शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चारा छावण्यांना नकार घंटा, प्रशासनाने केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:22 IST

जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असून, दिवसेंदिवस पाणी टंचाईबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

पुणे : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असून, दिवसेंदिवस पाणी टंचाईबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यासंदर्भातील मागणी आहे. मात्र, त्यातील नऊ ठिकाणी चारा छावणी सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल स्थानिक तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यासाठी नकार घंटा वाजवली जात असल्याचे दिसून येत आहे.राज्य शासनातर्फे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये, १८ महसूल मंडळात आणि ८८ गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी गावांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून प्रामुख्याने बारामती व शिरूर तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसत आहे. सध्या बारामतीमध्ये २१ आणि शिरूरमध्ये १७ टँकर सुरू असून याच तालुक्यातून चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली जात आहे. चारा छावण्यांसाठी आत्तापर्यंत वैयक्तिक व सामूहिक असे एकूण १३ अर्ज आले होते. त्यातील नऊ ठिकाणी चारा छावणी आतातरी सुरू करण्याची गरज नाही, असा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे.>पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पशुधनजिल्ह्यात परतीचा पाऊस पडलाच नाही.त्यामुळे चारा पिकात मोठी घट झाली आहे.त्यातच पुणे जिल्ह्यात सध्या लाख ५४ हजार ७०३ मोठे पशुधन आणि तर ६ लाख ९८ हजार ६३२ शेळ्या मेंढ्या आहेत.त्यांना एका महिन्याला १ लाख ७२ हजार ८० मेट्रिक टन चा-याची आवश्यकता आहे. मार्च महिना अखेरपर्यंत सर्व पशुधनास चारा पुरेल असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू केल्या जात नाहीत.पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून पुण्यासह राज्यात चारा उत्पादित केला जात आहे.शेतक-यांना बियाणे आणि अनुदान देवून गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पिके घेण्यात आली आहेत.मात्र,दुष्काळी भागात पाणी नसल्याने चा-याचा तुटवडा जाणवू लागला आहे.त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि गाळपे-यातून उपलब्ध होणार चारा यांचा विचार केल्यास जिल्ह्यात सध्यस्थितीत चारा छावणी सुरू करण्याची गरज नाही,मात्र,येत्या एप्रिल महिन्यात काही ठिकाणी सुरू कराव्या लागतील,असे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे.