शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

" अयोध्येतील राम मंदिराचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने केली होती विचारणा..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:11 IST

श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत...

ठळक मुद्देराम जन्मभूमी मंदिर निर्माण व  निधी संकलन अभियानकेंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जाणार

पुणे : मंदिराचा खर्च किती असावा याचा विचार न्यासाने केलेला नाही. तर स्वतःचा असा अंदाज आहे की मंदिराच्या आतील बाजूला सुमारे ३०० ते ४०० कोटींचा खर्च लागू शकतो. तर मंदिराच्या बाहेरच्या (प्रकोटाचा) विकासासाठी एकूण खर्च अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतो.  या प्रकोटाचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र नाव लागणार नाही असे सांगून तो प्रश्न तिथेच मिटवला. तर देशातील सामान्य व्यक्तीला देखील मंदिरासाठी दान करता यावे त्यांच्या दानातून मंदिर उभारले जावे. सामान्य व्यक्तीच्या राम भक्तीला समाधान देणारा या अभियानाचा मूळ हेतू आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले. 

राम जन्मभूमी  मंदिर निर्माण व  निधी संकलन अभियान याविषयी माहिती देण्यासाठी निधी निर्माण पश्चिम समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ३१ डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी  परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर , रा.स्व . संघ प्रांत कार्यवाह डॉ . प्रवीण दबडघाव , प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे , प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे , पूणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर यावेळी उपस्थित होते.      गिरी महाराज म्हणाले की,  या कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांती पासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) निधी संकलनाचे केले जाणार आहे.  यासाठी एक हजार, शंभर, दहा रुपयांचे कुपन छापण्यात आलेली आहेत. एकूण ५०० कोटींची ही कुपन छापलेली आहेत.  या कुपनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील १० हजार गावातील ५० लाख कुटुंबांपर्यत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहुन अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.  

या कार्यासाठी केंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जाणार आहे. परदेशी निधी घेण्याची सध्या नाही. मात्र परवानगी मिळताच परकीय देशातील भक्तांचा निधी स्वीकारला जाईल. या अभियानातून अंदाजे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.    .........................राम मंदिर संपूर्ण विश्वाची सांस्कृतिक राजधानी व्हावी, हा हेतू आहे. तसेच मुख्य कार्य म्हणजे राम मंदिर निर्माण झाल्यानंतर हे पूजे अर्जेचे मंदिर न राहता सांस्कृतिक तसेच चेतना जाणणारे केंद्र निर्माणाचा प्रयत्न असणार आहे. श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत. मंदिराचा जागेवर २००० फुटापर्यत वाळू , रेती असल्याने ते मंदिर १ हजार वर्षापर्यत टिकावे यासाठी आयआयटीची तज्ज्ञांच्या समिती नेमण्यात आली आहे. असे गिरी महाराज म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर