शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हा हगणदरीमुक्तीवर होणार शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:07 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता.

पुणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता. या सर्वेक्षणातून सुटलेल्या नागरिकांचे पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना स्वच्छतागृहे बांधून देऊन त्यांचा समावेश पायाभूत सर्वेक्षणात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या नुसार जिल्ह्यात जवळपास ११ हजार ८८७ कुटुंबांची नोंद करण्यात आली असून, या पैकी ८ हजार २३८ कुटुंबांना स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत उर्वरित कुटुंबाचेही स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, जिल्हा खऱ्या अर्थाने हगणदरीमुक्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील शौचालय बांधकामात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे.राज्य शासनाकडून पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील कुटुंबांचे शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची मुदत २८ फेब्रुवारी देण्यात आली होती. राज्य शासनाकडून यामध्ये १५ दिवसांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित ३ हजार ६४९ कुटुंबांचे स्वच्छतागृह बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वाढविण्यात आले. ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत येत्या १५ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी उर्वरित तीन हजार ६४९ स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहे. २०१७ मध्ये जिल्हा हगणदरीमुक्त जाहीर करण्यात आला होता. मात्र, पायाभूत सर्वेक्षणात काही कुटुंबे राहिली होती. त्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे. स्वच्छतागृह बांधून त्याचे छायाचित्र अपलोड केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहन स्वरूपात १२ हजार रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच वितरित केले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या राहिलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामानंतर तो दर्जा निश्चित होण्यास मदत मिळणार आहे.या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वापर याबाबत गावपातळीवर ग्रामसेवकाबरोबर नव्याने नेमणूक केलेल्या स्वच्छतागृहांची मदत या कामासाठी होत आहे. या साठी जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून या द्वारे या कामाचे नियंत्रण केले जात आहे.स्वच्छतागृहे नसणाऱ्या नागरिकांना ते बांधण्यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हा संपर्क अधिकारी हे गाव भेटीदरम्यान प्रोत्साहित करत होते. यामुळे या कामाला गती मिळत आहे. विस्तार अधिकारी पंचायत यांच्यामार्फत गटनिहाय कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामकाज केले जात आहे. या सर्व यंत्रणांनी येत्या १५ दिवसांत उर्वरित स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.पायाभूत सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्याची संधी राज्य शासनाकडून मिळाल्याने जिल्ह्यातील ११ हजार ८८७ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यातील राहिलेल्या ३ हजार ६४९ कुटुंबांच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.- सूरज मांढरे,मुख्य कार्यकारी अधिकारी ं