शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

पारगाव तर्फे खेड येथील डोंगराला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: पारगाव तर्फे खेड गावच्या हद्दीत असलेल्या डोंगराला वणवा लागला होता. दुपारपासून आग पसरत गेली. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: पारगाव तर्फे खेड गावच्या हद्दीत असलेल्या डोंगराला वणवा लागला होता. दुपारपासून आग पसरत गेली. मात्र हा वणवा विझवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. रात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत तीन तास परिश्रम घेऊन ही आग विझवली. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत राखून ठेवलेल्या गायरानाला अज्ञातांनी आग लावली. गायरानाचे गवत वाळलेले असल्याने आगीचा डोंब उसळला. आगीचे मोठमोठे लोट पेट घेत होते. तशी ही आग दुपारीच लागली असल्याचे सांगितले जाते. मात्र, याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. अक्षय मनकर हा तरुण पारगाव येथे राहतो. मंचर येथून पारगाव येथे जात असताना त्याला पेठ गावच्या हद्दीतच डोंगरावरील आग दिसली. क्षणाचाही विलंब न करता अक्षय मानकर याने सहकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिली. अक्षय व त्याच्या सहकाऱ्यांनी गायरानाकडे धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल ३ तासांनी संपूर्ण आग त्यांनी विझवली. या कामात पारगावचे बजंरग दलाचे कार्यकर्ते अक्षय मनकर, अविनाश मनकर, संकेत ढोकरे, साहिल निघोट, प्रथमेश भोर तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

चौकट

अलीकडच्या काळात वाळलेले माळरानावरचे गवत पेटवल्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात चांगले गवत उगवते. कारण जमीन भाजून निघते असा गैरसमज लोकांमध्ये आहे. किंवा काही समाजकंटकाकडून आगी लावण्याचे जाणूनबुजून प्रयत्न होतात. परंतु आग लावल्याने गवत तर जळतेच पण गवताबरोबर झाडे, बी पण जळते. मग पुढच्यावेळी गवत कसे येणार. वनविभाग आगी लावू नये याबाबत वारंवार जागृतता करते. तरीही खोडसाळपणे कुठे ना कुठे कुणीतरी आग लावतो. या आगीमध्ये झाडे, गवत तर जळतातच, परंतु मुंग्या, पक्षी, जंगली प्राणी, साप, बेडूक होरपळून निघतात.

भविष्यात येणारी संकटे टाळण्यासाठी तरुणांमध्ये निसर्ग जोपासण्याची भावना जागृत होताना दिसत आहे. पारगाव येथील तरुणांनी जे काम केले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.