शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हगणदरीमुक्तीवर होणार शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:07 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता.

पुणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता. या सर्वेक्षणातून सुटलेल्या नागरिकांचे पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना स्वच्छतागृहे बांधून देऊन त्यांचा समावेश पायाभूत सर्वेक्षणात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या नुसार जिल्ह्यात जवळपास ११ हजार ८८७ कुटुंबांची नोंद करण्यात आली असून, या पैकी ८ हजार २३८ कुटुंबांना स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत उर्वरित कुटुंबाचेही स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, जिल्हा खऱ्या अर्थाने हगणदरीमुक्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील शौचालय बांधकामात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे.राज्य शासनाकडून पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील कुटुंबांचे शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची मुदत २८ फेब्रुवारी देण्यात आली होती. राज्य शासनाकडून यामध्ये १५ दिवसांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित ३ हजार ६४९ कुटुंबांचे स्वच्छतागृह बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वाढविण्यात आले. ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत येत्या १५ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी उर्वरित तीन हजार ६४९ स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहे. २०१७ मध्ये जिल्हा हगणदरीमुक्त जाहीर करण्यात आला होता. मात्र, पायाभूत सर्वेक्षणात काही कुटुंबे राहिली होती. त्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे. स्वच्छतागृह बांधून त्याचे छायाचित्र अपलोड केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहन स्वरूपात १२ हजार रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच वितरित केले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या राहिलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामानंतर तो दर्जा निश्चित होण्यास मदत मिळणार आहे.या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वापर याबाबत गावपातळीवर ग्रामसेवकाबरोबर नव्याने नेमणूक केलेल्या स्वच्छतागृहांची मदत या कामासाठी होत आहे. या साठी जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून या द्वारे या कामाचे नियंत्रण केले जात आहे.स्वच्छतागृहे नसणाऱ्या नागरिकांना ते बांधण्यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हा संपर्क अधिकारी हे गाव भेटीदरम्यान प्रोत्साहित करत होते. यामुळे या कामाला गती मिळत आहे. विस्तार अधिकारी पंचायत यांच्यामार्फत गटनिहाय कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामकाज केले जात आहे. या सर्व यंत्रणांनी येत्या १५ दिवसांत उर्वरित स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.पायाभूत सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्याची संधी राज्य शासनाकडून मिळाल्याने जिल्ह्यातील ११ हजार ८८७ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यातील राहिलेल्या ३ हजार ६४९ कुटुंबांच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.- सूरज मांढरे,मुख्य कार्यकारी अधिकारी ं