेब्रुवारी देण्यात आली होती. राज्य शासनाकडून यामध्ये १५ दिवसांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित ३ हजार ६४९ कुटुंबांचे स्वच्छतागृह बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वाढविण्यात आले. ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत येत्या १५ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी उर्वरित तीन हजार ६४९ स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहे. २०१७ मध्ये जिल्हा हगणदरीमुक्त जाहीर करण्यात आला होता. मात्र, पायाभूत सर्वेक्षणात काही कुटुंबे राहिली होती. त्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे. स्वच्छतागृह बांधून त्याचे छायाचित्र अपलोड केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहन स्वरूपात १२ हजार रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच वितरित केले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या राहिलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामानंतर तो दर्जा निश्चित होण्यास मदत मिळणार आहे.या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वापर याबाबत गावपातळीवर ग्रामसेवकाबरोबर नव्याने नेमणूक केलेल्या स्वच्छतागृहांची मदत या कामासाठी होत आहे. या साठी जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून या द्वारे या कामाचे नियंत्रण केले जात आहे.स्वच्छतागृहे नसणाऱ्या नागरिकांना ते बांधण्यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हा संपर्क अधिकारी हे गाव भेटीदरम्यान प्रोत्साहित करत होते. यामुळे या कामाला गती मिळत आहे. विस्तार अधिकारी पंचायत यांच्यामार्फत गटनिहाय कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामकाज केले जात आहे. या सर्व यंत्रणांनी येत्या १५ दिवसांत उर्वरित स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.पायाभूत सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्याची संधी राज्य शासनाकडून मिळाल्याने जिल्ह्यातील ११ हजार ८८७ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यातील राहिलेल्या ३ हजार ६४९ कुटुंबांच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.- सूरज मांढरे,मुख्य कार्यकारी अधिकारी ं