शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

रायरेश्वर दिंडीचे प्रस्थान : भक्तिरसात न्हाले भोर शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:38 IST

सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.

भोर - सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.महाडनाका येथील हनुमंत शिरवले यांच्या घराजवळून सकाळी रायरेश्वर दिंडीच्यावतीने तयार केलेल्या माऊलींच्या रथाचे पूजन दिलीप बाठे यांच्या हस्ते करून दिंडीला सुरुवात झाली. यावेळी दिंडीचे संस्थापक माजी आमदार संपतराव जेधे, दिंडीचालक नामदेवमहाराज किंद्रे, दिलीप बाठे, हनुमंत शिरवले, दिलीप देशपांडे, अनिता बाठे, पांडुरंग गोरे, प्रवीण शिंदे, पांडुरंग कुमकर, सुरेश शिंदे, डॉ. प्रदीप पाटील, बापू शिरवले, रवींद्र बांदल, नितीन जेधे, बाळू सोनवणे, बापू कंक, लक्ष्मण पारठे, अभिमन्यू चिकणे, राहुल पारठे, मालबा चव्हाण व वारकरी, नागरिक उपस्थित होते.हातात भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करीत वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भोरच्या सीमेपर्यंत ढोल-लेझमीच्या पथकाने निरोप दिला. वाटेत श्रीपतीनगर, चौपाटी, रामबागसह अनेकठिकाणी वारीचे भक्तांनी स्वागत केले. यावेळी निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी दिंडीचे स्वागत केले. चौपाटीला सुनील गोळे, संजय गोळे यांच्या कुटुंबीयांनी चहा-नाष्ट्याची सोय केली होती.१९८० मध्ये पाच वारकऱ्यांवर माजी आमदार संपतराव जेधे यांनी रायरेश्वर दिंडी सुरू केली होती. आज ३९ वर्षे अखंडपणे वारी सुरू असून वारीचा आता वटवृक्ष झाला आहे. सुमारे ८०० ते एक हजार वारकरी रायरेश्वर दिंडीच्या माध्यमातून वारीला जातात.पंढरपूर येथील धर्मशाळेत रायरेश्वर दिंडीतील वारकºयांची राहण्याची व दर्शनाची व्यवस्था दिंडीच्या माध्यमातून केली जाते. याशिवाय गावागावात शिबिरे, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिंडीचालक हभप नामदेवमहाराज किंद्रे यांनी सांगितले.अनेक वर्षांची परंपरा आजही कायमसुरुवातीला रायरेश्वर किल्ला ते पंढरपूर अशी वारी सुरू झाली. त्यानंतर रायरेश्वर ते आळंदी आषाढीवारी, रायरेश्वर ते शिवथरघळ अशा वाºया सुरू केल्या असून त्या अखंडपणे सुरू आहेत. या वारीत भोर, महाड, वाई तालुक्यातील भाविक उत्साहाने सहभागी होतात.वारीला येणाºया भाविकांची राहण्याची, चहा, नाष्टा, जेवणाची सोय रायरेश्वर धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून केली जाते. वारीचा पंढरपूरपर्यंत १३ ठिकाणी मुक्कामासह १७ दिवसांनी वारी संपते.ऊन, पावसाचा विचार न करता मुला-बाळांपासून घरापासून दूर राहून परमेश्वराच्या (विठ्ठलाच्या) दर्शनासाठी हे वारकरी वारीला जातात. यात महिलांसह तरुणांचाही मोठा सहभाग असतो.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाnewsबातम्या