शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही : डॉ. शबी काझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 12:05 IST

रझा शाह ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या ३२ वर्षांपासून मौलाना डॉ. शबी काझमी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ठळक मुद्दे ‘जगा आणि जगू द्या’ हाच प्रत्येक धर्माचा संदेशदरवर्षी डॉ. काझमी आषाढी वारीमध्ये सुमारे ३०० वारक-यांसाठी निवासाची, भोजनाची व्यवस्था

- पुणेरोटरी क्लब ऑफ शिवाजीनगरच्या वतीने त्यांना नुकतेच शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी संवाद साधताना, काझी यांनी ‘सर्व धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही’, असे मत व्यक्त केले. ‘राजकारणी आणि धर्मगुरु सुधारतील, तेव्हाच शांतता नांदू शकेल, हेही अधोरेखित केले.-------- * सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. निवडणुकांमध्ये केवळ मतांसाठी जातीय राजकारणावर जोर दिला जातो. याबद्दल काय वाटते?- आपल्या देशातील हे चित्र बदलायला खूप वेळ लागेल. सत्तेचे राजकारण प्रेमावर नव्हे, तर द्वेषावर आधारलेले आहे. एकमेकांचा द्वेष करुन, नावे ठेवून मते मिळवली जातात. प्रत्येक मतदार कोणत्या तरी धर्माचा असतो. धर्मावर त्याची श्रध्दा असते. त्याच्या धर्माबाबतच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातो. काही अपवाद वगळता, मोठा जमाव राजकारण्यांच्या धार्मिक आवाहनाला बळी पडतो. त्यामुळे मतदान व्यक्तीला नव्हे, त्याच्या धर्माला केल जाते. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी समाजातील अनेक शांततेचे दूत प्रयत्न करत असतात. शांततेची इमारत उभी करण्याचा प्रयत्न करतात. निवडणुका येतात आणि ही इमारत पत्त्यासारखी कोसळते. जोपर्यंत धर्मगुरु सुधारणार नाहीत, तोपर्यंत जातीवाद मिटणार नाही.

*  इस्लामच्या नावाखाली काही मौैलाना, मौैलवी तरुणांना भडकवण्याचे काम करतात. खरा इस्लाम धर्म काय शिकवण देतो?- कोणालाही भडकावणे सोपे असते, मात्र समजावणे अवघड असते. जिहादच्या नावाखाली चुकीचा इस्लाम धर्म तरुणांसमोर उभा केला जातो. मौैलवींच्या आदेशाचे पालन केल्यास मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होईल, असे सांगितले जाते. चुकीच्या संकल्पना मनावर बिंबवल्या जातात. जोपर्यंत मौैलवी, मौैलाना धर्माचे प्रतिनिधित्व करत असतात. इस्लाम हे प्रेमाचे दुसरे नाव आहे. हजरत मोहम्मद यांनी सांगितले की, आपण रस्त्याने जात असू आणि वाटेत काटे असतील तर ते दूर करणे म्हणजे जिहाद. रस्त्यातील दगडामुळे कोणालाही इजा होऊ नये, म्हणून तो बाजूला करणे म्हणजे जिहाद. अशा पध्दतीचा जिहाद आमच्यासारखे लोक सामान्यांना शिकवणार नाही, तोवर परिस्थिती सुधारणार नाही. मरणे आणि मारणे म्हणजे जिहाद नव्हे.

*  शांततेचा संदेश देणे, परस्परांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण करणे, हेच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या धर्मांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व माणुसकी जपणारी माणसे आहोत. आपल्यात माणुसकी नसेल, तर आपण कोणत्याही धर्माचे म्हणवून घेण्याच्या पात्रतेचे नाही. एखादा माणूस कोणालाही दुखवून रात्री शांत झोपू शकत असेल तर तो कधीचाच मेलेला आहे. शरीराने तो जिवंत असला तरी मनाने सडलेला आहे. भारतात कोठेही गेल्यावर मी शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण