शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी; 'अशी' झाली अपहरणकर्त्या मुलाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:18 IST

बारामती तालुक्यातील घटना

बारामती : व्याजाने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी करीत पाहुणेवाडी(ता.बारामती)येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली.मात्र, अपहरण झालेल्या युवकाला पोलीसांच्या भीतीने मोरगाव नजिक  अपहरणकर्त्यांनी  दुसºया दिवशी सोडुन दिले आहे. अपहरण झालेला युवक सुखरुप असुन त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

 बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसारमी अनमोल लालासाहेब परकाळे (वय २७, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (ता. २८ ) रात्री या अपहरण नाट्यास रात्री सव्वा नऊच्या सुमारास सुरुवात झाली.  कुत्रेबाहेर फिरविण्यासाठी अनमोल घराबाहेर गेला होता.यावेळी काही मिनिटात त्याचे वडील लालासाहेब दौलतराव परकाळे यांना त्यांच्या मुलाच्याच फोनवरुन फोन आला. तुमच्या मुलाने माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले आहेत, त्याचे व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी सांगेन तेथे आणूनद्या . पोलिसांना सांगितल तर मुलाला विसरा, असा दमच संबंधित अपहरण कर्त्यांनी लालासाहेब यांना भरला.

त्यानंतर रात्री १०.१२ नंतर पुन्हा १०.१६ वाजेदरम्यान लालासाहेब यांना परत त्याचा फोन आला. त्यावेळी तो मला म्हणाला की,तुमचा फोन व्यस्त लागतोय तुम्ही कोणाशी चर्चा केली काय, तुम्ही पोलिसांना फोन लावता काय जर तुम्ही त्यांना फोन केला तर तुमच्या मुलाला विसरा, असा दम दिला. त्यावेळी लालासाहेब यांच्या पत्नी अनिता यांनी फोन घेवून मुलाकडे कसले पैसे आहेत,अशी विचारणा केली.त्यावर आमचा व्याजाचा व्यवसाय असुन तुमच्या मुलाने माझ्याकडुन पंधरा लाख रुपये व्याजाने घेतले आहे ते व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी ३ वाचे पर्यंत द्यायचे, नाहीतर तुमचा मुलगा तुम्ही विसरा असे म्हणुन फोन बंद केला.आमच्या मुलाचे बरे वाईट होईल  या भीतीने परकाळे दांपत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलिसात केलीच नाही.

 रविवारी दुपारी दोन वाजता अनमोल याच्याच फोनवरुन पैशांची सोय झाली का असा विचारणा करणारा फोन आला. लालासाहेब यांनी आपल्याकडे आता दोन लाख रुपये आहेत, असे त्याला सांगितल्यावर पूर्ण पैशांची सोय करा नाहीतर मुलाला विसरा, असा दम पुन्हा देण्यात आला.तासाभराने पुन्हा अपहरणकर्त्यांनी सहा लाख रुपये रोख व दोन कोरे चेक द्यावे लागतील, असे सांगितले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोरगाव रस्त्याने जेजुरीत पैसे घेऊन या, असा फोन आला. का-हाटी येथे असताना पुन्हा अपहरणकर्त्यांनी मोरगाव येथे लालासाहेबांना बोलावले. पुन्हा त्यांना नीरा रस्त्याने नीरेकडे या असा निरोप फोनवर अपहरणकर्त्यांनी दिला. मात्र लालासाहेबांना अपहरणकर्त्यांनी विचारणा केली की तुमच्या गाड्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत. काय,मात्र, पोलिसांचा व गाड्यांचा संबंध नाही असे सांगितल्यावर पुन्हा त्यांना मोरगावकडे येण्यास सांगितले. यावेळी पेट्रोलपंपावर थांबण्यास सांगितल्यावर पुन्हा नीरा बाजूकडे गाडी आणण्यास सांगितले गेले. गुळुंचे येथे असतानाच लालासाहेब यांना अनमोलचाच फोन आला की त्याला मोरगाव जेजुरी रस्त्यावरील श्रीसृष्टी धाब्याजवळ अपहरणकर्त्यांनी सोडले आहे. यावेळी अनमोल याने वडिलांना एक वॅगनर या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अनोळखी पाच जणांनी जबरदस्तीने बसवुन अपहरण केल्याचे सांगितले. दमदाटी करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे सांगितले. करुन पैश्याची मागणी केली. माझी वरील अनोळखी पाच इसमांविरुध्द तक्रार आहे.————————————————...पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात  लालासाहेब यांनी पोलिसांना कळवले नव्हते.मात्र, या अपहरणनाट्याची  माहिती समजल्याने पोलिसांनीही समांतर पाठलाग सुरु केला होता. अपहरणकर्त्यांनाही पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी अनमोलला रस्त्यात सोडून पळ काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्यासह अनेक पोलिस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. अनमोल सुखरुप परत आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांनी या पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीKidnappingअपहरणPoliceपोलिस