शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आलेगाव पागा परिसरात पाणीटंचाई, चासकमान चारीद्वारे पाणी सोडण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 01:40 IST

आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे व परिसरातील शेंडगेवाडी, तलाव पिंपळदऱ्याच्या ओढ्यातील शेतकरीवर्गास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे व परिसरातील शेंडगेवाडी, तलाव पिंपळदऱ्याच्या ओढ्यातील शेतकरीवर्गास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच उरळगाव, तांबेवस्ती, कोळपेवस्ती, सत्रासवस्ती, गिरीमकर वस्ती या भागात ही भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.घोगर ओढा या भागात ही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातून चासकमानचा कॅनॉल गेलेला असून त्यातील पोटचाºया पाण्याविना वर्षानुवर्षे रिकाम्याच आहेत. पाणी येते ते फक्त पावसाळ्यातच. चासकमानचे शेरे सात-बारा उताºयावर आले. पण त्याच शेतकºयांना पाणी नाही. चार वर्षांपूर्वी या भागातील शेंडगेवाडी तलाव आटलेला असून या भागात शेळ्या-मेंढ्यांनाही पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. या भागातील विहिरी, बोअरवेल्स यांना पाणीच वर येत नाही, तर शेतातील पिके कशी जगवायची. या भागातील ऊसपिक हे हमखास उत्पादन मिळवून देणारे असून पाणी नसल्याने उसाचे चिपाड झाले आहे. ज्वारीच्या पिकांनी माना (सुकून गेलेल्या) टाकलेल्या आहेत. पाऊस पडेल, या आशेवर पेरणी केल्या पुन्हा दुहेरी पेरण्या केल्या, पण पाऊस नाही चासकमानच्या कॅनॉलचे आवर्तन या भागात सोडले नाही. जर या भागात चासकमानचे आवर्तन सोडून शेंडगेवाडी तलाव भरला असता तर या भागांतील विहिरी बोअरवेल्स यांना पाणी आले असते.खेडशिवापूरला पाणीटंचाईखेडशिवापुर / वेळू : पावसाळ्यातील कमी पर्जन्यमान तसेच परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शिवगंगा खोºयातील शेतकरी हवालदिल आहे. ज्वारी व गहू याच्या पेरण्यांवर दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या पिकांच्या एकूण क्षेत्रापैकी २० टक्क्यातही पेरणी झाली नसल्याचे दिसून येत आहे. ओढे-नाले सुकले आहेत, तर विहिरीचं पाणी डिसेंबरअखेरपर्यंत पुरेल की नाही, यात शंका आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न तर आताच गंभीर बनला आहे.पिंपळगाव जोगा कालव्याचे पाणीअद्यापही नाहीचबेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील रानमळा (ता. जुन्नर) गावाला पिंपळगाव जोगाकालव्याचे पाणी पाच दिवस उलटून गेले तरीही न मिळाल्यामुळे येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.तसेच अधिकाºयांना घेराव घालत पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी पिंपळगाव जोगा कालव्याला पाणी सोडून काही दिवस झालेले आहेत. रानमळा हे गाव दुष्काळीगाव आहे.या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते. येथील महिला हंडा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एम. एस. बागूल यांना ग्रामस्थ व महिलांनी घेराव घातला व पिंपळगाव जोगा कालव्याच्या मायनर ३१ व ३२ मधून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी सरपंच सविता तिकोणे, लक्ष्मी गुंजाळ, कविता पाबळे, सविता गुंजाळ, कल्पना गुंजाळ, दादा गुंजाळ, सुरेश तिकोणे, उपसरपंच शंकर गुंजाळ, रोहिदास पाडेकर आदी उपस्थित होते. पाण्याबाबत अधिकारी अन्याय करीत असल्याची भावना आहे.चासकमानच्या चारी १९ वरून पाणी कोळपेवस्तीवरून शेंडगेवाडी तलावात सोडले तर या भागातील विहिरी बोअरवेल्स यांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. कमीत कमी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मिटेल अन्यथा पिके जळालेली आहेत. लोकप्रतिनिधींनी या भागात पाणी सोडावे, आगामी काळात ‘अच्छे दिन’ शेतकरी दाखविल्याशिवाय राहणार नाही.- अशोक कोळपे,माजी सरपंच, उरळगावदौंडच्या दुष्काळी २२ गावांचा पाणीप्रश्न मिटवाखोर : दौंड तालुक्याच्या जिरायती भागामध्ये पाणीप्रश्न उग्र रूप धारण करू लागला असून, या भागामधील पाणीप्रश्न व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यातआले आहे. मागील आठवड्यात दौंड तालुक्यातील २२ गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी दुष्काळी दौरा केला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.दिवाळीवर दुष्काळाचे सावटनिमोणे : निमोणे परिसरात खरीप आणि रब्बी अशा दोन्हीही हंगामात वरुणराजाने पाठ फिरवल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने दिवाळीवर दुष्काळाचे सावट पसरले आहे.चालू वर्षी या भागामध्ये खरीप हंगाम पेरणीसाठी पाऊसच पडला नाही. त्यामुळे मूग संकरित बाजरी यांची पेरणीच झाली नाही. रब्बी हंगामाच्या सुरुवातीस थोडासा शिडकावा झाला. परंतु, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने रब्बी हंगामही वाया गेला. माळरानावर गवत नाही, शेतात पीक नाही आणि विहीर व बोअरवेल्स यांना पाणी नाही, अशी सध्या परिसराची अवस्था आहे. घोडधरण आणि चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनावर थोडीफार हिरवाई तग धरून आहे.मात्र उसाला हुमणीने आणि कांद्याला ढगाळ हवामानाने त्रस्त केले असून उत्पादनात मोठी घट होत आहे. कांद्याला मार्केटमध्ये उठाव नसल्याने जुन्या कांद्याच्या चाळी अद्याप जागेवरच आहेत. या सर्व घडामोडीत बळीराजा मात्र भरडला जातोय. वीजबिल आणि बँकांच्या व खासगी सावकारांच्या हप्त्यांच्या तगाद्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.तहानलेल्या २२ गावांना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही. कॅनॉलची उपलब्धता नाही. या गावांना लवकरात लवकर टंचाईच्या विळख्यातून बाहेर काढण्याची गरज आहे. जिल्हाधिकाºयांनी विचार करून या गावांची भूक भागविण्याच्या हालचाली सुरू करून प्रश्न मिटवावा.- रमेश थोरात, माजी आमदार

टॅग्स :Puneपुणेwater scarcityपाणी टंचाई