शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तेल्या रोगाने डाळिंबबागा उद्ध्वस्त

By admin | Updated: June 29, 2015 23:34 IST

लहानमोठ्या रोगांचा सामना करताना या परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहेत. पाच-सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी डाळींब धरलेल्या बहर आता तोडणीस आला आहे. तरीही या बागांमध्ये तेल्या रोगाचे प्रमाण आहे

निमगाव केतकी : निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरातील डाळिंबपिकावर आलेला जीवघेणा रोग तेल्या तसेच डाळिंबाचा तीस ते चाळीस रुपयांवर आलेला विक्रीदर यांमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.मागील वर्षाही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी तेल्या रोगाबरोबरच पाणीटंचाई आवकाळी, गारपीट, तसेच वेळोवेळी येणाऱ्या लहानमोठ्या रोगांचा सामना करताना या परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहेत. पाच-सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी डाळींब धरलेल्या बहर आता तोडणीस आला आहे. तरीही या बागांमध्ये तेल्या रोगाचे प्रमाण आहे असेच आहे. त्यामुळे शंभर रुपऐ प्रतिकीलो जाणारी फळे या रोगाच्या प्रादुभार्वामुळे चाळीस ते पंचेचाळीस रूपाये किलोने कशीबशी विकली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा मशागतीसाठी व औषधाचाही खर्च निघने मुश्कील झाले आहे. बागेमधील फळांना तर व्यापारी खरेदी करण्यास धजवत नाहीत. (वार्ताहर)पारवडीत शेतकरी अडचणीत पारवडी : पारवडी (ता. बारामती) आणि परिसरामध्ये डाळिंबबागांवर तेल्या रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पारवडी परिसरामध्ये शंभर हेक्टरच्यावर डाळींबाच्या फळबागा आहेत. या रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी बागेत पाणी व्यवस्थापन, औषध फवारणी, तण व्यवस्थापन, वेगवेगळी टॉनिक, सुरक्षा मशागत, औजारे, दैनंदिन देखभालीवर एकरी दीड ते दोन लाखापर्यंत खर्च केलेले आहेत. एवढा खर्च करून एकरी तीन लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित असते. परंतू, तेल्या रोगाच्या प्रादूर्भावामुळे अक्षरक्ष: उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याची खंत डाळींब उत्पादक शेतकरी राजू माळशिकार यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत कृषी सहाय्यक कुंभार यांच्याशी संपर्क केला असता हा निर्णय आम्ही घेत नसल्याचे सांगितले. -गतवर्षी गारपीटीने डाळींब बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा अवकाळी पाऊस व रोगराईमुळे डाळींब बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. माळरानावर कमी पाण्यावर येणारे पीक व हमखास पैसा देणारे पीक म्हणून डाळींबाची लागवड मोठ्या प्रमाणात तालुक्यात केली जात आहे. मात्र तेल्या रोगाच्या संकटामुळे डाळींब शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक अनुदान द्यावे व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आहे.