शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डीएसकेंच्या घराबाहेर कर्मचा-यांचे ठिय्या आंदोलन, सहा महिन्यांपासूनचा थकीत पगार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:42 IST

डीएसके यांच्या परिवारातले सदस्य म्हणून आजवर त्यांना खूप साथ दिली... मात्र आता पैशाअभावी आमचे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

पुणे : डीएसके यांच्या परिवारातले सदस्य म्हणून आजवर त्यांना खूप साथ दिली... मात्र आता पैशाअभावी आमचे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. डिसेंबरपासून वाढीव भत्ता दिलेला नाही, पीएफची रक्कमही जमा केलेली नाही आणि एप्रिलपासून पगारही दिलेला नाही, पैशाविना मुलांच्या शाळेचे शुल्क भरू शकलो नाही, विजेचे बिल भरता आलेले नाही, महाविद्यालयाचे शिक्षणही पूर्ण करू शकत नाही... अशा अनेक व्यथा डीएसके टोयोटा ग्रुपमधील कर्मचारी मांडत होते.कोल्हापूर, सांगली, नगर, सातारा आदी राज्यभरातील जवळपास ३०० कर्मचाºयांनी चतु:शृंगी येथील डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्याबाहेर गुरुवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत रक्कम दिली जात नाही तोवर बंगल्यासमोरून हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.ज्येष्ठ उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कर्मचाºयांनीही ६ महिन्यांपासून थकलेल्या पगाराचा तगादा लावल्याने डीएसके पुन्हा अडचणीत सापडले आहेत. डीएसके यांनी आम्हाला खूप साथ दिली आहे. त्यांच्या अडचणीत आम्हीही त्यांना गेल्या ६ महिन्यांपासून सहकार्य करीत आहोत. मात्र, आता पाणी डोक्यावरून वाहून गेले आहे. शेवटी आम्हालाही आमचे कुटुंब आहे. त्यांना सातत्याने पगाराची रक्कम देण्यासंदर्भात आम्ही मेल केले आहेत. यावर अमुक एका तारखेला रक्कम दिली जाईल, असे केवळ आश्वासनच आम्हाला देण्यात आले. दि. ६ सप्टेंबरला रक्कम दिली जाईल, असा मेल त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी केला होता; मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही.आम्हाला आमचे पैसे दिले नाहीत तर पुण्यात येऊन घरासमोर आंदोलन करू, असा मेल आम्ही त्यांना केला होता. मात्र, त्यावरही काही उत्तर आले नाही. शेवटी आम्ही हा आंदोलनाचा निर्णय घेतला.सकाळी १० पासून आम्ही त्यांच्या घराबाहेर बसून आहोत; मात्र आमची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळत नाहीत आम्ही इथून जाणार नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे