शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मानवतेच्या शोषणातून झालेला विकास धोकादायक

By admin | Updated: February 15, 2015 00:00 IST

खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे.

पुणे : खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे. त्यातूनच प्रदूषण आणि तापमानवाढीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गोष्टी रोखण्यासाठी दूरगामी विचारातूनच ‘वनराई’ निर्माण करण्याचा संदेश मोहन धारिया यांनी दिला होता. त्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. वेडं झाल्याशिवाय सामाजिक कार्य होत नाही, असे स्पष्ट करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’...अशी टिप्पणीही केली. ‘वनराई’चे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या ९० व्या जयंतीदिनी वनराई फाउंडेशनच्या वतीने लोकचळवळीचे अर्ध्वयू अण्णा हजारे यांना ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते शनिवारी ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार, तसेच ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, हिरवळ संस्थेचे संस्थापक किशोर धारिया उपस्थित होते. पद्मश्री, पद्मभूषण यांसह अनेक पुरस्कार मिळाले, पण अण्णांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराचा सर्वाधिक आनंद आहे, अशी भावना हजारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘दूरगामी विचार करूनच धारियांनी वनराईची चळवळ सुरू केली. हीच चळवळ तापमानवाढीच्या संकटापासून वाचवू शकेल.’’ उल्हास पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. ४आदर्श गावाची संकल्पना स्पष्ट करताना, विकास करणे म्हणजे मोठ्या इमारती किंवा पक्के रस्ते बांधणे नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची जाण असणारी माणसं उभी करून आदर्श गाव करणे आणि हेच काम अण्णांनी सुरू केले आहे. माणसं उभी करण्यासाठी नेतृत्व महत्त्वाचे आहे. ज्याचे चारित्र्य शुद्ध, नि:स्वार्थी विचार, त्यागी वृत्ती आहे, तोच माणूस परिवर्तन घडवू शकेल, याकडेही हजारे यांनी लक्ष वेधले. ४कुवळेकर म्हणाले,की आजचा धारियांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे सत्प्रवृत्तीचा पुरस्कार असून, तो अण्णा हजारे यांना दिला जातो म्हणजे सत्प्रवृत्तीच्या आविष्काराला दिला जात आहे.