शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आलेगाव पागा परिसरात पाणीटंचाई, चासकमान चारीद्वारे पाणी सोडण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 01:40 IST

आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे व परिसरातील शेंडगेवाडी, तलाव पिंपळदऱ्याच्या ओढ्यातील शेतकरीवर्गास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे व परिसरातील शेंडगेवाडी, तलाव पिंपळदऱ्याच्या ओढ्यातील शेतकरीवर्गास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच उरळगाव, तांबेवस्ती, कोळपेवस्ती, सत्रासवस्ती, गिरीमकर वस्ती या भागात ही भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.घोगर ओढा या भागात ही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातून चासकमानचा कॅनॉल गेलेला असून त्यातील पोटचाºया पाण्याविना वर्षानुवर्षे रिकाम्याच आहेत. पाणी येते ते फक्त पावसाळ्यातच. चासकमानचे शेरे सात-बारा उताºयावर आले. पण त्याच शेतकºयांना पाणी नाही. चार वर्षांपूर्वी या भागातील शेंडगेवाडी तलाव आटलेला असून या भागात शेळ्या-मेंढ्यांनाही पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. या भागातील विहिरी, बोअरवेल्स यांना पाणीच वर येत नाही, तर शेतातील पिके कशी जगवायची. या भागातील ऊसपिक हे हमखास उत्पादन मिळवून देणारे असून पाणी नसल्याने उसाचे चिपाड झाले आहे. ज्वारीच्या पिकांनी माना (सुकून गेलेल्या) टाकलेल्या आहेत. पाऊस पडेल, या आशेवर पेरणी केल्या पुन्हा दुहेरी पेरण्या केल्या, पण पाऊस नाही चासकमानच्या कॅनॉलचे आवर्तन या भागात सोडले नाही. जर या भागात चासकमानचे आवर्तन सोडून शेंडगेवाडी तलाव भरला असता तर या भागांतील विहिरी बोअरवेल्स यांना पाणी आले असते.खेडशिवापूरला पाणीटंचाईखेडशिवापुर / वेळू : पावसाळ्यातील कमी पर्जन्यमान तसेच परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शिवगंगा खोºयातील शेतकरी हवालदिल आहे. ज्वारी व गहू याच्या पेरण्यांवर दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या पिकांच्या एकूण क्षेत्रापैकी २० टक्क्यातही पेरणी झाली नसल्याचे दिसून येत आहे. ओढे-नाले सुकले आहेत, तर विहिरीचं पाणी डिसेंबरअखेरपर्यंत पुरेल की नाही, यात शंका आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न तर आताच गंभीर बनला आहे.पिंपळगाव जोगा कालव्याचे पाणीअद्यापही नाहीचबेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील रानमळा (ता. जुन्नर) गावाला पिंपळगाव जोगाकालव्याचे पाणी पाच दिवस उलटून गेले तरीही न मिळाल्यामुळे येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.तसेच अधिकाºयांना घेराव घालत पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी पिंपळगाव जोगा कालव्याला पाणी सोडून काही दिवस झालेले आहेत. रानमळा हे गाव दुष्काळीगाव आहे.या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते. येथील महिला हंडा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एम. एस. बागूल यांना ग्रामस्थ व महिलांनी घेराव घातला व पिंपळगाव जोगा कालव्याच्या मायनर ३१ व ३२ मधून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी सरपंच सविता तिकोणे, लक्ष्मी गुंजाळ, कविता पाबळे, सविता गुंजाळ, कल्पना गुंजाळ, दादा गुंजाळ, सुरेश तिकोणे, उपसरपंच शंकर गुंजाळ, रोहिदास पाडेकर आदी उपस्थित होते. पाण्याबाबत अधिकारी अन्याय करीत असल्याची भावना आहे.चासकमानच्या चारी १९ वरून पाणी कोळपेवस्तीवरून शेंडगेवाडी तलावात सोडले तर या भागातील विहिरी बोअरवेल्स यांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. कमीत कमी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मिटेल अन्यथा पिके जळालेली आहेत. लोकप्रतिनिधींनी या भागात पाणी सोडावे, आगामी काळात ‘अच्छे दिन’ शेतकरी दाखविल्याशिवाय राहणार नाही.- अशोक कोळपे,माजी सरपंच, उरळगावदौंडच्या दुष्काळी २२ गावांचा पाणीप्रश्न मिटवाखोर : दौंड तालुक्याच्या जिरायती भागामध्ये पाणीप्रश्न उग्र रूप धारण करू लागला असून, या भागामधील पाणीप्रश्न व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यातआले आहे. मागील आठवड्यात दौंड तालुक्यातील २२ गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी दुष्काळी दौरा केला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.दिवाळीवर दुष्काळाचे सावटनिमोणे : निमोणे परिसरात खरीप आणि रब्बी अशा दोन्हीही हंगामात वरुणराजाने पाठ फिरवल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने दिवाळीवर दुष्काळाचे सावट पसरले आहे.चालू वर्षी या भागामध्ये खरीप हंगाम पेरणीसाठी पाऊसच पडला नाही. त्यामुळे मूग संकरित बाजरी यांची पेरणीच झाली नाही. रब्बी हंगामाच्या सुरुवातीस थोडासा शिडकावा झाला. परंतु, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने रब्बी हंगामही वाया गेला. माळरानावर गवत नाही, शेतात पीक नाही आणि विहीर व बोअरवेल्स यांना पाणी नाही, अशी सध्या परिसराची अवस्था आहे. घोडधरण आणि चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनावर थोडीफार हिरवाई तग धरून आहे.मात्र उसाला हुमणीने आणि कांद्याला ढगाळ हवामानाने त्रस्त केले असून उत्पादनात मोठी घट होत आहे. कांद्याला मार्केटमध्ये उठाव नसल्याने जुन्या कांद्याच्या चाळी अद्याप जागेवरच आहेत. या सर्व घडामोडीत बळीराजा मात्र भरडला जातोय. वीजबिल आणि बँकांच्या व खासगी सावकारांच्या हप्त्यांच्या तगाद्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.तहानलेल्या २२ गावांना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही. कॅनॉलची उपलब्धता नाही. या गावांना लवकरात लवकर टंचाईच्या विळख्यातून बाहेर काढण्याची गरज आहे. जिल्हाधिकाºयांनी विचार करून या गावांची भूक भागविण्याच्या हालचाली सुरू करून प्रश्न मिटवावा.- रमेश थोरात, माजी आमदार

टॅग्स :Puneपुणेwater scarcityपाणी टंचाई