शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

ग्रामीण भागाचा विकास हा भारताचा विकास : केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 14:41 IST

गरिबांचे सक्षमीकरण केले जावे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना सोडत : ग्रामीण भागात अधिक गतीने मिळाली घरे 

पुणे : सर्वसामान्य माणूस नटसम्राट नाटकातील 'कोणी घर देत का घर?' असेच सतत म्हणत असतो. परंतु, केंद्र शासन, राज्य सरकार आणि महापालिका मिळून आता घर देतात ही नवी वास्तविकता देशात दिसते आहे. गरिबांचे सक्षमीकरण केले जावे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तर 'भारत' विकसित होईल अन्यथा केवळ शहरे विकसित झाली तर 'ओएसीस' होईल असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. 

पुणे महापालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सवलतीमधील घरांची सोडत काढण्यात आली. यावेळी, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (ऑनलाईन), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ता टिळक, सुनील कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनू गोयल, डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने २९०० घरांची सोडत काढण्यात आली.

कार्यक्रमाला दिल्लीहून ऑनलाईन उपस्थित असलेले जावडेकर म्हणाले, देशभरात तीन कोटी घरे उभारण्यात आली असून आणखी दीड कोटी घरांचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात अधिक गतीने घरे मिळाली आहेत. वैयक्तिक बारा कोटी स्वच्छतागृह, अडीच कोटी घरांना वीज, चार कोटी घरांना पाण्याचे नळ, उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन, ४० कोटी लोकांचे जन-धन खाते,  पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार विमा, सर्वांना उत्तम शिक्षा देण्याची योजना या योजना गरिबांना सक्षम करण्यासाठी आणल्या. गरीब सक्षम झाला तर समाज सुखी होईल. 

गोऱ्हे म्हणाल्या, गोरगरिबांना अन्न वस्त्रासोबत निवारा देणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून निवारा देण्याचा  महत्वाचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना गरिबांसाठी लाभदायी आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एक लाखांपेक्षा अधिक अर्ज आले. यातील ३८ हजार पेक्षा अधिक पात्र ठरले. देशांच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर प्रत्येकाला स्वच्छतागृह, पक्के घर, गॅस कनेक्शन मिळायला हवे असे संकल्प पंतप्रधानांनी केले आहेत. योजनांची अंमलबजावणी आवश्यक असते. अन्यथा योजना कुचकामी ठरतात. पुण्यात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मराठवाडा, मुळशीतून आदी परिसरातून बहुतांश नागरिक स्थलांतरित झालेले आहेत. त्यांना घरे मिळण्यासाठी पालिकेने काम केले. यापुढील काळात पालिकेने ढिलाई न करता उद्दिष्ट पूर्ण करावे.

खासदार बापट म्हणाले, सामान्य माणसाचं घराचं स्वप्न आज पूर्ण होते आहे. पंतप्रधान आवास योजनेत शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग आहेत. ग्रामीण भागात अडचणी आहेत. जागा उपलब्धी, लाभधारक पात्रता आदी अडचणी आहेत. केंद्रीय इस्टीमेट कमिटीच्या ग्रामीण आवास योजनेची चर्चा सुरू असून त्रुटींचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरिबांना घरे देण्यासाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलावा. शहरांमध्ये जागेचा प्रश्न आहे. जागा मिळवणे आणि टिकाऊ घर उभारणे आवश्यक आहे. पालिकेने या कामाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करावा. घरांचा लाभ देणारी राज्यातील ही पहिली महापालिका आहे. 

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले,  केंद्र शासनाने २०१५ ला योजना सुरू केली. परवडणाऱ्या घरांचे उद्दिष्ट देण्यात आले. आज या योजनेअंतर्गत  २ हजार ९०० घरांची सोडत काढण्यात येत आहे. याकरिता ६ हजार ३०० अर्ज आले. ५० टक्के लोकांचे नाव सोडतीमध्ये जाहीर होईल. परंतु, उर्वरित ५० टक्के लोकांसाठी भविष्यात आणखी योजना राबविण्यात येणार आहेत. 

प्रास्ताविक रुबल अगरवाल यांनी केले. सूत्रसंचालन यांनी केले. आभार प्रदर्शन उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी केले. --------सर्वसामान्य आणि गरोगरिबांना परवडणारी घरे देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार होत आहे. या योजनेतून घरे देणारे पुणे शहर हे राज्यातले पहिले शहर ठरले आहे. या योजनेला अधिक गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात २९०० घरांची सोडत होत आहे. पुढील काळात बँका, खासगी बांधकाम व्यावसायिक यांच्या मदतीने तसेच पीपीई तत्वावर सव्वा लाख घरे विकसित करण्याचे उद्दीष्ठ आहे.- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरNarendra Modiनरेंद्र मोदीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका