शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

’दलितमित्र’ अनुताई भागवत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 20:39 IST

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनुताई भागवत यांना‘दलितमित्र’ ही पदवी जाहीर केली होती..

पुणे : समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबददल ’दलितमित्र’ पदवी मिळवलेल्या ज्येष्ठ समाजसेविका अनुताई भागवत यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. अमरावतीच्या ‘तपोवन’चे संस्थापक कै. शिवाजीराव पटवर्धन आणि पार्वतीबाई पटवर्धन यांच्या त्या कन्या होतं. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनुताई भागवत हे अवघ्या महाराष्ट्राला सेवाकार्यासाठी सुपरिचित असलेले नाव आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आई-वडिलांकडूनच त्यांना समाजसेवेचा वारसा मिळाला. लहानपणीच महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई, दुर्गाबाई देसाई यांच्यासारख्या महान विभुतींचा त्यांना सहवास लाभला. सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, साने गुरूजी यांची विचारधारा त्यांच्यात रूजली होती. मानवतेला पारख्या झालेल्या कुष्ठरूग्णाला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन घालविण्यास पात्र करण्यासाठी, रोगाविषयीची भीती, घृणा व तिरस्कार नाहीसा करण्यासाठी मानवतावादी आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी ‘तपोवन’ केंद्राची स्थापना केली होती. पती निधनानंतर अनुताई भागवत यांनी तपोवनमध्ये प्रवेश करून कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा ध्यास घेतला. अनाथांचा सांभाळ, कैदी बांधवांच्या निराधार मुलांना आश्रय, अपंगांचे पुनर्वसन, तपोवन वस्तू विक्री केंद्र, अनौरस मुलांचे दत्तकविधान या सर्व कार्यात त्यांनी पुढाकार घेऊन कार्य केले. स्नेहप्रकाश परिवाराच्या माध्यमातूनही त्यांनी अपंगांसाठी काम केले. कोल्हापूरच्या  ‘हेल्पर्स आॅफ दि हँण्डिकँप्ड’ या संस्थेच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी त्या होत्या. समाजसेवेतील योगदानाबददल 1972 मध्ये गांधीजयंतीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनुताई भागवत यांना‘दलितमित्र’ ही पदवी जाहीर केली होती. कै.शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचा जीवनपट अनुताईंनी ’बिल्बदल’मधून साकारला. या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले. नँशनल बुक ट्रस्टच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनात मराठी विभागातील 48 आत्मचरित्रात्मक पुस्तकात उत्कृष्ट पुस्तक म्हणून या पुस्तकाचा गौरव झाला.  महाराष्ट्र शासनातर्फे लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा पुरस्कारही या पुस्तकाने मिळविला. ‘इदं न मम’ ग्रंथ व ‘सागर शक्ती आकाशी’ हे त्यांनी लिहिलेले नाटकही खूप गाजले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे ॠणानुबंध होते.  

टॅग्स :Puneपुणे