शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आपत्ती व्यवस्थापनाची ४८५ कर्मचाऱ्यांवर भिस्त, ४२५ पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 01:16 IST

भरतीकडे दुर्लक्ष : तब्बल ४२५ पदे रिक्त

राजू इनामदार

पुणे : आपत्तीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्याची सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ४२५ पदे रिक्त आहेत. ती भरण्याकडे प्रशासन व पदाधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच ३५ लाख लोकसंख्येचे पुणे शहर कायमच धोक्याच्या परिघात उभे राहिलेले झाले आहे.

कोणत्याही शहरात एखादी नैसर्गिक व मानवनिर्मित अशी कोणतीही आपत्ती आली तर त्या आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करण्याचे महत्त्वाचे काम अग्निशमन दलाकडे असते. त्यामुळेच काम असो किंवा नसो, हा विभाग कायम सुसज्ज असाच ठेवला जातो. ३५ लाख लोकसंख्येच्या पुणे शहराला अग्निशमन दलासाठी अधिकारी, जवान, चालक यांच्यासह एकूण ९१० पदे मंजूर म्हणजे मान्यताप्राप्त आहेत. त्यातील फक्त ४८५ पदेसध्या भरलेली आहेत. ४२५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची सर्वाधिक म्हणजे २२५ संख्या आपत्तीत प्रत्यक्ष काम करणाºया जवानांचीच आहे.अग्निशमन दलाकडून गेली अनेक वर्षे वारंवार या रिक्त पदांवर भरती करण्याबाबत प्रशासनाला कळवण्यात येत आहे. मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. अग्निशमन दलातील चालकासह सर्वांनाच आपत्ती निवारणाचे काम करता यायला हवे, असे बंधनकारक आहे. त्यामुळेच अधिकाºयांसाठी नागपूर येथे असलेला व जवानांसाठी मुंबई येथे असलेला अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय या विभागात भरतीच केली जात नाही. याची पूर्ण माहिती असतानाही प्रशासनाने या विभागात तब्बल ३० चालक पाठवले आहे. त्यांच्यापैकी एकाचेही असे प्रशिक्षण झालेले नाही. चालकच नसल्यामुळे अग्निशमन दलाने प्रशासनाकडे चालकांची मागणी केल्यानंतर त्यांच्याकडे असे अप्रशिक्षित चालक वाहन विभागाने पाठवून दिले.

अग्निशमन दलाचे मुख्य साधन म्हणून त्यांचे सर्व प्रकारची सामग्री असलेले वाहन. अशी लहान-मोठी एकूण ७८ वाहने अग्निशमन दलाकडे आहेत. ४८ मीटर उंचीपर्यंत जाऊ शकेल अशी शिडी असलेली २ व ७० मीटर अंतरापर्यंत पोहोचेल असे १ अशी तीन अत्याधुनिक वाहने आहेत. याशिवाय सर्व प्रकारची अत्याधुनिक साधनेही दलाकडे आहेत. महापालिका त्यासाठी वार्षिक अंदाजपत्रकात काही कोटी रुपयांची तरतूद करत असते. मात्र, वेळ आल्यानंतर ही साधने वापरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ हवे, नेमके तेच या विभागाकडे नाही.गेल्या काही वर्षांत अग्निशमन क्षेत्रात कितीतरी शोध लागले, सुधारणा झाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाने हा विभाग सुसज्ज करण्याचा प्रयत्न संशोधकांकडून केला जातो. त्यासाठी दलातील जवानांना खास प्रशिक्षण दिले जाते. त्यात सातत्य ठेवले जाते. त्यांना उपकरणे हाताळण्यास देत असतात. त्याची माहिती देत असतात. त्याचे कारणच आपत्तीकाळात एकही जीव जाऊ नये हे असते. महापालिकेच्या अग्निशमन दलातमात्र एक अभ्यासक्रम पूर्णकरून कर्मचारी भरती झाला कीपुन्हा त्याला अपडेट करण्याचेनावच काढले जात नाही.कितीतरी जुने कर्मचारी या विभागात भरती करण्यात आले आहेत. ते पूर्ण क्षमतेने काम करतात हे खरे असलेतरी त्यांना अनेक मर्यादा आहेत.मात्र हे प्रशासनाकडून लक्षात घेतले जात नाही.प्रत्येक १० किलोमीटरच्या परिघात एक अग्निशमन केंद्र असणे बंधनकारक आहे. पुणे शहराचा परीघ साधारण २४३ किलोमीटरचा आहे. त्यानुसार एकूण २६ केंद्र असणे आवश्यक आहे. त्याशिवाय झोपडपट्टी व वसाहतींची गर्दी असलेल्या ठिकाणी काही केंदे्र असली पाहिजेत, असाही नियम आहे. अशी एकूण ३५ केंद्रे पुणे शहरात असायला हवी.प्रत्यक्षात मात्र फक्त १३ केंद्रे पुणे शहरात आहेत. २ केंदे्र बांधून तयार आहेत, मात्र तिथे नियुक्त करण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच नसल्यामुळे ती सुरूच करण्यात आलेली नाहीत.४ केंद्रांच्या जागा ताब्यात आल्या आहेत, मात्र मनुष्यबळच नसल्यामुळे तिथे कामच सुरू करण्यात आलेले नाही. फक्त १३ केंद्रांवरच अग्निशमन दलाचे काम गेली काही वर्षे सुरू आहे.गेल्या काही वर्षांत शहराचा मोठा विस्तार झाला. त्याचबरोबर आपत्तीचा धोकाही वाढला आहे. त्यातून वाचण्यासाठी म्हणून जी व्यवस्था असते तीच अपुºया मनुष्यबळाने हैराण आहे. 

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल