शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अध्ययन अपरिहार्य -डॉ. रघुनाथ माशेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 03:34 IST

‘विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यायचे असेल तर शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. म्हणूनच शिक्षकांना मानसन्मान मिळाला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे डिजिटल अध्ययन भावी काळात अपरिहार्य आहे.

पुणे  - ‘विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यायचे असेल तर शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. म्हणूनच शिक्षकांना मानसन्मान मिळाला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे डिजिटल अध्ययन भावी काळात अपरिहार्य आहे. अशा काळात समान पुस्तके, समान परीक्षा यांची गरज राहणार नाही,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी आणि आबासाहेब अत्रे दिन प्रशालेस ९० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, संजीव ब्रह्मे, संजीव महाजन, मुख्याध्यापिका उज्ज्वला नवले, रवी चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी गुरुवर्य आबासाहेब अत्रे यांच्या कारकिर्दीवरील ‘शाळा एके शाळा’ या ग्रंथाचे तसेच लघुपटाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचाही सत्कारही यानिमित्ताने करण्यात आला.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संपर्क साधत, ‘मातृभाषा, तसेच भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करत संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका उज्ज्वला नवले, सचिव सुधन्वा बोडस यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आबासाहेब अत्रे यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला. प्राची मोडक यांनी सूत्रसंचालन केले.इंग्रजीच्या न्यूनगंडातून बाहेर या : नितीन करमळकरडॉ. नितीन करमळकर यांनी ‘मराठी माध्यमातून शिकणा-या मुलांना वा त्यांच्या पालकांना इंग्रजी येत नाही, या न्यूनगंडातून बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त केली. इंगजी येत नाही म्हणजे आपली प्रगती नाही, असे न मानता मातृभाषेत शिक्षण घेऊनही यशस्वी होता येते, हे व्यक्तिगत जीवनातील काही प्रसंगांचे उदाहरण देऊन त्यांनी पटवून दिले.’डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘शाळेत आल्यावर मला आई-आबांचे अस्तित्व जाणवते. येथे शिकताना वडिलांनी त्यांच्या मुली म्हणून कोणतीही सवलत न देता इतर विद्यार्थ्यांच्याबरोबरीनेच वागणूक मला व बहिणीला दिली.’

टॅग्स :Puneपुणे