शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

उद्योजकांनी सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच रक्षाबंधनात गुंफले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:24 IST

भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले.

ठळक मुद्दे मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान

बारामती : मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: चाकण परिसरात त्याची अधिक झळ पोहचली. त्यामुळे धास्तावलेल्या जिल्ह्यातील उद्योजकांनी सुरक्षिततेसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच राखी बांधून रक्षाबंधनाच्या अनोख्या बंधात गुंफले. भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या बंधनाशी बांधिलकी जपत उद्योजकांचे सुरक्षिततेसह विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.  पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची झुम ही  औद्योगिक संघटना आहे. या संघटनेचे जिल्हाधिकारी स्वत: अध्यक्ष आहेत. प्रत्येक दोन, तीन महिन्यामधून एकदा संघटनेची बैठक होते. काही दिवसांपुर्वी संघटनेची बैठक पार पडली. यासाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी रमेश  काळे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी संजीव देशमुख आदी उपस्थित होते. एमआयडीसीतील रस्ता, खड्डे, जागा, पोलीस स्टेशन, रुग्णालय, आरोग्य योजना आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.त्यानंतर पुणे जिल्हा औद्योगिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, कोषाध्यक्ष प्रदीप सपकाळ, बारामती चेंंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, फेडरेशन आॅफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार विनोद जैन आदींनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली.औरंगाबाद, चाकण येथे मागील महिन्यात आंदोलनाच्या वेळी काही समाजकंटकांनी हल्ले केले. त्यामध्ये उद्योगांचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे उद्योग विश्वात अद्याप भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भाऊ म्हणून पाठराखे बनून उद्योगांचे, आमचे संरक्षण करा असे साकडे घालण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या नात्याची जाण ठेवत चाकण एमआयडीसीत भेट देउन तेथे  बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तेथील पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असून जागेच्या प्रश्नासह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.दरम्यान, बारामती येथील एमआयडीसीमध्ये अनेक ठीकाणी बीएसएनएलची ह्यलॅण्डलाईनह्य अनेक ठिकाणी पोहचलेली नाही. केबल अभावी ही सेवा अद्याप अनेक उद्योगांना मिळालेली नाही. त्यामुळे इंटरनेटची सेवा मिळण्यास अडचणी येतात. उद्योगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशी समस्या या बैठकीत मांडल्याचे कुंभार यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. पुढील बैठकीत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सांगून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरीक्त जिल्हाधिकारी काळे यांनी दिल्याचे कुंभार म्हणाले.

टॅग्स :Chakanचाकणbusinessव्यवसायMIDCएमआयडीसीNavalkishor Ramनवलकिशोर रामRaksha Bandhanरक्षाबंधन