शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

‘पीएमपीएल’ बंद केल्याने गैरसोय

By admin | Updated: September 7, 2015 04:14 IST

पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस,

आळंदी : पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चोविसावीवाडी, चऱ्होली, काटेवस्ती, देहू फाटा व आळंदी येथील दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेली बीआरटी सेवा पुणेकरांसाठी सोईची वाटत असली तरी पुणे शहराच्या विविध भागांतून आळंदीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. टप्प्याटप्प्याने उतरणाऱ्या विद्यार्थी व वृद्धांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असल्यामुळे विद्यार्थी, त्यांचे पालक व वृद्धांकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत असून या व इतर प्रवाशांसह आळंदीकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा प्रवास नकोसा वाटत आहे. बीआरटीची सेवा सुरू झाल्यापासून पुणे ते आळंदी मार्गावर ठिकठिकाणच्या टप्प्यावरील चढ-उताराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएलने चक्क वाऱ्यावर सोडून दिले असून आळंदी, चऱ्होली, चोविसावीवाडी, वडमुखवाडी, म्याग्झीन चौक, दिघी येथील दत्तनगर, परांडेनगर, गायकवाडनगर, विठ्ठल-रुक्मिणी चौक, जकात नाका या परिसरातील उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आळंदी पंचक्रोशीतील सोळू, मरकळ, धानोरी, चऱ्होली, वडगाव, केळगाव व अन्य भागांतील प्रवासी आळंदी थांब्यावर येऊनच येथून पुढील प्रवास करतात. पुणे-आळंदी मार्गावरील या प्रवाशांना पुण्याहून येताना कोणत्याही गाडीत बसले तर विश्रांतवाडी येथे इच्छा नसली तरी उतरावे लागते, मग इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरी बस पकडावी लागते. या एकूण प्रवाशांपैकी कोणी विश्रांतवाडी चौकात उतरते, कोणी कळसला उतरते, कोणी दिघीला तर कोणी अन्य ठिकाणी. या एकूण प्रवासात लहान विद्यार्थी, मोठे विद्यार्थी, लहान मुली, मोठ्या मुली, कामगार महिला, नोकरदार महिला, मजूरवर्ग, पाठीवर, खांद्यावर ओझ्याचे बोचके घेऊन प्रवास करणारे लहान, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष यांच्यासाठी हा प्रवास खरोखर जीवघेणा ठरू पाहत आहे. स्वारगेट, पुणे स्थानक, म. न. पा. व हडपसर येथून येताना होणाऱ्या गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात पुन्हा मध्येच विश्रांतवाडी येथे उतरावे लागत असल्यामुळे व परतीच्या प्रवासात तर त्याहून वाईट अनुभव घ्यावा लागत असल्यामुळे आळंदीकडे येताना व जाताना प्रवासी त्रस्त आहेत.(वार्ताहर)