शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

फलटण ते लोणंद मार्गावर धावणार डेमु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:24 IST

लोणंद ते फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे आहे. या मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होते.

ठळक मुद्देफलटण-बारामती मार्गाची प्रतीक्षाप्रवाशांसाठी दि. ११ सप्टेंबर रोजी फलटण येथे या गाडीचे लोकार्पण होणार फलटण व इतर दोन स्थानकांतून गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना गाडीतच तिकीट देण्याची व्यवस्था

पुणे : मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या लोणंद ते फलटण रेल्वेमार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या मार्गावर दि. १२ सप्टेंबरपासून डेमु सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोणंद ते फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे आहे. या मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होते. अनेक अडचणींवर मात करत काही महिन्यांपूर्वी या मार्गावरून रेल्वेगाडी सुरू करण्यात मान्यता मिळाली. त्यानंतर काही दिवसांपासून गाडीची चाचणीही घेण्यात आली. आता प्रत्यक्ष प्रवाशांसाठी दि. ११ सप्टेंबर रोजी फलटण येथे या गाडीचे लोकार्पण होणार आहे. तर नियमित सेवा दि. १२ सप्टेंबरपासून धावणार आहे. ही सेवा रविवार सोडून इतर सर्व दिवशी धावणार आहे. लोणंदहून ही गाडी सकाळी ७.२० वाजता सुटून ८.५० वाजता फलटण स्थानकात पोहचेल. तर फलटण स्थानकातून सकाळी ९.३० वाजता सुटून ११ वाजता लोणंदमध्ये दाखल होईल. दुसरी डेमु सकाळी ११.३५ वाजता लोणंद स्थानकातून सुटून दुपारी १.०५ वाजता फलटणमध्ये पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासात दुपारी १.४५ वाजता सुटून ३.१५ वाजता लोणंद स्थानकात येईल. ही गाडी तरडगाव व सुरवडी स्थानकातही थांबेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तिकीटाची व्यवस्था केवळ लोणंद स्थानकात असणार आहे. फलटण व इतर दोन स्थानकांतून गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना गाडीतच तिकीट देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गाडीमध्ये रेल्वे गार्डकडे तिकीटे उपलब्ध असतील. ही गाडी सुरू झाल्याने फलटण व लोणंददरम्यानच्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या मार्गावर डेमु धावणार असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने काळजी घ्यावी. तसेच जनावरांनाही रेल्वेमार्गावर दुर ठेवावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

....

मागील अनेक वर्षांपासून बारामती ते लोणंद या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ फलटण ते लोणंद दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. फलटण ते बारामती मार्गासाठी जमीन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे हा मार्ग रखडला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास परिसरातील नागरिकांसह रेल्वेलाही मोठा फायदा होणार आहे. दक्षिणेत ये-जा करणाऱ्या गाड्यांना सध्या पुणे स्थानकातून दौंडकडे जावे लागते. लोणंद-बारामती मार्ग पूर्ण झाल्यास पुण्याकडे येण्याचा वळसा वाचणार आहे. या गाड्या थेट बारामतीवरून दौंडमार्गे पुढे जाऊ शकणार आहेत. त्यामुळे पुणे स्थानकावरील मोठा ताणही कमी होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीticketतिकिट