शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘सहकार’वर कर्जमाफीचा ताण; याद्यांचे काम न करण्याचा इशारा, अधिकारी संघटनेची आयुक्तांसह बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 05:11 IST

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाचा ताण आल्याने एका अधिका-याचा मृत्यू झाला असून, दुसरा अधिकारी कोमात गेला आहे. सहकार विभागातील अधिका-यांवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे : शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाचा ताण आल्याने एका अधिका-याचा मृत्यू झाला असून, दुसरा अधिकारी कोमात गेला आहे. सहकार विभागातील अधिका-यांवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या असंख्य चुकांचे खापर सहकार विभागावर फोडले जात आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या याद्यांचे काम न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकार विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने घेतला आहे. येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे संघटनेने घोषित केले आहे.राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचे काम करीत असताना इंदापूरमधील सहायक निबंधक रतिलाल अहिरे यांचा मृत्यू झाला.आंबेगाव येथील सहायक निबंधक विठ्ठल खंडागळे कोमात गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या १५० सभासदांनी सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांचीभेट घेतली. झाडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या सदस्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सूर्यवंशी, कार्याध्यक्ष नितीन काळे, खजिनदार संजय सुद्रिक, आनंद कटके आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान,सहायक निबंधक, उपनिबंधक, सहनिबंधक, अप्पर निबंधक आणि विशेष निबंधक दर्जाच्या अधिका-यांनी कामामधील अडचणी व समस्या मांडल्या. मागील तीन महिन्यात सुट्ट्या असतानाही सर्वांनी मेहनत घेऊन योजना यशस्वी करण्यात योगदान दिले आहे. आॅनलाइन यंत्रणेतील दोषांमुळे याद्यांमध्ये गोंधळ झाला आहे. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर येणा-या सूचना आणि आदेशांना कायदेशीर महत्त्व नसल्यामुळे भविष्यात कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता असून संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर चुकीची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर होऊन निर्दोष हिरव्या याद्या जाहीर होईपर्यंत काम न करण्याचा निर्णय संघटनेने चर्चेअंती घेतल्याचे अध्यक्ष सुर्यवंशी यांनी सांगितले.शेतक-यांच्या रोषाचे धनीमाहिती तंत्रज्ञान विभागाने शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी हिरवी यादी तयार करताना असंख्य चुका केल्या आहेत. सहकार विभागाचा संबंध नसताना शेतकरी व तक्रारदारांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना शेतकºयांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी