शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपीएल’ बंद केल्याने गैरसोय

By admin | Updated: September 7, 2015 04:14 IST

पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस,

आळंदी : पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चोविसावीवाडी, चऱ्होली, काटेवस्ती, देहू फाटा व आळंदी येथील दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेली बीआरटी सेवा पुणेकरांसाठी सोईची वाटत असली तरी पुणे शहराच्या विविध भागांतून आळंदीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. टप्प्याटप्प्याने उतरणाऱ्या विद्यार्थी व वृद्धांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असल्यामुळे विद्यार्थी, त्यांचे पालक व वृद्धांकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत असून या व इतर प्रवाशांसह आळंदीकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा प्रवास नकोसा वाटत आहे. बीआरटीची सेवा सुरू झाल्यापासून पुणे ते आळंदी मार्गावर ठिकठिकाणच्या टप्प्यावरील चढ-उताराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएलने चक्क वाऱ्यावर सोडून दिले असून आळंदी, चऱ्होली, चोविसावीवाडी, वडमुखवाडी, म्याग्झीन चौक, दिघी येथील दत्तनगर, परांडेनगर, गायकवाडनगर, विठ्ठल-रुक्मिणी चौक, जकात नाका या परिसरातील उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आळंदी पंचक्रोशीतील सोळू, मरकळ, धानोरी, चऱ्होली, वडगाव, केळगाव व अन्य भागांतील प्रवासी आळंदी थांब्यावर येऊनच येथून पुढील प्रवास करतात. पुणे-आळंदी मार्गावरील या प्रवाशांना पुण्याहून येताना कोणत्याही गाडीत बसले तर विश्रांतवाडी येथे इच्छा नसली तरी उतरावे लागते, मग इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरी बस पकडावी लागते. या एकूण प्रवाशांपैकी कोणी विश्रांतवाडी चौकात उतरते, कोणी कळसला उतरते, कोणी दिघीला तर कोणी अन्य ठिकाणी. या एकूण प्रवासात लहान विद्यार्थी, मोठे विद्यार्थी, लहान मुली, मोठ्या मुली, कामगार महिला, नोकरदार महिला, मजूरवर्ग, पाठीवर, खांद्यावर ओझ्याचे बोचके घेऊन प्रवास करणारे लहान, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष यांच्यासाठी हा प्रवास खरोखर जीवघेणा ठरू पाहत आहे. स्वारगेट, पुणे स्थानक, म. न. पा. व हडपसर येथून येताना होणाऱ्या गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात पुन्हा मध्येच विश्रांतवाडी येथे उतरावे लागत असल्यामुळे व परतीच्या प्रवासात तर त्याहून वाईट अनुभव घ्यावा लागत असल्यामुळे आळंदीकडे येताना व जाताना प्रवासी त्रस्त आहेत.(वार्ताहर)