शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

" अयोध्येतील राम मंदिराचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने केली होती विचारणा..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:11 IST

श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत...

ठळक मुद्देराम जन्मभूमी मंदिर निर्माण व  निधी संकलन अभियानकेंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जाणार

पुणे : मंदिराचा खर्च किती असावा याचा विचार न्यासाने केलेला नाही. तर स्वतःचा असा अंदाज आहे की मंदिराच्या आतील बाजूला सुमारे ३०० ते ४०० कोटींचा खर्च लागू शकतो. तर मंदिराच्या बाहेरच्या (प्रकोटाचा) विकासासाठी एकूण खर्च अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतो.  या प्रकोटाचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र नाव लागणार नाही असे सांगून तो प्रश्न तिथेच मिटवला. तर देशातील सामान्य व्यक्तीला देखील मंदिरासाठी दान करता यावे त्यांच्या दानातून मंदिर उभारले जावे. सामान्य व्यक्तीच्या राम भक्तीला समाधान देणारा या अभियानाचा मूळ हेतू आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले. 

राम जन्मभूमी  मंदिर निर्माण व  निधी संकलन अभियान याविषयी माहिती देण्यासाठी निधी निर्माण पश्चिम समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ३१ डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी  परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर , रा.स्व . संघ प्रांत कार्यवाह डॉ . प्रवीण दबडघाव , प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे , प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे , पूणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर यावेळी उपस्थित होते.      गिरी महाराज म्हणाले की,  या कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांती पासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) निधी संकलनाचे केले जाणार आहे.  यासाठी एक हजार, शंभर, दहा रुपयांचे कुपन छापण्यात आलेली आहेत. एकूण ५०० कोटींची ही कुपन छापलेली आहेत.  या कुपनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील १० हजार गावातील ५० लाख कुटुंबांपर्यत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहुन अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.  

या कार्यासाठी केंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जाणार आहे. परदेशी निधी घेण्याची सध्या नाही. मात्र परवानगी मिळताच परकीय देशातील भक्तांचा निधी स्वीकारला जाईल. या अभियानातून अंदाजे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.    .........................राम मंदिर संपूर्ण विश्वाची सांस्कृतिक राजधानी व्हावी, हा हेतू आहे. तसेच मुख्य कार्य म्हणजे राम मंदिर निर्माण झाल्यानंतर हे पूजे अर्जेचे मंदिर न राहता सांस्कृतिक तसेच चेतना जाणणारे केंद्र निर्माणाचा प्रयत्न असणार आहे. श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत. मंदिराचा जागेवर २००० फुटापर्यत वाळू , रेती असल्याने ते मंदिर १ हजार वर्षापर्यत टिकावे यासाठी आयआयटीची तज्ज्ञांच्या समिती नेमण्यात आली आहे. असे गिरी महाराज म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर