शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

Chandani Chowk Pune | कोट्यवधी रुपये खर्चूनही चांदणी चौकातील कोंडी अद्यापही ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:30 IST

ना वेळ वाचला ना वाहतूकीकोंडीची समस्या सुटली....

बावधन (पुणे) : चांदणी चौक ते भूगावच्या दरम्यान पौड रस्त्यावर रोह वाहतूककोंडी होते. त्यामुळे या महामार्गावर केवल एक किलोमीटरचे अंतर कापायला तब्बल एक तास लागत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून, चांदनी चौकातील पूल पाडून नवे महामार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यात आले खरे. मात्र, त्यामुळे ना वेळ वाचला ना वाहतूकीकोंडीची समस्या सुटली.

विशेषत: या परिसरातील असणाऱ्या बावधन आणि भूगावकरांना या कोंडीचा भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे ‘अहो साहेब, काहीतरी करा पण.... ही वाहतूककोंडी सोडवा’ अशी आर्त याचनाच प्रशासनाला बावधन आणि भूगावकर नागरिकांनी केली आहे. चांदणी चौक ते भूगावच्या दरम्यान दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दी आहेत. भूगावच्या रामनदीपर्यंत पौड तर तेथून पुढे चांदणी चौकापर्यंत हिंजवडी पोलिस ठाणे. त्यात पौड पोलिस ठाण्याच्या वतीने येथे दररोज तीन ते चार कर्मचारी वाहतूककोंडी सोडवितात, तर पौड पोलिसांची पेट्रोलिंगची गाडीही दररोज या ठिकाणी फिरवून वाहतूककोंडी मोकळी करत असते, परंतु राम नदीच्या पुढील रस्ता हा बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असून, येथील कर्मचाऱ्यांनी भागवत फार्मजवळील एलोरा वाइनच्या ठिकाणी थांबून वाहतूककोंडी सोडविणे खूपच गरजेचे आहे, परंतु राम नदी ते चांदणी चौका दरम्यान पोलिस कर्मचारी नसल्याने, भूगावपासून सुरळीत झालेली वाहतूक पुन्हा कोंडीत सापडते. त्यामुळे दररोजच वाहतूककोंडी होत असल्यामुळे भूगावकर तर त्रस्त आहेत.

या वाहतूककोंडीमुळे शहरातून या परिसराच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे. येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पुणे-कोलाड रस्त्याचे काम अतिशय संथपणे चालत आहे. त्यामुळेही येथील वाहतुकीवर परिणाम होत आहे.

पुलाची रुंदी वाढविण्याची गरज

पुणे-कोलाड हायवेचे राहिलेले रस्त्याचे अर्धवट काम आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे भूगावमध्ये वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातही भागवत फार्मवरून बावधन मार्केट यार्ड, जाधव वस्तीमार्गे बाळतुका इस्टेटपर्यंतचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नेहमीच झाली आहे, तसेच पुण्यातून येणारी वाहने आणि मारीगोल्डच्या बाजूने येणारी वाहने ही एकत्र आल्यामुळे एलोरा वाइनच्या ठिकाणी दररोज दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. चांदणी चौकाच्या बाजूला एम्ब्रोस्यापर्यंत तर भूगावच्या बाजूला दौलत गार्डनपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

भूगावच्या बाजूला राम नदीवरील पुलाची रुंदी वाढविण्याची गरज असून, या ठिकाणी अरुंद पूल असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहने व्यवस्थित जात नाहीत. पुणे-कोलाड हायवे होत असताना, या नदीवरील पूलही उंची वाढवून रुंद आणि प्रशस्त करावा लागणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड