शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दिवे ग्रामपंचायतीवर श्रीनाथ ग्राम विकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

गराडे: गेल्या पाच वर्षांत दिवे ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. तसेच, वैयक्तिक लाभाच्या योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचविल्या. या ...

गराडे: गेल्या पाच वर्षांत दिवे ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. तसेच, वैयक्तिक लाभाच्या योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचविल्या. या गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आमच्या मागे राहिल्यामुळे श्रीनाथ ग्राम विकास आघाडीचे १५ पैकी ११ उमेदवार विजयी झाले. ही श्री कातोबा नाथांची कृपा होय, असे उद्गार भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांनी काढले.

दिवे (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीचा निकाल झाल्यानंतर श्री कातोबा मंदिरात विजयी उमेदवारांनी नाथांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या विजयीसभेत बाबाराजे होते.

या वेळी गणपत शितकल, ॲड. बाजीराव झेंडे, नामदेव टिळेकर, दिनकर गायकवाड, बापूसाहेब राऊत, बापूसाहेब टिळेकर, दत्ता राऊत आदीसह दिवे पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

गावपण टिकविण्यासाठी माजी मंत्री दादा जाधवराव व आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात नेतृत्वाखाली सर्व लोक एकत्र आले. त्यामुळे हा मोठा विजय प्राप्त झाला. गुलाल व भंडारा उधळत ग्रामस्थांनी गावात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. या पुढे ही विजयाची परंपरा सातत्याने राखली जाईल, असे बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले.

सूत्रसंचालन गणपत शितकल यांनी केले, तर आभार दिनकर गायकवाड यांनी मानले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे: भारती घाडगे, शोभा लडकत, श्रद्धा काळे, सुजाता जगदाळे, योगेश काळे, अमित झेंडे, सुमन टिळेकर, शोभा टिळेकर, गुलाब झेंडे, शोभा झेंडे व रुपेश राऊत.

२१गराडे दिवे

दिवे (ता. पुरंदर ) येथे विजयी उमेदवारांच्या समवेत बाबाराजे जाधवराव