शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

‘सहकार’वर कर्जमाफीचा ताण; याद्यांचे काम न करण्याचा इशारा, अधिकारी संघटनेची आयुक्तांसह बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 05:11 IST

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाचा ताण आल्याने एका अधिका-याचा मृत्यू झाला असून, दुसरा अधिकारी कोमात गेला आहे. सहकार विभागातील अधिका-यांवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे : शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाचा ताण आल्याने एका अधिका-याचा मृत्यू झाला असून, दुसरा अधिकारी कोमात गेला आहे. सहकार विभागातील अधिका-यांवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या असंख्य चुकांचे खापर सहकार विभागावर फोडले जात आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या याद्यांचे काम न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकार विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने घेतला आहे. येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे संघटनेने घोषित केले आहे.राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचे काम करीत असताना इंदापूरमधील सहायक निबंधक रतिलाल अहिरे यांचा मृत्यू झाला.आंबेगाव येथील सहायक निबंधक विठ्ठल खंडागळे कोमात गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या १५० सभासदांनी सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांचीभेट घेतली. झाडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या सदस्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सूर्यवंशी, कार्याध्यक्ष नितीन काळे, खजिनदार संजय सुद्रिक, आनंद कटके आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान,सहायक निबंधक, उपनिबंधक, सहनिबंधक, अप्पर निबंधक आणि विशेष निबंधक दर्जाच्या अधिका-यांनी कामामधील अडचणी व समस्या मांडल्या. मागील तीन महिन्यात सुट्ट्या असतानाही सर्वांनी मेहनत घेऊन योजना यशस्वी करण्यात योगदान दिले आहे. आॅनलाइन यंत्रणेतील दोषांमुळे याद्यांमध्ये गोंधळ झाला आहे. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर येणा-या सूचना आणि आदेशांना कायदेशीर महत्त्व नसल्यामुळे भविष्यात कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता असून संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर चुकीची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर होऊन निर्दोष हिरव्या याद्या जाहीर होईपर्यंत काम न करण्याचा निर्णय संघटनेने चर्चेअंती घेतल्याचे अध्यक्ष सुर्यवंशी यांनी सांगितले.शेतक-यांच्या रोषाचे धनीमाहिती तंत्रज्ञान विभागाने शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी हिरवी यादी तयार करताना असंख्य चुका केल्या आहेत. सहकार विभागाचा संबंध नसताना शेतकरी व तक्रारदारांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना शेतकºयांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी