शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:09 IST

वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे,

बावडा : वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली आहे.

सध्या नीरा डावा कालव्यातून लाभक्षेत्रात शेतीला आवर्तन दिले जात आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आठवडाभरात शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडणे सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील पुढे म्हणाले, बावडा व परिसरातील ८ गावांमधील शेती आणि एकूण १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना शेटफळ हवेली तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र सध्या हा परिसर कोरडा ठणठणीत आहे. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये बावडा तसेच भोडणी, वकीलवस्ती, सराटी, नीरनिमगाव, कचरवाडी, शेटफळ, पिठेवाडी, लाखेवाडी ही गावे येतात. या गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेटफळचे आवर्तन हे उन्हाळ्यात मे महिन्यात देण्यात आलेले होते. त्यानंतर तलाव कोरडा असल्याने शेतकºयांना आवर्तन देण्यात आले नाही. परिणामी, या परिसरातीलच पिके करपून चालली असून, धोक्यात आली आहेत. जर शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही तर मात्र वर्षभरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे अधीक्षक अभियंता चोपडे यांच्याशी बोलताना पाटील यांनी नमूद केले. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता ६२० दलघमी आहे. सध्या वीर भाटघर आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रातील बावडा व परिसरातील गावांमधील पिकांची पावसाअभावी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आता कालावधी कमी असल्याने शेटफळ तलावात तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात करून, तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी