शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 14:47 IST

निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली...

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता

अमोल अवचिते- पुणे : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सरकारकडून तसेच प्रशासनाकडून कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सरकार नोकरभरती काढणार का? संबंधित विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी प्राप्त होऊन परीक्षा घेतल्या जाणार आहेत  का? आदी प्रश्नांवरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. सर्वसामान्यपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये विभागातील असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार लोकसेवा आयोगाला मागणीपत्र प्राप्त होते. त्यानुसार रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध होऊन परीक्षा घेतली जाते. डिसेंबर महिन्यात राज्यसेवा परीक्षेची जाहिरात येऊन फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षा घेण्यात येते. मात्र राष्ट्रपती राजवटीमुळे ही परीक्षा घेतली जाणार का? नव्याने जागा निर्माण करून भरती प्रक्रिया राबविण्याचा धोरणात्मक निर्णय राज्यपाल नोकरशाहीवर दबाव टाकून घेतील का? नियोजित वेळापत्रकानुसार होणाºया परीक्षा योग्य वातावरणात पार पडतील का? अशा विविध प्रश्नांनी उमेदवारांना काळजीत टाकले आहे. यामुळे एकूणच अभ्यासावर परिणाम होत असल्याचे उमेदवारांनी ‘लोकमत’ला सांगितले. निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. युतीचे सरकार तरी येईल, असे वाटले होते. स्वत:च्या अहंकारापायी, वडिलांना दिलेल्या शब्दामुळे तसेच बंद खोलीत झालेल्या चर्चेमुळे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे मतदान करणाºया तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचाच हा प्रकार आहे..........राज्यातल्या तरुणाईने मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्याला एक स्थिर सरकार येईल, अशी अपेक्षा होती. मात्र सत्तेच्या मोहापायी सर्वच पक्ष सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे तरुणाईचे होणारे नुकसान कोण भरून देणार? लाखो तरुण रोजागाराच्या प्रतीक्षेत असताना राज्यामध्ये स्थिर सरकार नसणे ही महाराष्ट्राची अराजकतेकडे होणारी वाटचाल आहे का, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहे. - अमोल हिप्परगे, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी विद्यार्थी संघटना............   राष्ट्रपती राजवटी दरम्यान महाशिवआघाडीचे सरकार जर स्थापन होऊ शकले नाही, तर पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता आणि निवडणुकांमध्ये किती कालावधी जाणार हा देखील गंभीर प्रश्न आहे. या सर्व सत्ता घोळाचा परिणाम निष्पाप, प्रामाणिकपणे स्वत:चे भविष्य घडविणाºया तरुणाईला भोगावा लागणार आहे.  - नीलेश निंबाळकर, उमेदवार.....अस्थिर राजकीय व्यवस्थेमुळे लागू झालेली राष्ट्रपती राजवट  ही तरुणाईच्या आशा-अपेक्षांचा भंग झाल्यासारखी आहे. वाढती बेरोजगारी आणि रिक्त जागांची पदभरती यांमुळे मोठा अडथळा या परिस्थितीमुळे निर्माण झालेला आहे. याचा फटका ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया असंख्य विद्यार्थ्यांना बसत आहे. - संकेत ठाकरे ...........महाराष्ट्रात आधीच एकीकडे दुष्काळ अन् एकीकडे बेरोजगारी वाढत असताना, राजकारणी लोक राज्याला स्थिर सरकार देऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आधीच्या सरकारने घोषित केलेल्या नोकरभरती पूर्ण होतील का नाही याची चिंता वाटत आहे. सरकार कोणी का स्थापन करू द्या पण बेरोजगार मुलांचे प्रश्न सोडवावेत हीच एक अपेक्षा आहे.- स्नेहा राऊत.........राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांचे मागणीपत्र राज्यपालांनी नोकरशाहीवर दबाव टाकून मान्य करून घ्यावे. तसेच नियोजित परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात. - सचिन लेंढवे.................

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा