शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

टाकळीहाजी परिसरात कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया खोळंबली, शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रात फेºया  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:19 IST

टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.शासनाने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत जाचक निकष वापरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजेतोंडात घास आणि मानेत बुक्का अशी अवस्था शेतकऱ्यांची ...

टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.शासनाने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत जाचक निकष वापरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजेतोंडात घास आणि मानेत बुक्का अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. या कर्जमाफीचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये या शासनाविषयी चांगलीच नाराजी पसरली आहे. कारण अतिशय जाचक अटी वापरून ही कर्जमाफी असल्याने याचा फायदा कमी आणि त्रास जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिसरात अनेक शेतकरी अंगठेबहाद्दर असल्याने त्यांना कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी कुठे जावे काय करावे हेच माहीत नसल्याने ते भांबावून गेले आहेत. कारण इंटरनेट, आॅनलाईन, सर्व्हर काय आहे. आयुष्यात कधी माहिती नाही ते त्यांना आता ऐकायला मिळत आहे.शिवाय त्या ठिकाणी जाऊन फॉर्म कसा भरायचा याची किंचितही कल्पना नाही.तसेच फॉर्म आॅनलाइन भरताना त्यावर काय माहिती भरायची हेदेखील माहिती नाही. शिवाय हा फॉर्म भरताना पती-पत्नी बरोबर असल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने दिवसभर त्या कार्यालयात थांबावे लागत आहे. त्यामुळे महिलादेखील या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला पूर्णपणे वैतागल्या आहेत.कर्जमाफी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर असल्याने आता फक्त १० च दिवस शिल्लक राहिल्याने शेतकरी चांगलेच भेदरले आहेत. कारण दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने या परिसरातील अनेक शेतकरी आॅनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकरी रात्री व पहाटे आपल्या घरमालकिणीला अर्ज भरण्यासाठी घेऊन जात आहेत. या शासनाला जर खरोखरच कर्जमाफी द्यायची होती तर ही प्रक्रिया शासन कशासाठी राबवतेय. कारण शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाबद्दल माहिती शासनदरबारी आहे.शिवाय प्रत्येक बँकांकडे ही माहिती उपलब्ध असताना शासन शेतकºयांचा का अंत पाहत आहे. यापूर्वी अनेक वेळा कर्जमाफी झाली. परंतु त्या वेळी असा काही प्रकार नव्हता .परंतु हे शासन शेतकºयांचे नसल्याने ते शेतकºयांची अशी क्रूर चेष्टा करीत असल्याची प्रतिक्रिया या परिसरातील महिला व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी