शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

धोम-बलकवडी कालवा आवर्तनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 27, 2017 02:06 IST

भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. धोम-बलकवडी

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर  होत चालला आहे. धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे  तिसरे आवर्तन दोन दिवसांत सुटले,  तर परिसरातील नागरिकांना  पाणीप्रश्न भेडसावणार नाही़धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन बंद होऊन बरेच दिवस झाले आहेत़ यामुळे परिसरातील अनेक विहिरींची पाणीपातळी घटली असून, विहिरींनी तळ गाठला आहे़ वीसगाव खोरे हे भौगोलिकदृष्ट्या उंचवट्यावर व उथळभाग असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते़ यामुळे उन्हाळ्यात ओढे, नाले, विहिरींना पाणी साठा राहत नाही. परिसरातील ग्रामपंचायतींना नळ पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक विहिरी या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने तिसऱ्या आवर्तनाची मागणी नागरिकांकडून होत आहे़ या कालव्याचे तिसरे आवर्तन लवकरात लवकर सुटले, तर कालव्याखालील व वरील भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे कालव्याला पाणी सुटण्याची प्रतिक्षा शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर उन्हाची तीव्रता, पाणीटंचाई याचा परिणाम या भागातील दुग्धव्यवसाय व अर्थकारणावर मोठ्याप्रमाणावर होत आहे़ वीसगाव खोरे परिसर हा अगोदरच दुष्काळग्रस्त असून, उन्हाळा तीव्र वाढल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे़ यामुळे नागरिक कालव्याच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत.