शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास : श्वेता शालिनी; सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहातर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:13 IST

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते.

ठळक मुद्देभारतातील ५० टक्के जी. डी. पी. खेड्यांमधून : श्वेता शालिनीसामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी करण्यात आला सन्मान

पुणे : समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी व्यक्त केले.सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. या वेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, टि. म. वि.च्या समाजकार्य विभागाचे डॉ. प्रकाश यादव, सी.एस.आर. सदस्य प्रदीप तुपे, ससूनचे समाजकार्य अधीक्षक सत्यवान सुरवसे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मुख्य संयोजक शेखर मुंदडा, सोशल सिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष विजय वरुडकर उपस्थित होते.  श्वेता शालिनी म्हणाल्या, ‘‘भारतातील ५० टक्के जी. डी. पी. खेड्यांमधून येतो. खेड्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे; परंतु तेथील लोकांचे सबलीकरण होण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.’’योगेश गोगावले म्हणाले, ‘‘परिस्थिती, काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्येदेखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील; परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करू या. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडू वृत्तीने समाजासाठी कार्य करणाऱ्यांची गरज आहे.’’सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. वनराईचे मुकुंद शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल पाटील, गणेश बाकले, वैभव मोगरेकर, प्रशांत खांडे, सूरज पोळ, रत्नाकर कोष्टी, अमोल उंबरजे, विजय दरेकर, संदीप फुके, राज देशमुख, शशी काटे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रीती काळे, डॉ. मनीषा दानाने, वसुधा देशपांडे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे