शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

मानवतेच्या शोषणातून झालेला विकास धोकादायक

By admin | Updated: February 15, 2015 00:00 IST

खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे.

पुणे : खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे. त्यातूनच प्रदूषण आणि तापमानवाढीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गोष्टी रोखण्यासाठी दूरगामी विचारातूनच ‘वनराई’ निर्माण करण्याचा संदेश मोहन धारिया यांनी दिला होता. त्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. वेडं झाल्याशिवाय सामाजिक कार्य होत नाही, असे स्पष्ट करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’...अशी टिप्पणीही केली. ‘वनराई’चे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या ९० व्या जयंतीदिनी वनराई फाउंडेशनच्या वतीने लोकचळवळीचे अर्ध्वयू अण्णा हजारे यांना ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते शनिवारी ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार, तसेच ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, हिरवळ संस्थेचे संस्थापक किशोर धारिया उपस्थित होते. पद्मश्री, पद्मभूषण यांसह अनेक पुरस्कार मिळाले, पण अण्णांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराचा सर्वाधिक आनंद आहे, अशी भावना हजारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘दूरगामी विचार करूनच धारियांनी वनराईची चळवळ सुरू केली. हीच चळवळ तापमानवाढीच्या संकटापासून वाचवू शकेल.’’ उल्हास पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. ४आदर्श गावाची संकल्पना स्पष्ट करताना, विकास करणे म्हणजे मोठ्या इमारती किंवा पक्के रस्ते बांधणे नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची जाण असणारी माणसं उभी करून आदर्श गाव करणे आणि हेच काम अण्णांनी सुरू केले आहे. माणसं उभी करण्यासाठी नेतृत्व महत्त्वाचे आहे. ज्याचे चारित्र्य शुद्ध, नि:स्वार्थी विचार, त्यागी वृत्ती आहे, तोच माणूस परिवर्तन घडवू शकेल, याकडेही हजारे यांनी लक्ष वेधले. ४कुवळेकर म्हणाले,की आजचा धारियांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे सत्प्रवृत्तीचा पुरस्कार असून, तो अण्णा हजारे यांना दिला जातो म्हणजे सत्प्रवृत्तीच्या आविष्काराला दिला जात आहे.