शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मानवतेच्या शोषणातून झालेला विकास धोकादायक

By admin | Updated: February 15, 2015 00:00 IST

खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे.

पुणे : खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे. त्यातूनच प्रदूषण आणि तापमानवाढीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गोष्टी रोखण्यासाठी दूरगामी विचारातूनच ‘वनराई’ निर्माण करण्याचा संदेश मोहन धारिया यांनी दिला होता. त्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. वेडं झाल्याशिवाय सामाजिक कार्य होत नाही, असे स्पष्ट करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’...अशी टिप्पणीही केली. ‘वनराई’चे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या ९० व्या जयंतीदिनी वनराई फाउंडेशनच्या वतीने लोकचळवळीचे अर्ध्वयू अण्णा हजारे यांना ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते शनिवारी ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार, तसेच ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, हिरवळ संस्थेचे संस्थापक किशोर धारिया उपस्थित होते. पद्मश्री, पद्मभूषण यांसह अनेक पुरस्कार मिळाले, पण अण्णांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराचा सर्वाधिक आनंद आहे, अशी भावना हजारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘दूरगामी विचार करूनच धारियांनी वनराईची चळवळ सुरू केली. हीच चळवळ तापमानवाढीच्या संकटापासून वाचवू शकेल.’’ उल्हास पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. ४आदर्श गावाची संकल्पना स्पष्ट करताना, विकास करणे म्हणजे मोठ्या इमारती किंवा पक्के रस्ते बांधणे नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची जाण असणारी माणसं उभी करून आदर्श गाव करणे आणि हेच काम अण्णांनी सुरू केले आहे. माणसं उभी करण्यासाठी नेतृत्व महत्त्वाचे आहे. ज्याचे चारित्र्य शुद्ध, नि:स्वार्थी विचार, त्यागी वृत्ती आहे, तोच माणूस परिवर्तन घडवू शकेल, याकडेही हजारे यांनी लक्ष वेधले. ४कुवळेकर म्हणाले,की आजचा धारियांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे सत्प्रवृत्तीचा पुरस्कार असून, तो अण्णा हजारे यांना दिला जातो म्हणजे सत्प्रवृत्तीच्या आविष्काराला दिला जात आहे.