शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:09 IST

वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे,

बावडा : वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली आहे.

सध्या नीरा डावा कालव्यातून लाभक्षेत्रात शेतीला आवर्तन दिले जात आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आठवडाभरात शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडणे सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील पुढे म्हणाले, बावडा व परिसरातील ८ गावांमधील शेती आणि एकूण १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना शेटफळ हवेली तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र सध्या हा परिसर कोरडा ठणठणीत आहे. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये बावडा तसेच भोडणी, वकीलवस्ती, सराटी, नीरनिमगाव, कचरवाडी, शेटफळ, पिठेवाडी, लाखेवाडी ही गावे येतात. या गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेटफळचे आवर्तन हे उन्हाळ्यात मे महिन्यात देण्यात आलेले होते. त्यानंतर तलाव कोरडा असल्याने शेतकºयांना आवर्तन देण्यात आले नाही. परिणामी, या परिसरातीलच पिके करपून चालली असून, धोक्यात आली आहेत. जर शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही तर मात्र वर्षभरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे अधीक्षक अभियंता चोपडे यांच्याशी बोलताना पाटील यांनी नमूद केले. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता ६२० दलघमी आहे. सध्या वीर भाटघर आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रातील बावडा व परिसरातील गावांमधील पिकांची पावसाअभावी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आता कालावधी कमी असल्याने शेटफळ तलावात तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात करून, तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी