शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास : श्वेता शालिनी; सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहातर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:13 IST

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते.

ठळक मुद्देभारतातील ५० टक्के जी. डी. पी. खेड्यांमधून : श्वेता शालिनीसामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी करण्यात आला सन्मान

पुणे : समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी व्यक्त केले.सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. या वेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, टि. म. वि.च्या समाजकार्य विभागाचे डॉ. प्रकाश यादव, सी.एस.आर. सदस्य प्रदीप तुपे, ससूनचे समाजकार्य अधीक्षक सत्यवान सुरवसे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मुख्य संयोजक शेखर मुंदडा, सोशल सिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष विजय वरुडकर उपस्थित होते.  श्वेता शालिनी म्हणाल्या, ‘‘भारतातील ५० टक्के जी. डी. पी. खेड्यांमधून येतो. खेड्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे; परंतु तेथील लोकांचे सबलीकरण होण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.’’योगेश गोगावले म्हणाले, ‘‘परिस्थिती, काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्येदेखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील; परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करू या. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडू वृत्तीने समाजासाठी कार्य करणाऱ्यांची गरज आहे.’’सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. वनराईचे मुकुंद शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल पाटील, गणेश बाकले, वैभव मोगरेकर, प्रशांत खांडे, सूरज पोळ, रत्नाकर कोष्टी, अमोल उंबरजे, विजय दरेकर, संदीप फुके, राज देशमुख, शशी काटे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रीती काळे, डॉ. मनीषा दानाने, वसुधा देशपांडे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे