शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही : डॉ. शबी काझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 12:05 IST

रझा शाह ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या ३२ वर्षांपासून मौलाना डॉ. शबी काझमी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ठळक मुद्दे ‘जगा आणि जगू द्या’ हाच प्रत्येक धर्माचा संदेशदरवर्षी डॉ. काझमी आषाढी वारीमध्ये सुमारे ३०० वारक-यांसाठी निवासाची, भोजनाची व्यवस्था

- पुणेरोटरी क्लब ऑफ शिवाजीनगरच्या वतीने त्यांना नुकतेच शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी संवाद साधताना, काझी यांनी ‘सर्व धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही’, असे मत व्यक्त केले. ‘राजकारणी आणि धर्मगुरु सुधारतील, तेव्हाच शांतता नांदू शकेल, हेही अधोरेखित केले.-------- * सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. निवडणुकांमध्ये केवळ मतांसाठी जातीय राजकारणावर जोर दिला जातो. याबद्दल काय वाटते?- आपल्या देशातील हे चित्र बदलायला खूप वेळ लागेल. सत्तेचे राजकारण प्रेमावर नव्हे, तर द्वेषावर आधारलेले आहे. एकमेकांचा द्वेष करुन, नावे ठेवून मते मिळवली जातात. प्रत्येक मतदार कोणत्या तरी धर्माचा असतो. धर्मावर त्याची श्रध्दा असते. त्याच्या धर्माबाबतच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातो. काही अपवाद वगळता, मोठा जमाव राजकारण्यांच्या धार्मिक आवाहनाला बळी पडतो. त्यामुळे मतदान व्यक्तीला नव्हे, त्याच्या धर्माला केल जाते. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी समाजातील अनेक शांततेचे दूत प्रयत्न करत असतात. शांततेची इमारत उभी करण्याचा प्रयत्न करतात. निवडणुका येतात आणि ही इमारत पत्त्यासारखी कोसळते. जोपर्यंत धर्मगुरु सुधारणार नाहीत, तोपर्यंत जातीवाद मिटणार नाही.

*  इस्लामच्या नावाखाली काही मौैलाना, मौैलवी तरुणांना भडकवण्याचे काम करतात. खरा इस्लाम धर्म काय शिकवण देतो?- कोणालाही भडकावणे सोपे असते, मात्र समजावणे अवघड असते. जिहादच्या नावाखाली चुकीचा इस्लाम धर्म तरुणांसमोर उभा केला जातो. मौैलवींच्या आदेशाचे पालन केल्यास मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होईल, असे सांगितले जाते. चुकीच्या संकल्पना मनावर बिंबवल्या जातात. जोपर्यंत मौैलवी, मौैलाना धर्माचे प्रतिनिधित्व करत असतात. इस्लाम हे प्रेमाचे दुसरे नाव आहे. हजरत मोहम्मद यांनी सांगितले की, आपण रस्त्याने जात असू आणि वाटेत काटे असतील तर ते दूर करणे म्हणजे जिहाद. रस्त्यातील दगडामुळे कोणालाही इजा होऊ नये, म्हणून तो बाजूला करणे म्हणजे जिहाद. अशा पध्दतीचा जिहाद आमच्यासारखे लोक सामान्यांना शिकवणार नाही, तोवर परिस्थिती सुधारणार नाही. मरणे आणि मारणे म्हणजे जिहाद नव्हे.

*  शांततेचा संदेश देणे, परस्परांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण करणे, हेच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या धर्मांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व माणुसकी जपणारी माणसे आहोत. आपल्यात माणुसकी नसेल, तर आपण कोणत्याही धर्माचे म्हणवून घेण्याच्या पात्रतेचे नाही. एखादा माणूस कोणालाही दुखवून रात्री शांत झोपू शकत असेल तर तो कधीचाच मेलेला आहे. शरीराने तो जिवंत असला तरी मनाने सडलेला आहे. भारतात कोठेही गेल्यावर मी शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण