शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा बैलगाडा मालकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 13:16 IST

बैलगाडा शर्यतींवरील बंदीमुळे अक्षरशः छोट्या मोठ्या व्यवसायिकांसह गावोगावच्या यात्रांवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे.

हनुमंत देवकर/चाकण : यात्रा व जत्रांच्या पार्श्वभूमीवर शासनाने बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, अन्यथा रास्ता रोकोसह जन आंदोलन करण्याचा इशारा चाकण परिसरातील बैलगाडा मालकांनी दिला आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदीमुळे अक्षरशः छोट्या मोठ्या व्यवसायिकांसह गावोगावच्या यात्रांवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे. बैलगाडा शर्यती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा, गाडा शौकिनांचा आवडता छंद आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून राज्य शासनाने गाड्यांच्या शर्यतीवर बंदी आणून गाडामालक व शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. न्यायालयानेही या शर्यतींवर बंदी घातली.

मात्र त्याबाबत लढा देऊनही अद्याप शर्यती सुरु करण्यासाठी यश मिळाले नाही. बैल हा उत्तम शेती करून शेतकऱ्यांचा उदर निर्वाह चालवतो. शेतकरी बैलांची जीवापाड काळजी घेतो. बैलपोळा या सणाला बैलांना सजवून गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढतो. मात्र बैलगाडा शर्यतीवर का बंदी आणली जाते या बाबत अजूनही शेतकरी संभ्रमात आहे. ऐन यात्रा काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असताना सरकार मात्र त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गाडामालक व शेतकऱ्यांनी केला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी त्वरित उठवून गाडा मालकांच्या भावनांचा विचार करून पुन्हा शर्यती सुरू कराव्यात अशी मागणी बैलगाडा मालक संतोषशेठ भोसले, जीवन खराबी, सुनील बिरदवडे, शशिकांत कड, राजेंद्र पडवळ, मारुती खराबी, अशोक खराबी, रामदास कड, बाळासाहेब खराबी, राजेंद्र खराबी, नवनाथ शेवकरी, महेश शेवकरी, अशोक बिरदवडे, बाळासाहेब सोपानराव कड, श्रीपती खराबी, बाळासाहेब जाधव, नारायणशेठ जावळे, पप्पू फलके, सुनील फलके, मोहन भांगरे, चंद्रभान पवार, संदीप बाबुराव जाधव, बाळासाहेब नाणेकर, सुनील जाधव, बजरंग कड, संतोष मुळे, संतोष मांडेकर, ज्ञानोबा दवणे, बाळासाहेब पठारे, काका आगरकर, संपतराव येळवंडे, अंकुश येळवंडे, विलासराव येळवंडे, कोंडीभाऊ येळवंडे, भगवान बिरदवडे आदींसह बैलगाडा शौकिनांनी केली आहे.बैलगाडा शर्यतीविना गाव जत्रा पडल्या ओससध्या गावागावांत यात्रा जत्रांचा हंगाम सुरु असून बैलगाडा शर्यती वर बंदी असल्याने गावोगावच्या यात्रा ओस पडल्या आहेत. गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीला अनन्य साधारण महत्व आहे. गावच्या यात्रांमधून ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते, मात्र शर्यती बंद पडल्याने गाडा शौकिनांनी, पाहुणे मंडळींनी यात्रांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव यात्रांमध्ये होणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे. यात्रांमधून तळागाळातील छोटे छोटे व्यावसायिक गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह चालवितात.प्रत्येक गावात यात्रा कालावधीत गावामध्ये भेळवाले, कलिंगड विक्रेते, आईस कँडी, पाणी पुरी, पाळणावाले, पानमसाला, टेम्पोवाले, हलगीवाले, वाजंत्री, लाऊड स्पीकर, निवेदक, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, रसवंती, आईस्क्रीम, किराणा दुकानदार, स्वीट सेंटर्स, कापड दुकानदार, विद्युत रोषणाई आदी व्यावसायिक गावागावातील यात्रांवर अवलंबून व्यवसाय करीत असतात. मात्र बैलगाडा शर्यती बंदीमुळे यात्राही ओस पडू लागल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर झाला आहे.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यत