शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

'देशात हुकूमशाही पुन्हा डोकावतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 01:28 IST

किरण नगरकर : नयनतारा सहगल यांना भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार

पुणे : माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे. कोणतीही कृती करण्याआधी, निर्णय घेण्याआधी त्याला परिणामांचा विचार करता येतो. परंतु, सध्या भारतीय लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, असा सवाल ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी उपस्थित केला. हिटलर गेल्यानंतर तसा माणूस पुन्हा होणार नाही, असे वाटले होते. मात्र, हुकूमशाही अनेक देशांमध्ये पुन्हा डोकावू लागली आहे, हिटलर परत आलाय, अशा शब्दांत त्यांनी परखड टीका केली.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनतर्फे भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने नगरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकल्यामुळे सहगल यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिजित वैद्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. नीलिमा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन केतकर यांनी प्रास्ताविक केले.अल्पसंख्याक दहशतीखाली४व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना सहगल म्हणाल्या, ‘अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत हे कशाचे लक्षण आहे? तुमच्या श्रद्धांबाबत कोणी प्रश्न उपस्थित केला, की लगेच आपल्या विरोधातला आहे, असे समजून एक तर त्याला ऐनकेन प्रकारे तुमच्या विचारधारेशी जुळवून घेण्यास भाग पाडले जाते.४अन्यथा त्यांचा दाभोलकर, कुलबुर्गी, गौरी लंकेश केला जातो. आमच्यासोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे वातावरण अनुभवावयास मिळत आहे. अशाने घटनेची पायमल्ली होत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची तर पदोपदी पायमल्ली होत आहे. शाळा, महाविद्यालय स्तरांपासून बुद्धीभ्रम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कला-साहित्य-संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या आहेत.नगरकर म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांना सरदार पटेल यांच्याबद्दल काय माहीत आहे? एवढे पैसे खर्च करून पुतळा उभारण्याऐवजी २५ दवाखाने उभारता आले असते. कोणाचा आदर कसा करावा, हे कळत नाही का? इतिहासातील त्यांना जी हवी आणि जशी हवी तीच व्यक्तिमत्त्वे पुढे येत आहेत. मोठमोठे पुतळे उभारून भारत घडणार नाही, तर प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे.’४बाबा आढाव म्हणाले, ‘काल दुपारी मोदींचे भाषण ऐकल्यावर खूप अस्वस्थ वाटले, तेव्हा भाईची खूप आठवण आली. या देशांमध्ये हजारो वर्षात हिंदू दहशतवादाचे एकही उदाहरण नाही, असे म्हणत त्यांनी नथुरामाचे नाव न घेता श्रद्धांजली वाहिली. सध्या लोकशाहीचा नंगानाच चालू आहे. निवडणुकीत धर्माचा, जातीचा वापर केला जात आहे. सरकारविरोधात बोलले, की तो देशद्रोह ठरवून निर्दोष लोक तुरुंगात धाडले जातात आणि खरे गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरतात.’

टॅग्स :PuneपुणेNayantara Sahgalनयनतारा सहगल