शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रायरेश्वर दिंडीचे प्रस्थान : भक्तिरसात न्हाले भोर शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:38 IST

सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.

भोर - सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.महाडनाका येथील हनुमंत शिरवले यांच्या घराजवळून सकाळी रायरेश्वर दिंडीच्यावतीने तयार केलेल्या माऊलींच्या रथाचे पूजन दिलीप बाठे यांच्या हस्ते करून दिंडीला सुरुवात झाली. यावेळी दिंडीचे संस्थापक माजी आमदार संपतराव जेधे, दिंडीचालक नामदेवमहाराज किंद्रे, दिलीप बाठे, हनुमंत शिरवले, दिलीप देशपांडे, अनिता बाठे, पांडुरंग गोरे, प्रवीण शिंदे, पांडुरंग कुमकर, सुरेश शिंदे, डॉ. प्रदीप पाटील, बापू शिरवले, रवींद्र बांदल, नितीन जेधे, बाळू सोनवणे, बापू कंक, लक्ष्मण पारठे, अभिमन्यू चिकणे, राहुल पारठे, मालबा चव्हाण व वारकरी, नागरिक उपस्थित होते.हातात भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करीत वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भोरच्या सीमेपर्यंत ढोल-लेझमीच्या पथकाने निरोप दिला. वाटेत श्रीपतीनगर, चौपाटी, रामबागसह अनेकठिकाणी वारीचे भक्तांनी स्वागत केले. यावेळी निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी दिंडीचे स्वागत केले. चौपाटीला सुनील गोळे, संजय गोळे यांच्या कुटुंबीयांनी चहा-नाष्ट्याची सोय केली होती.१९८० मध्ये पाच वारकऱ्यांवर माजी आमदार संपतराव जेधे यांनी रायरेश्वर दिंडी सुरू केली होती. आज ३९ वर्षे अखंडपणे वारी सुरू असून वारीचा आता वटवृक्ष झाला आहे. सुमारे ८०० ते एक हजार वारकरी रायरेश्वर दिंडीच्या माध्यमातून वारीला जातात.पंढरपूर येथील धर्मशाळेत रायरेश्वर दिंडीतील वारकºयांची राहण्याची व दर्शनाची व्यवस्था दिंडीच्या माध्यमातून केली जाते. याशिवाय गावागावात शिबिरे, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिंडीचालक हभप नामदेवमहाराज किंद्रे यांनी सांगितले.अनेक वर्षांची परंपरा आजही कायमसुरुवातीला रायरेश्वर किल्ला ते पंढरपूर अशी वारी सुरू झाली. त्यानंतर रायरेश्वर ते आळंदी आषाढीवारी, रायरेश्वर ते शिवथरघळ अशा वाºया सुरू केल्या असून त्या अखंडपणे सुरू आहेत. या वारीत भोर, महाड, वाई तालुक्यातील भाविक उत्साहाने सहभागी होतात.वारीला येणाºया भाविकांची राहण्याची, चहा, नाष्टा, जेवणाची सोय रायरेश्वर धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून केली जाते. वारीचा पंढरपूरपर्यंत १३ ठिकाणी मुक्कामासह १७ दिवसांनी वारी संपते.ऊन, पावसाचा विचार न करता मुला-बाळांपासून घरापासून दूर राहून परमेश्वराच्या (विठ्ठलाच्या) दर्शनासाठी हे वारकरी वारीला जातात. यात महिलांसह तरुणांचाही मोठा सहभाग असतो.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाnewsबातम्या