शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देवगड हापूसचे बाजारात आगमन, पुण्यात हंगामातील पहिली आवक : पेटीला पाच हजार रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:34 IST

१५ दिवसांपासून रत्नागिरी हापूस बाजारात दाखल झाला असून ग्राहकांकडून त्याला पसंती मिळत आहे. रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची ५० पेटी आवक झाली.

पुणे : देवगड हापूसचा हंगाम सुरू झाला असून पुण्यात रविवारी चालू हंगामातील देवगड हापूस दाखल झाला. मार्केट यार्डातील फळबाजारात देवगड हापूसची सहा पेटी आवक झाली. देवगडच्या पाच ते सहा डझनाच्या पेटीला पाच हजार रुपये दर मिळाला.हवामानातील बदलामुळे देवगड हापूसचा हंगाम सुरू होण्यास १० ते १५ दिवस उशीर झाला. मात्र, कुणकेश्वर येथील शंकर नाणेरकर या शेतक-याच्या शेतातील पहिला देवगड हापूस पुण्यात दाखल झाला. पातळ कातडीचा अधिक गर असलेला आणि चवीला गोड असल्याने या आंब्याला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. तसेच अधिक उष्ण हवामानात हा आंबा टिकत नाही. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच देवगड हापूसला सुरुवात होते. तसेच मार्च-एप्रिल महिन्यातच देवगड हापूसचा ८० टक्के हंगाम संपतो. त्यातच ग्राहकांकडूनही या आंंब्याला अधिक मागणी असते. येत्या आठवड्याभरात देवगड हापूसची सुरळीत आवक सुरू होईल, असे आंब्यांच्या व्यापाºयांनी सांगितले.आंब्याचे व्यापारी युवराज काची म्हणाले, की देवगड हापूसची अजूनही लोखंडी ट्रंकेतून आवक होत आहे. अधिक उष्ण वातावरणात तो टिकत नाही. एप्रिल ते जूनदरम्यान हा आंबा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवगड हापूसचा हंगाम लवकर संपतो. पुण्यात प्रथमच सहा पेटी आवक झाली असून मज्जीद बागवन यांनी देवगड हापूसची खरेदी केली आहे. हंगाम आणखी लवकर सुरू झाला असता, तर एका पेटीला १० हजार रुपयांचा दर मिळाला असता.१५ दिवसांपासून रत्नागिरी हापूस बाजारात दाखल झाला असून ग्राहकांकडून त्याला पसंती मिळत आहे. रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची ५० पेटी आवक झाली.४-६ डझनाच्या पेटीला ३ ते ५ हजार रुपये दर मिळत आहे.

टॅग्स :alphonsoहापूस आंबाPuneपुणे