शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:09 IST

वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे,

बावडा : वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली आहे.

सध्या नीरा डावा कालव्यातून लाभक्षेत्रात शेतीला आवर्तन दिले जात आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आठवडाभरात शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडणे सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील पुढे म्हणाले, बावडा व परिसरातील ८ गावांमधील शेती आणि एकूण १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना शेटफळ हवेली तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र सध्या हा परिसर कोरडा ठणठणीत आहे. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये बावडा तसेच भोडणी, वकीलवस्ती, सराटी, नीरनिमगाव, कचरवाडी, शेटफळ, पिठेवाडी, लाखेवाडी ही गावे येतात. या गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेटफळचे आवर्तन हे उन्हाळ्यात मे महिन्यात देण्यात आलेले होते. त्यानंतर तलाव कोरडा असल्याने शेतकºयांना आवर्तन देण्यात आले नाही. परिणामी, या परिसरातीलच पिके करपून चालली असून, धोक्यात आली आहेत. जर शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही तर मात्र वर्षभरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे अधीक्षक अभियंता चोपडे यांच्याशी बोलताना पाटील यांनी नमूद केले. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता ६२० दलघमी आहे. सध्या वीर भाटघर आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रातील बावडा व परिसरातील गावांमधील पिकांची पावसाअभावी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आता कालावधी कमी असल्याने शेटफळ तलावात तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात करून, तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी