शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मृतदेहाची चिरफाड करायला वाघाचं काळीज लागतं भावा; भेटा, ५ हजार शवविच्छेदनं केलेल्या डॉक्टरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 09:16 IST

कोणतीही भिती न बाळगता मागील १४ शवविच्छेदनाचे काम...

तेजस टवलारकर पिंपरी :शवविच्छेदनगृह पाहिले तरी अनेकांना भिती वाटते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे म्हटले तरी अनेक जण भिती पोटी मृतदेहाला हात लावत नाहीत. तसेच शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेहाला घेऊन जाण्यासाठी ही अनेक जण तयार होत नाहीत. परंतु कोणतीही भिती न बाळगता मागील १४ वर्षांपासून डॉ. प्रविण कानडे शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनाचे काम करीत आहेत.

सद्यस्थितीत डॉ. कानडे पुण्यातील बी. जे. शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत आहे. त्यांनी आतापर्यंत विविध शासकीय रूग्णालयात काम केले आहे. तळेगाव येथील कार्यरत असताना पुणे-मुबंई महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या अनेकांचे त्यांनी शवविच्छेदन केले आहे. 

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर २०१४ मध्ये कोसळलेल्या दरडीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशच हादरला होता. रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय, याची वाट पाहत बसलेले गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले होते. चिखलात गाडल्या गेल्याने मृतदेहांची दुर्रावस्था झाली होती. माळीणच्या घटनेत मृत्यू झालेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन देखील डॉ. कानडे यांनी केले होते. ही घटना कधीही विसरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

५ हजार मृतदेहांचे केले शवविच्छेदन डॉ. कानडे यांनी  आता पर्यंत जवळपास ५ हजार मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. सद्यस्थितीत ते शवविच्छेदन या विषयावर एम. डी. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी सुरूवातीपासूनच शासकीय रूग्णालयात काम केले आहे. 

पहिला अनुभव कसा होता?

एमबीबीएसचे नुकतेच शिक्षण पूर्ण करून डॉ. कानडे सातारा येथील शासकीय रूग्णालयात नोकरीला लागले होते. ही गोष्ट २००८ ची आहे. नदीत वाहून आलेल्या मृतदेहांचे त्यांनी शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदन करण्याची ही त्यांची पहिली वेळ होती. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे इतरांचा सल्ला घेणे शक्य नव्हते. अशा वेळी स्वत: अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. पहिल्यांदा केले शवविच्छेदन कधी विसरू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

शवविच्छेदन शिकले कोठे?

डॉ. कानडे यांनी एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केले आहे. येथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शवविच्छेदन कसे करायचे याचे शिक्षण घेतले.

प्रत्येक अववय वेगळा करावा लागतो

शवविच्छेदन करताना अववय शरीरातून काढावे लागतात. ज्या ठिकाणी संशय आला वा काही अववय डोळ्यांनी दिसत नसतील तर अशा वेळी मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते. शरीरातून काढलेल्या अववयांची तपासणी करावी लागले. तपासणी केल्यावर मृत्यू कशामुळे झाला याचे निदान होते.

मृतदेहाला न्याय मिळवून देण्याचे काम करावे लागते. शवविच्छेदन करणे हे डॉक्टर म्हणून कर्तव्य आहे. त्यामुळे भिती वाटत नाही. कठीण प्रसंगाच्या वेळी स्वत: निर्णय घ्यावे लागतात.

 -डॉ. प्रविण कानडे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल