शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महाश्रमदानात १० लाख टन कचऱ्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुठलेही काम समूहाने केले की ते यशस्वी होते. जिल्ह्यात सध्या स्वच्छता अभियान राबविण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कुठलेही काम समूहाने केले की ते यशस्वी होते. जिल्ह्यात सध्या स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महाेत्सवाचे औचित्याने गुरुवारी १ हजार ३८८ ग्रामपंचायतींत महास्वच्छता अभियानात नागरिकांनी महाश्रमदान करत तब्बल १० लाख २४ हजार १९८ टन कचऱ्याची विल्हेवाट लावत विक्रम केला. जिल्ह्यात कचरामुक्तीसाठी घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. गावे स्वच्छ व्हावीत आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभागी होत आपल्या गावांत स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल १० लाख २४ हजार१९८ टन कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेत ग्रामस्थांपासून, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदारांनीही सहभाग घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. जिल्ह्यातील राज्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, खातेप्रमुख गटविकास अधिकारी, खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, गावस्तरीय कर्मचारी ग्रामस्थ, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचतगटांनी सहभाग घेतला.

चौकट

एकूण १ लाख ३७ हजार ३२५ नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. यात ४३ हजार ८५२ महिला तर ९३ हजार ४७३ पुरुषांनी सहभाग घेत १० लाख २४ हजार १९८ कचरा संकलित केला. या मोहिमेत ६ लाख २२ हजार ५६९ टन सुका कचरा तर ३ लाख ६२ हजार ४१३ ओला कचरा गोळा करण्यात आला. तर३९ हजार २१६ किलो प्लास्टिक चकरा गोळा करण्यात आला. कचरा संकलित करण्यासाठी २ हजार २४० वाहने वापरण्यात आली. यात ६४७ ट्रॅक्टर, ८४४ घंटागाड्या, ३२ जेसीबी, ४१८ टेम्पो तर२९९ इतर वाहनांचा समावेश आहे.

चौकट

या महा श्रमदान स्वच्छता दिनाकरिता जलशक्ती मंत्रालय भारत सरकार कडून जुनेद उस्मानी व सुचिता देव सहभागी झाले. त्यांनी देखील जिल्ह्यातील स्वच्छता उपक्रमांचे तसेच महाश्रमदान स्वच्छता कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी केद्र शासनाचे अधिकारी यांनी जिल्ह्यात राबविलेले उपक्रम देशात राबविणेबाबत भारत सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

चौकट

महाश्रमदान स्वच्छता दिनाची उत्तम प्रकारे जनजागृती झाली. स्वच्छता श्रमदान बाबतचे तसेच स्वच्छताविषयक माहितीचे पोस्टर, बॅनर, भिंती रंगकाम गावानी स्वयंस्फूर्तीने तयार केले. ज्यामुळे जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

महाश्रमदान स्वच्छतादिनी जिल्ह्यातील गावांमध्ये कचरा व्यवस्थापन, स्वच्छताविषयक कामाचे शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम घेतले, तसेच वृक्ष लागवड करण्यात आली.

- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद