शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Chandani Chowk Pune | कोट्यवधी रुपये खर्चूनही चांदणी चौकातील कोंडी अद्यापही ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:30 IST

ना वेळ वाचला ना वाहतूकीकोंडीची समस्या सुटली....

बावधन (पुणे) : चांदणी चौक ते भूगावच्या दरम्यान पौड रस्त्यावर रोह वाहतूककोंडी होते. त्यामुळे या महामार्गावर केवल एक किलोमीटरचे अंतर कापायला तब्बल एक तास लागत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून, चांदनी चौकातील पूल पाडून नवे महामार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यात आले खरे. मात्र, त्यामुळे ना वेळ वाचला ना वाहतूकीकोंडीची समस्या सुटली.

विशेषत: या परिसरातील असणाऱ्या बावधन आणि भूगावकरांना या कोंडीचा भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे ‘अहो साहेब, काहीतरी करा पण.... ही वाहतूककोंडी सोडवा’ अशी आर्त याचनाच प्रशासनाला बावधन आणि भूगावकर नागरिकांनी केली आहे. चांदणी चौक ते भूगावच्या दरम्यान दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दी आहेत. भूगावच्या रामनदीपर्यंत पौड तर तेथून पुढे चांदणी चौकापर्यंत हिंजवडी पोलिस ठाणे. त्यात पौड पोलिस ठाण्याच्या वतीने येथे दररोज तीन ते चार कर्मचारी वाहतूककोंडी सोडवितात, तर पौड पोलिसांची पेट्रोलिंगची गाडीही दररोज या ठिकाणी फिरवून वाहतूककोंडी मोकळी करत असते, परंतु राम नदीच्या पुढील रस्ता हा बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असून, येथील कर्मचाऱ्यांनी भागवत फार्मजवळील एलोरा वाइनच्या ठिकाणी थांबून वाहतूककोंडी सोडविणे खूपच गरजेचे आहे, परंतु राम नदी ते चांदणी चौका दरम्यान पोलिस कर्मचारी नसल्याने, भूगावपासून सुरळीत झालेली वाहतूक पुन्हा कोंडीत सापडते. त्यामुळे दररोजच वाहतूककोंडी होत असल्यामुळे भूगावकर तर त्रस्त आहेत.

या वाहतूककोंडीमुळे शहरातून या परिसराच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे. येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पुणे-कोलाड रस्त्याचे काम अतिशय संथपणे चालत आहे. त्यामुळेही येथील वाहतुकीवर परिणाम होत आहे.

पुलाची रुंदी वाढविण्याची गरज

पुणे-कोलाड हायवेचे राहिलेले रस्त्याचे अर्धवट काम आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे भूगावमध्ये वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातही भागवत फार्मवरून बावधन मार्केट यार्ड, जाधव वस्तीमार्गे बाळतुका इस्टेटपर्यंतचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नेहमीच झाली आहे, तसेच पुण्यातून येणारी वाहने आणि मारीगोल्डच्या बाजूने येणारी वाहने ही एकत्र आल्यामुळे एलोरा वाइनच्या ठिकाणी दररोज दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. चांदणी चौकाच्या बाजूला एम्ब्रोस्यापर्यंत तर भूगावच्या बाजूला दौलत गार्डनपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

भूगावच्या बाजूला राम नदीवरील पुलाची रुंदी वाढविण्याची गरज असून, या ठिकाणी अरुंद पूल असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहने व्यवस्थित जात नाहीत. पुणे-कोलाड हायवे होत असताना, या नदीवरील पूलही उंची वाढवून रुंद आणि प्रशस्त करावा लागणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड