शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

उद्योजकांनी सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच रक्षाबंधनात गुंफले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:24 IST

भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले.

ठळक मुद्दे मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान

बारामती : मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: चाकण परिसरात त्याची अधिक झळ पोहचली. त्यामुळे धास्तावलेल्या जिल्ह्यातील उद्योजकांनी सुरक्षिततेसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच राखी बांधून रक्षाबंधनाच्या अनोख्या बंधात गुंफले. भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या बंधनाशी बांधिलकी जपत उद्योजकांचे सुरक्षिततेसह विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.  पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची झुम ही  औद्योगिक संघटना आहे. या संघटनेचे जिल्हाधिकारी स्वत: अध्यक्ष आहेत. प्रत्येक दोन, तीन महिन्यामधून एकदा संघटनेची बैठक होते. काही दिवसांपुर्वी संघटनेची बैठक पार पडली. यासाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी रमेश  काळे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी संजीव देशमुख आदी उपस्थित होते. एमआयडीसीतील रस्ता, खड्डे, जागा, पोलीस स्टेशन, रुग्णालय, आरोग्य योजना आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.त्यानंतर पुणे जिल्हा औद्योगिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, कोषाध्यक्ष प्रदीप सपकाळ, बारामती चेंंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, फेडरेशन आॅफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार विनोद जैन आदींनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली.औरंगाबाद, चाकण येथे मागील महिन्यात आंदोलनाच्या वेळी काही समाजकंटकांनी हल्ले केले. त्यामध्ये उद्योगांचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे उद्योग विश्वात अद्याप भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भाऊ म्हणून पाठराखे बनून उद्योगांचे, आमचे संरक्षण करा असे साकडे घालण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या नात्याची जाण ठेवत चाकण एमआयडीसीत भेट देउन तेथे  बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तेथील पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असून जागेच्या प्रश्नासह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.दरम्यान, बारामती येथील एमआयडीसीमध्ये अनेक ठीकाणी बीएसएनएलची ह्यलॅण्डलाईनह्य अनेक ठिकाणी पोहचलेली नाही. केबल अभावी ही सेवा अद्याप अनेक उद्योगांना मिळालेली नाही. त्यामुळे इंटरनेटची सेवा मिळण्यास अडचणी येतात. उद्योगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशी समस्या या बैठकीत मांडल्याचे कुंभार यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. पुढील बैठकीत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सांगून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरीक्त जिल्हाधिकारी काळे यांनी दिल्याचे कुंभार म्हणाले.

टॅग्स :Chakanचाकणbusinessव्यवसायMIDCएमआयडीसीNavalkishor Ramनवलकिशोर रामRaksha Bandhanरक्षाबंधन