शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

सुरक्षेसाठी विद्यार्थिनी गुप्तहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:44 IST

शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या निर्भया पथकात आता बारामती, इंदापूरमधील विद्यार्थिनी गुप्तहेराचे काम करणार आहेत.

बारामती : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या निर्भया पथकात आता बारामती, इंदापूरमधील विद्यार्थिनी गुप्तहेराचे काम करणार आहेत. ४० मुलींची निर्भया सखी म्हणून निवड करण्यात आली आहे. या सखी विद्यार्थिनी आणि पोलिसांत दुवा म्हणून काम करणार आहेत. छेडछाडीसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधून काम करणार आहेत.मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, सक्षम बनविणे, पुरुषांमध्ये मुली, स्त्रियांबाबत आदराचे स्थान निर्माण करणे, मुलींना निर्भय बनविणे, मोबाईलसह सोशल मीडियावरून होणारा त्रास, छेडछाडीसारखे सायबर क्राईम रोखणे आदी हेतूने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. बारामती, इंदापूर शहर तालुका निर्भया पथकासाठी पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे, पोलीस नाईक अमृता भोईटे कार्यरत आहेत. सध्या निर्भया पथकाच्या वतीने दोन्ही तालुक्यांतील २० महाविद्यालयांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. ही पेटी बसवितानाच महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधला जात आहे. अनेकदा अज्ञानातूनदेखील काही प्रकार घडतात.मुलींना छेडछाड, पाठलाग आदी त्रास देण्याचे प्रकार होत असल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन या संवादादरम्यान केले जात आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना निर्भया पथकातील अधिकारी, कर्मचाºयांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत.विद्यार्थिनींनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे, यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील मुलींना पोलिसांचे पाठबळ मिळणार आहे. तसेच छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा बसणार आहे.>एका महाविद्यालयातून दोन विद्यार्थिनीनिर्भया सखी म्हणून एका महाविद्यालयातून प्रत्येकी दोन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थिनींना पोलिसांच्या वतीने ओळखपत्र देण्यात येणार आहे.या निर्भया सखी महाविद्यालयातील मुलींच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचवणार आहेत. तक्रार करणाºया मुली, निर्भया सखींच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाणार आहे.तसेच निर्भया पथक१५ दिवस ते १ महिन्यादरम्यान तक्रारपेटी उघडतील़>छेड काढल्यास पोलीस कारवाईमुलींकडे एकटक पाहणे, पाठलाग करणे, गाणे म्हणणे, मोबाईलवर मिस कॉल देणे, कॉल करणे चुकीचे आहे. याबाबत मुलींनी तक्रार केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. महाविद्यालयातील युवकांनी अज्ञानातून, चुकीच्या संगतीने मुलींची छेड काढल्यास होणारी पोलीस कारवाई, त्याचे मुलाच्या भवितव्यावर होणारे गंभीर परिणाम आदींची माहिती दिली जात आहे. त्यामुळे छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा बसत असल्याचे अमृता भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.