शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी; 'अशी' झाली अपहरणकर्त्या मुलाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:18 IST

बारामती तालुक्यातील घटना

बारामती : व्याजाने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी करीत पाहुणेवाडी(ता.बारामती)येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली.मात्र, अपहरण झालेल्या युवकाला पोलीसांच्या भीतीने मोरगाव नजिक  अपहरणकर्त्यांनी  दुसºया दिवशी सोडुन दिले आहे. अपहरण झालेला युवक सुखरुप असुन त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

 बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसारमी अनमोल लालासाहेब परकाळे (वय २७, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (ता. २८ ) रात्री या अपहरण नाट्यास रात्री सव्वा नऊच्या सुमारास सुरुवात झाली.  कुत्रेबाहेर फिरविण्यासाठी अनमोल घराबाहेर गेला होता.यावेळी काही मिनिटात त्याचे वडील लालासाहेब दौलतराव परकाळे यांना त्यांच्या मुलाच्याच फोनवरुन फोन आला. तुमच्या मुलाने माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले आहेत, त्याचे व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी सांगेन तेथे आणूनद्या . पोलिसांना सांगितल तर मुलाला विसरा, असा दमच संबंधित अपहरण कर्त्यांनी लालासाहेब यांना भरला.

त्यानंतर रात्री १०.१२ नंतर पुन्हा १०.१६ वाजेदरम्यान लालासाहेब यांना परत त्याचा फोन आला. त्यावेळी तो मला म्हणाला की,तुमचा फोन व्यस्त लागतोय तुम्ही कोणाशी चर्चा केली काय, तुम्ही पोलिसांना फोन लावता काय जर तुम्ही त्यांना फोन केला तर तुमच्या मुलाला विसरा, असा दम दिला. त्यावेळी लालासाहेब यांच्या पत्नी अनिता यांनी फोन घेवून मुलाकडे कसले पैसे आहेत,अशी विचारणा केली.त्यावर आमचा व्याजाचा व्यवसाय असुन तुमच्या मुलाने माझ्याकडुन पंधरा लाख रुपये व्याजाने घेतले आहे ते व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी ३ वाचे पर्यंत द्यायचे, नाहीतर तुमचा मुलगा तुम्ही विसरा असे म्हणुन फोन बंद केला.आमच्या मुलाचे बरे वाईट होईल  या भीतीने परकाळे दांपत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलिसात केलीच नाही.

 रविवारी दुपारी दोन वाजता अनमोल याच्याच फोनवरुन पैशांची सोय झाली का असा विचारणा करणारा फोन आला. लालासाहेब यांनी आपल्याकडे आता दोन लाख रुपये आहेत, असे त्याला सांगितल्यावर पूर्ण पैशांची सोय करा नाहीतर मुलाला विसरा, असा दम पुन्हा देण्यात आला.तासाभराने पुन्हा अपहरणकर्त्यांनी सहा लाख रुपये रोख व दोन कोरे चेक द्यावे लागतील, असे सांगितले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोरगाव रस्त्याने जेजुरीत पैसे घेऊन या, असा फोन आला. का-हाटी येथे असताना पुन्हा अपहरणकर्त्यांनी मोरगाव येथे लालासाहेबांना बोलावले. पुन्हा त्यांना नीरा रस्त्याने नीरेकडे या असा निरोप फोनवर अपहरणकर्त्यांनी दिला. मात्र लालासाहेबांना अपहरणकर्त्यांनी विचारणा केली की तुमच्या गाड्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत. काय,मात्र, पोलिसांचा व गाड्यांचा संबंध नाही असे सांगितल्यावर पुन्हा त्यांना मोरगावकडे येण्यास सांगितले. यावेळी पेट्रोलपंपावर थांबण्यास सांगितल्यावर पुन्हा नीरा बाजूकडे गाडी आणण्यास सांगितले गेले. गुळुंचे येथे असतानाच लालासाहेब यांना अनमोलचाच फोन आला की त्याला मोरगाव जेजुरी रस्त्यावरील श्रीसृष्टी धाब्याजवळ अपहरणकर्त्यांनी सोडले आहे. यावेळी अनमोल याने वडिलांना एक वॅगनर या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अनोळखी पाच जणांनी जबरदस्तीने बसवुन अपहरण केल्याचे सांगितले. दमदाटी करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे सांगितले. करुन पैश्याची मागणी केली. माझी वरील अनोळखी पाच इसमांविरुध्द तक्रार आहे.————————————————...पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात  लालासाहेब यांनी पोलिसांना कळवले नव्हते.मात्र, या अपहरणनाट्याची  माहिती समजल्याने पोलिसांनीही समांतर पाठलाग सुरु केला होता. अपहरणकर्त्यांनाही पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी अनमोलला रस्त्यात सोडून पळ काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्यासह अनेक पोलिस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. अनमोल सुखरुप परत आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांनी या पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीKidnappingअपहरणPoliceपोलिस