शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये रस्त्यांना डांबराचे ‘संरक्षण’; केंद्रीय मंत्री आले अन् रस्ते दुरुस्त झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:46 IST

अनेक वर्षांपासून पडलेले खड्डे दुरुस्त होऊ लागले... विकासकामे सुरू असल्याचे फोटो फेसबुकवर झळकू लागले अन् त्याला लाइक्सही मिळू लागले... या विकासकामांमागील खरे गूढ उलगडले. कारण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार होते.

ठळक मुद्देपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला दोनशे वर्षे पूर्ण झाले, त्यानिमित्त द्विशताब्दी महोत्सवाचे आयोजनकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार असल्याने विकासकामांना मुहूर्त!

पुणे : अनेक वर्षांपासून पडलेले खड्डे दुरुस्त होऊ लागले... अरे हा तर काल किती खराब झालेला रस्ता आज किती छान दिसतोय... विकासकामे सुरू असल्याचे फोटो फेसबुकवर झळकू लागले अन् त्याला लाइक्सही मिळू लागले... पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात अचानक हे विकासाचे वारे पाहून नागरिक अचंबित झाले. त्यांना या विकासाचे कोडं समजेना! अन् या विकासकामांमागील खरे गूढ उलगडले. कारण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार होते. त्यांच्यासाठी हा सर्व ‘तामझाम’ सुरू होता. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला दोनशे वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त द्विशताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्र्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्याचा ‘आदेश’च आल्यासारखे ते कामाला लागले. कॅन्टोन्मेंट परिसरातील गुळगुळीत झालेले रस्ते पाहून नागरिकांना मात्र छान वाटले. ‘लोकप्रतिनिधी चांगले आहेत, ते काम करू लागले आहेत,’ अशा भावना नागरिकांच्या मनी दाटून आल्या. परंतु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार म्हणून हे सर्व चालले होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समोरील रस्त्यावर एका आठवड्याच्या आत सुंदरशी कमान उभी करण्यात आली. आजूबाजूला विविध रंगांचे झेंडे लावण्यात आले. हे सर्व केवळ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार यासाठीच केले जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. कारण गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडलेल्या रस्त्यांमधून जाताना या नागरिकांना अनेकदा पाठीला दणके बसलेले आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधींना हे रस्ते दुरुस्त करण्याचा मुहूर्त मिळाला नाही. हा मुहूर्त खुद्द संरक्षण राज्यमंत्री आल्यावरच मिळाला. या संरक्षण राज्यमंत्र्यांनी येऊन जणू काही खड्डे पडलेल्या रस्त्यांना डांबराचे ‘संरक्षण’ दिल्याचा अनुभव येत आहे. 

 

नुसती आश्वासनांची खैरात...पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला भेट देण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री जेव्हा येतात, तेव्हा बोर्डाच्या परिसरातील तक्रारींचे निवेदन त्यांना देण्यात येते. दर वेळी संरक्षणमंत्री आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन देतात. लष्कराने अनेक रस्ते बंद केले आहेत. तसेच घोरपडी रेल्वे गेट बंद झाल्यानंतर कितीतरी वेळ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. या समस्या लवकरच सोडवू, अशी आश्वासनेच केवळ प्रत्येक भेटीला मिळत आहेत. त्यावर तोडगा मात्र अजून कोणत्याही संरक्षणमंत्र्यांनी काढलेला नाही. 

 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शनिवारी पुण्यात मोठा कार्यक्रम झाला. देशाचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. साहेब कार्यक्रमाला येणार म्हणून बोर्डाच्या हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरण केले. बोर्डाला काही महिन्यांपूर्वी हेच रस्ते दुरुस्त करायला वेळ नव्हता. नागरिकांसाठी चांगल्या सुविधा हे कॅन्टोन्मेंट बोर्ड देत नसेल, तर द्विशताब्दी साजरी करायची कशासाठी?    

- अनिकेत राठी, सदस्य, परिवर्तन

टॅग्स :Puneपुणेministerमंत्री