शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

टाकळीहाजी परिसरात कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया खोळंबली, शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रात फेºया  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:19 IST

टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.शासनाने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत जाचक निकष वापरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजेतोंडात घास आणि मानेत बुक्का अशी अवस्था शेतकऱ्यांची ...

टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.शासनाने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत जाचक निकष वापरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजेतोंडात घास आणि मानेत बुक्का अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. या कर्जमाफीचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये या शासनाविषयी चांगलीच नाराजी पसरली आहे. कारण अतिशय जाचक अटी वापरून ही कर्जमाफी असल्याने याचा फायदा कमी आणि त्रास जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिसरात अनेक शेतकरी अंगठेबहाद्दर असल्याने त्यांना कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी कुठे जावे काय करावे हेच माहीत नसल्याने ते भांबावून गेले आहेत. कारण इंटरनेट, आॅनलाईन, सर्व्हर काय आहे. आयुष्यात कधी माहिती नाही ते त्यांना आता ऐकायला मिळत आहे.शिवाय त्या ठिकाणी जाऊन फॉर्म कसा भरायचा याची किंचितही कल्पना नाही.तसेच फॉर्म आॅनलाइन भरताना त्यावर काय माहिती भरायची हेदेखील माहिती नाही. शिवाय हा फॉर्म भरताना पती-पत्नी बरोबर असल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने दिवसभर त्या कार्यालयात थांबावे लागत आहे. त्यामुळे महिलादेखील या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला पूर्णपणे वैतागल्या आहेत.कर्जमाफी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर असल्याने आता फक्त १० च दिवस शिल्लक राहिल्याने शेतकरी चांगलेच भेदरले आहेत. कारण दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने या परिसरातील अनेक शेतकरी आॅनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकरी रात्री व पहाटे आपल्या घरमालकिणीला अर्ज भरण्यासाठी घेऊन जात आहेत. या शासनाला जर खरोखरच कर्जमाफी द्यायची होती तर ही प्रक्रिया शासन कशासाठी राबवतेय. कारण शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाबद्दल माहिती शासनदरबारी आहे.शिवाय प्रत्येक बँकांकडे ही माहिती उपलब्ध असताना शासन शेतकºयांचा का अंत पाहत आहे. यापूर्वी अनेक वेळा कर्जमाफी झाली. परंतु त्या वेळी असा काही प्रकार नव्हता .परंतु हे शासन शेतकºयांचे नसल्याने ते शेतकºयांची अशी क्रूर चेष्टा करीत असल्याची प्रतिक्रिया या परिसरातील महिला व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी