शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दडपशाहीला न जुमानता आंदोलन करणारच - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:56 IST

राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे.

पुणे : राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. तसेच राज्य शासनाने संघटनेच्या कार्यकर्त्यांची कितीही धरपकड केली तरी या दडपशाहीला न जुमानता दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ किंवा तेवढे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता शेट्टी यांनी आंदोलनाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, तीन रुपये दरवाढीचा प्रस्ताव देणारे दूध भुकटीच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांनीच दुधाचा भाव पाडला आहे. कमी भाव त्यांच्याकडूनच मिळत आहे. केंद्राने वेळेवर निर्णय न घेतल्याने भुकटीचे भाव पडले. आता सरकारनेच दूध भुकटी निर्मितीसाठी प्रतिलीटर तीन रुपये तर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णयही झाला आहे. त्यांना अजूनही काही फायदे मिळण्याची शक्यता असून दुधाला प्रतिलिटरमागे १२ रुपये वाढ होऊ शकते. असे असताना उत्पादकांना केवळ तीन रुपये वाढ देतात. ही उत्पादकांची फसवणुक आहे. जे दूध भुकटी करत नाहीत, त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दरवाढ होणार नाही. त्यासाठी सरकारनेच प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करावे किंवा सरसकट पाच रुपये दरवाढ द्यावी. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. 

दूध उत्पादकांना प्रति लिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च येतो. पण दुधाला निम्मीच किंमत मिळते. जो व्यवसाय परवडत नाही तो करायचा नाही, अशी भूमिका आहे. त्यामुळे दूध विक्री न करण्याचा निर्णय दूध उत्पादकांनी घेतला आहे. आंदोलनाचा निर्णय संघटनेचा नसून राज्यभरातील उत्पादकांशी चर्चा करूनच घेतला आहे.  दूध विकायचे की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना कोणीही रोखु शकत नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.तर कायदा हातात घेऊ...शेतकऱ्यांना दूध देण्याची सक्ती केल्यास संघटनेकडून कायदा हातात घेऊन संरक्षण दिले जाईल. संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन, धरपकड करून आंदोलन दडपले जाणार नाही. ते अधिक तीव्र होईल. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायदा आपले काम करेल, असे म्हटले असले तरी त्यांना शेतकरी कसा प्रतिकार करतात ते रात्री बारानंतर कळेल, असे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीmilkदूधnewsबातम्या