शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

’दलितमित्र’ अनुताई भागवत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 20:39 IST

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनुताई भागवत यांना‘दलितमित्र’ ही पदवी जाहीर केली होती..

पुणे : समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबददल ’दलितमित्र’ पदवी मिळवलेल्या ज्येष्ठ समाजसेविका अनुताई भागवत यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. अमरावतीच्या ‘तपोवन’चे संस्थापक कै. शिवाजीराव पटवर्धन आणि पार्वतीबाई पटवर्धन यांच्या त्या कन्या होतं. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनुताई भागवत हे अवघ्या महाराष्ट्राला सेवाकार्यासाठी सुपरिचित असलेले नाव आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आई-वडिलांकडूनच त्यांना समाजसेवेचा वारसा मिळाला. लहानपणीच महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई, दुर्गाबाई देसाई यांच्यासारख्या महान विभुतींचा त्यांना सहवास लाभला. सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, साने गुरूजी यांची विचारधारा त्यांच्यात रूजली होती. मानवतेला पारख्या झालेल्या कुष्ठरूग्णाला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन घालविण्यास पात्र करण्यासाठी, रोगाविषयीची भीती, घृणा व तिरस्कार नाहीसा करण्यासाठी मानवतावादी आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी ‘तपोवन’ केंद्राची स्थापना केली होती. पती निधनानंतर अनुताई भागवत यांनी तपोवनमध्ये प्रवेश करून कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा ध्यास घेतला. अनाथांचा सांभाळ, कैदी बांधवांच्या निराधार मुलांना आश्रय, अपंगांचे पुनर्वसन, तपोवन वस्तू विक्री केंद्र, अनौरस मुलांचे दत्तकविधान या सर्व कार्यात त्यांनी पुढाकार घेऊन कार्य केले. स्नेहप्रकाश परिवाराच्या माध्यमातूनही त्यांनी अपंगांसाठी काम केले. कोल्हापूरच्या  ‘हेल्पर्स आॅफ दि हँण्डिकँप्ड’ या संस्थेच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी त्या होत्या. समाजसेवेतील योगदानाबददल 1972 मध्ये गांधीजयंतीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनुताई भागवत यांना‘दलितमित्र’ ही पदवी जाहीर केली होती. कै.शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचा जीवनपट अनुताईंनी ’बिल्बदल’मधून साकारला. या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले. नँशनल बुक ट्रस्टच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनात मराठी विभागातील 48 आत्मचरित्रात्मक पुस्तकात उत्कृष्ट पुस्तक म्हणून या पुस्तकाचा गौरव झाला.  महाराष्ट्र शासनातर्फे लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा पुरस्कारही या पुस्तकाने मिळविला. ‘इदं न मम’ ग्रंथ व ‘सागर शक्ती आकाशी’ हे त्यांनी लिहिलेले नाटकही खूप गाजले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे ॠणानुबंध होते.  

टॅग्स :Puneपुणे